भरतीत कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST2021-06-10T04:24:30+5:302021-06-10T04:24:30+5:30
यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. संजय शिंदे, प्रथमेश सोनार, प्रदीप ठाकरे, बाळकृष्ण हटकर, जितेंद्र मांढरे, अमोल सिन्नरकर, सागर ...

भरतीत कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे
यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. संजय शिंदे, प्रथमेश सोनार, प्रदीप ठाकरे, बाळकृष्ण हटकर, जितेंद्र मांढरे, अमोल सिन्नरकर, सागर पाटील, मिलिंद सोनवणे, महेश नगराळे, प्रशांत देसले, राहुल गायकवाड, नीलेश पाटील, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, काही वर्षांपासून आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांनी भरती करण्यात आली. कोरोना संकटकाळात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले. शासनाने आता आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. भरती करताना सन २०२० पासून कंत्राटी पद्धतीने आरोग्य विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना रिक्त जागांवर सामावून घ्यावे, शंभरपेक्षा अधिक दिवस आरोग्य सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विचार करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.