शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

ओलाव्याचे कारण सांगून कापूस खरेदीत लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 12:03 IST

मालपूर/थाळनेर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरातील गरजू शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावात कापूस विक्रीला काढला आहे. परतीचा पाऊस सतत ...

मालपूर/थाळनेर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरातील गरजू शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावात कापूस विक्रीला काढला आहे. परतीचा पाऊस सतत धुमाकुळ घालत असल्यामुळे ओला झालेला कापूस नाईलाजास्तव कमी दरात विकावा लागतो आहे. शिरपूर तालुक्यातील थाळनेर परिसरात पावसाने मातीमोल झालेल्या कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने घरातच पडून आहे. सध्या सर्वदूर हीच स्थिती दिसून येत आहे.मालपूरसह संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात परतीच्या पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात या कापसाची प्रत खराब झाल्यामुळे तसच कापसाला काहीअंशी ओलावा आढळून येत असल्याने हक्काची येथे बाजारपेठ किंवा खरेदी केंद्र नाही. त्यामुळे खासगी व्यापारी मनमानी भावाने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करताना दिसून येत आहे. तर शेतकरी देखील नाईलाजास्तव आगामी हंगामाच्या भांडवलासाठी कमी दराने विक्री करत आहे.आगामी रब्बी हंगामपूर्व शेतीच्या मशागतीसाठी बी-बियाणे कापूस वेचणी मजुरीसाठी हातात पैसे शिल्लक नसल्यामुळे हमी भावापेक्षा कमी भावात सध्या येथे खरेदी विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे.यंदा येथे पावसाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड झाली.सर्वात जास्त कापूस लागवड क्षेत्र यावर्षी दिसून आले. सप्टेंबर पर्यंत पाऊस चांगला झाल्यामुळे उत्पादनात वाढ होवून शेतकºयांना यंदा अच्छे दिन येतील अशी अपेक्षा होती. मात्र आॅक्टोबर महिन्याच्या सततच्या पावसामुळे या स्वप्नावर देखील पाणी फिरले. होत्याचे नव्हते होवून शेतकºयाच्या शेती पिकाचे नुकसान झाले. यात कापूस ओला झाल्यामुळे इच्छा नसताना नाईलजास्तव विक्री करावा लागत असल्याचे शेतकरी सांगतात. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे कापूस वेचणी काही दिवस थांबवली होती. मात्र आता काही दिवसापासून उघडीप दिल्यामुळे वाढती मजुरी देऊन वेचणीच्या कामाला सर्वत्र गती मिळाली असून कापसात काही प्रमाणात ओलावा दिसून येत आहे. म्हणून कमी दरात कापूस विक्री करण्याची शेतकºयांची यंदा मजबुरी आहे.नोव्हेंबर महिना अर्धा संपला तरी येथील परिसरात किंवा दोंडाईचा बाजारपेठेत हक्काचे खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. ओलावा जास्त असल्याने सीसीआयच्या निकषात कापूस बसत नाही. त्यामुळे जोपर्यंत १० टक्के पेक्षा आर्द्रतामुक्त कापूस बाजारात येत नाही तोपर्यंत खरेदी केंद्र सुरू होणार नसल्याचे समजते. यामुळे हा ओला कापूस ठेवावा तरी कुठे, या विवंचनेतच खासगी व्यापाºयाला कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.सध्या येथून खासगी व्यापारी कापूस खरेदी करुन गुजरात, मध्यप्रदेश राज्यातील बाजारपेठेत किंवा जिनर्सना विक्री करत असल्याचे समजते. यंदा कापसाची आवकही नसल्यामुळे हे व्यापारी किरकोळ व्यापाºयापासून खरेदी करतात. यामुळे तीन घटकांचा नफा वजा जाता हा भाव पदरात पडत असल्यामुळे कवडीमोल भाव मिळत आहे. यासाठी प्रशासनाने शेतकरी व जिनर्स या मधले दोन घटक बाजूला कापूस खरेदी करुन शेतकºयांना दिलासा द्यावा व हमीभावापेक्षा कमी भावाने कुठेही कापूस खरेदी होवू नये, यासाठी प्रयत्न करण्याची शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :Dhuleधुळे