शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भर पावसाळ्यातही टंचाई कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 10:50 PM

कापडणे : ग्रामपंचायतीद्वारे ३५ ते ४० दिवसानंतर नळांना पाणी, ग्रामस्थांची वणवण भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : धुळे तालुक्यातील कापडणे गावात सलग सहा ते सात महिन्यापासून तीव्र पाण्याची टंचाई भेडसावत आहे. सुरुवातीला पाणीटंचाईची तीव्रता कमी असली तरी सध्या मात्र दोन महिन्यापासून कापडणे येथील काही भागांमध्ये २५ ते ३० दिवसानंतर तर काही लांबच्या भागांमध्ये ३५ ते ४० दिवसानंतर ग्रामपंचायतीद्वारे नळांना पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.सलग तीन ते चार वर्षापासून कापडणे गाव व परिसरात कोरडा दुष्काळ पडत असल्यामुळे जमिनीची जलपातळी प्रमाणापेक्षा जास्त खालावली असल्याने पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. कापडणे येथील पाणीपुरवठयाचे सर्व जलस्रोत आटले आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी कापडणे येथील सरपंच भटू गोरख पाटील, गटनेते भगवान विनायक पाटील, माजी जि.प. सदस्य रामकृष्ण खलाणे यांनी कापडणे गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी करुन पाठपुरावा केला. त्यानंतर दीड महिन्यापासून कापडणे गावात धुळे जिल्हा प्रशासनाकडून २४ हजार लिटर क्षमतेचे दोन पाण्याचे टँकर सुरू होते. प्रत्येक पाण्याचे टँकर दिवसभरातून पाच फेºया कापडणे गावात मारीत होते. मात्र, गावाचे क्षेत्रफळ व लोकसंख्या जास्त असल्याने केवळ दोन पाण्याच्या टँंकरवर पाणीटंचाईच्या समस्येचे निवारण होत नव्हते. टँकरद्वारे कापडणे येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी टाकून तेथून गडीवरील मोठया जलकुंभात पाणी टाकून गावात टप्प्याटप्प्याने पाणी वितरण केले जात होते. मात्र, प्रत्येक चौकातील महिला व ग्रामस्थ म्हणत होते, आम्हाला ३० दिवसांपासून पाणी नाही. त्यामुळे टँकर आल्यावर गावातील महिला व पुरुषांनी थेट ग्रामपंचायतीवर व धुळ्यावरून येणाºया टँकरकडे मोर्चा वळविला. अखेर भांडण तंटे करून टँकर चालकाशी हुज्जत घालून थेट टँकरचा ताबा मिळवून आपापल्या परिसरातील सार्वजनिक हाळमध्ये पाण्याचा उपसा करून घेतला. पाणी मिळवण्यासाठी सर्वत्र भांडणे निर्माण होत असल्याने दोन्ही टँकर चालकांनी कापडणे गावात पाण्याचे टँकर आणण्यास नापसंती दर्शवली. व पाण्याचे टँकर बंद झाले.दरम्यान, सरपंच भटू गोरख पाटील यांनी जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांच्याकडे पाठपुरावा केल्याने २१ जुलैपासून पुन्हा एक पाण्याच्या टँकरला सुरुवात झालेली आहे.शेतकºयांनी विहीरी केल्या खुल्याकापडणे येथील शेतकरी शरद भिका बोरसे, अशोक यादव माळी, लहू यादराव माळी, अमोल यादव पाटील, सुभाष शांतीलाल जैन, दगाजी बुधाजी मोरे, दीपक भीमराव बोरसे, सुरेश भीमराव बोरसे, कैलास बडगुजर, संभाजी रघुनाथ पाटील, आनंदा साहेबराव पाटील, गुलाबराव पाटील, साहेबराव दिनकर पाटील, खंडू पाटील, प्रकाश पाटील, विलास उत्तम पाटील, प्रकाश बडगुजर, किशोर गुलाबराव बोरसे, सुनिल रमेश बोरसे, सुनील दगाजी पवार, बाजीराव पाटील आदी शेतकºयांनी आपल्या शेतातील पिकांना पाणी न देता ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी वेळोवेळी उपलब्ध करून दिले आहे.पाण्यासाठी तंटामुक्त गावात तंटेभर पावसाळ्यातही तब्बल ३५ ते ४० दिवसांनी नळांना पाणी येत असल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. तंटामुक्त कापडणे गावात पाणीटंचाईमुळे दररोज तंटे निर्माण होत आहेत. वेळेवर पाऊस होत नसल्याने चिंता वाढली आहे. बंद पडलेले पाण्याचे टँकर नियमित सुरू करण्यात यावेत, असे येथील ग्रामस्थांची मागणी आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे