शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

शेतकऱ्यांच्या पैशांवर अंबानींचा दरोडा, राजू शेट्टी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 05:27 IST

कृषी आणि महसूल विभागातील अधिका-यांच्या साहाय्याने शेतक-यांकडून विम्यापोटी कोट्यवधी रुपये जमा करून त्यांना परतावा न देणा-या अनिल अंबानी यांनी शेतक-यांच्या पैशांवर दरोडा घातला आहे

परभणी - कृषी आणि महसूल विभागातील अधिका-यांच्या साहाय्याने शेतक-यांकडून विम्यापोटी कोट्यवधी रुपये जमा करून त्यांना परतावा न देणा-या अनिल अंबानी यांनी शेतक-यांच्या पैशांवर दरोडा घातला आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा़ राजू शेट्टी यांनी येथे केला़पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांनी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पीक विमा कंपनीविरूद्ध १३ दिवसांपासून आंदोलन उभे केले आहे़ शेट्टी यांनी रविवारी आंदोलकांची भेट घेतली़ शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे सांगतानाच ते म्हणाले, पीक विम्या संदर्भात माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या असून, पुराव्यासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही नोंदविली आहे़ परंतु, मंत्री अंबानी यांच्या कार्पोरेट कंपनीसमोर गुडघे टेकत आहेत़ हा देश कार्पोरेट कंपनीला गहान ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला़कंपनीने ९ हजार ४१ कोटी रुपये विम्यापोटी जमा केले आणि परतावा मात्र केवळ ८१२ कोटी रुपयांचाच दिला आहे़ त्यामुळे ही योजना ‘अंबानी कल्याण योजना’ असल्याचेच दिसत आहे़ शेतकºयांवर तांत्रिक मुद्दे काढून गुन्हे दाखल केले जात आहेत़चंद्रकांत पाटील यांचा इतिहास कच्चाशेतकºयांच्या प्रश्नांवर आजपर्यंत मी अनेक आंदोलने यशस्वी केली आहेत़ परंतु, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इतिहास कच्चा असल्याने ते आपल्यावर टीका करीत आहेत, असे शेट्टी म्हणाले. ऊस आंदोलनावर राजू शेट्टी मोठे झाले़ आता हा प्रश्न राहिला नसल्याने दुधाचे आंदोलन केले जात आहे, अशी टीका पाटील यांनी केली होती़ त्यावर शेट्टी म्हणाले, ११ वर्षांपूर्वी मी दुधाचे आंदोलन उभारले होते़ मुंबईचा दुध पुरवठा बंद केला होता़ ठेकेदारांकडून कोण टक्केवारी घेतात? यासह बºयाच गोष्टी मलाही काढता येतात, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीnewsबातम्या