इतर धर्मियांचे गैरसमज दूर करा !

By Admin | Updated: June 2, 2014 17:44 IST2014-06-02T17:43:56+5:302014-06-02T17:44:25+5:30

गैरमुस्लिमांमध्ये मुस्लीम समाजाबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आपणावर असून स्वत:च्या चुका ओळखून प्रेमाचा संदेश देण्याचे आवाहन ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या अध्यक्षांनी केले.

Remove the misunderstanding of other religions! | इतर धर्मियांचे गैरसमज दूर करा !

इतर धर्मियांचे गैरसमज दूर करा !

 

जळगाव : गैरमुस्लिमांमध्ये मुस्लीम समाजाबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आपणावर असून स्वत:मधील चुका ओळखून परस्पर स्नेह, सौहार्द आणि प्रेमाचा संदेश देण्याचे आवाहन ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना सैयद मोहम्मद राबे हसनी नदवी यांनी इदगाह मैदावर सायंकाळी ७.३0वा. आयोजित जाहीर सभेत बोलताना केले.
व्यासपीठावर मौलाना उमरबीन महेफूज रहेमानी, मौलाना खालीद सैफुल्ला रहेमानी, मौलाना रफीक अहमद कासमी, दिल्ली, राज्यसभा सदस्य मोहम्मद आदिब, मौलाना सईद रहेमान कासमी, मुंबई, शेख हुसेन बदरी, मुंबई, मौलाना अनीसूर रहेमान कासमी, लखनऊ, मौलाना वसी अहमद कासमी, दिल्ली, मौलाना सऊद आलम कासमी, अलिगढ, मौलाना सनाउल्ला कासमी, पटना, रहीम कुरेशी, हैदराबाद, मौलाना सैयद मोहम्मद वली रहेमानी आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कुराणच्या मॉडेलचे अनावरण करण्यात आले.
नदवी म्हणाले, सर्व गोष्टी अल्लाहच्या नियंत्रणात आहेत. त्याच्या इच्छेनुसार काहीही घडू शकते. त्यांच्या इच्छेनुसार आपण वागलो तर आपल्या परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो. देशातील सर्व लोक एकसारखे आहेत. त्यामुळे मुस्लिमांना कुणी नुकसान पोहोचवू शकत नाही. ज्या लोकांसोबत राहतो, त्यांच्यामध्ये मुस्लिमांबद्दल अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्याची आपली जबाबदारी आहे. प्रत्येक धर्मीयाचा स्वाभिमान असतो. तो दुखावता कामा नये. आपल्यातील चांगल्या गोष्टी गैरमुस्लिमांना सांगितल्या पाहिजेत. या बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पहिल्यांदा स्वत:चे जीवन सावरा, त्याचबरोबर शांती, प्रेम आणि परस्पर स्नेहाच्या भावनेतून हिंदू धर्मीयांसोबत वर्तन करा, असे आवाहन त्यांनी केले.
एक व्हा, नेक व्हा!
झारखंडहून आलेल्या मुफ्ती हारून नदवी यांनी मुस्लिमांना एका व्यासपीठावर येण्याची साद घालून एक व्हा, नेक व्हा असे आवाहन केले. हजरत मौलाना खालीद सैफुल्ला रहमानी यांनी खोटे बोलणे अपराध आहे. परंतु परस्पर स्नेहभावासाठी, मने जोडण्यासाठी खोटे बोलण्यास हरकत नाही. मुस्लीम महिलांबरोबर हिंदू बहिणींची इज्जत आपली इज्जत आहे. त्यांचे रक्त आपले रक्त आहे, असे समजून वागा असे सांगितले. गफ्फार मलिक यांनी गैरमुस्लिमांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी, प्रेमाचा संदेश देण्यात आपण र्मयादित राहिलो तर तारीख आपल्याला माफ करेल. परंतु इतिहास कदापि माफ करणार नाही, असे सांगितले. त्याचबरोबर मौलाना असरारूल हक कासमी, मुफ्ती वसी अहमद, अब्दुल रहेमान कुरेशी यांनीही मार्गदर्शन केले.

Web Title: Remove the misunderstanding of other religions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.