शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

दाजीसाहेबांची गळाभेट, सोनिया गांधींना फोन; धुळ्यात राहुल गांधीनी जपली 'आपुलकी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 09:03 IST

महागाई बेरोजगारी आणि भागीदारी हे या तीन मुद्द्यांवरच केंद्राची वाटचाल सुरू आहे हे तीन प्रश्न सोडविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरला आहे अशी टीका खासदार राहुल गांधी यांनी धुळ्यातील चौक सभेत केली

मुंबई/धुळे - सध्या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधत असलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज सोशल मीडियावर ट्विट करत काँग्रेसने महिलांसाठी देऊ केलेल्या ‘नारी न्याय गॅरंटी’ची घोषणा केली आहे. त्यानुसार, देशातील गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपयांची गॅरंटी देण्यात आली आहे. राहुल गांधी संध्या भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज धुळे जिल्ह्यात त्यांची सभा झाली असून धुळ्यातून त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. तर, सभेपूर्वी त्यांनी ज्येष्ठ नेते दाजीसाहेब पाटील यांची भेट घेऊन प्रकृतीची विचापूस केली. 

महागाई बेरोजगारी आणि भागीदारी हे या तीन मुद्द्यांवरच केंद्राची वाटचाल सुरू आहे हे तीन प्रश्न सोडविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरला आहे अशी टीका खासदार राहुल गांधी यांनी धुळ्यातील चौक सभेत केली. भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने खासदार राहुल गांधी यांचे धुळ्यात आगमन झाले. धुळ्यात येताच त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांची देवपूर येथील निवासस्थानी जाऊन घेतली. यावेळी त्यांनी कैसे है दाजी साहब? असं विचारित त्यांची गळाभेट घेत जादू की झप्पी दिली. तसेच, कुटुंबीयांशी संवाद साधला आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशीही फोनवरुन बोलणे करुन दिले. 

दरम्यान, काही दिपवसांपूर्वी दाजीसाहेब पाटील कोल्हापूरला गेले असता अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यावेळी, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी, ते अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर होते. येथील उपचारानंतर त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या त्यांची प्रकृती बरी असून राजकीय नेतेमंडळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घरी येऊन भेट घेत आहे. यासंदर्भाने राहुल गांधींना समजताच त्यांनीही घरी जाऊन दासीसाहेबांची भेट घेतली. 

महिलांसाठी काँग्रेसची ५ गॅरंटी

दरम्यान, राहुल गांधींनी आज सोशल मीडियातून महिलांसाठी काँग्रेसकडून ५ गॅरंटीची घोषणा केली आहे. देशात काँग्रेसचं सरकार आल्यास महिलांसाठी खालील ५ योजना सुरू केल्या जाणार आहेत.

१) महालक्ष्मी: सर्वात गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपयांची गॅरंटी२) अर्धी लोकसंख्या, पूर्ण हक्क : केंद्र सरकारमध्ये सर्व नव्या भरती प्रक्रियांचा अर्धा हिस्सा हा महिलांसाठी आरक्षित करण्याची गॅरंटी.३) शक्तीचा सन्मान : आशा, अंगणवाडी आणि मध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या महिलांच्या वेतनामध्ये केंद्र सरकारचं योगदान दुप्पट करण्याची गॅरंटी ४) अधिकार मैत्री: सर्व पंचायतीमध्ये एका अधिकार मैत्रीच्या नियुक्तीची गॅरंटी, जे महिलांना जागरूक करून त्यांना त्यांचे कायदेशीर अधिकार देण्यासाठी मदत करतील   ५) सावित्रीबाई फुले वसतीगृह : देशात नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृहांची संख्या दुप्पट करणे, प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वसतीगृत बांधण्याची गॅरंटी. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीDhuleधुळेcongressकाँग्रेसhospitalहॉस्पिटल