शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

धुळ्याची राजकीय व्यवस्था घाणेरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 9:59 PM

शांतता कमिटीची बैठक : महेश मिस्तरी यांची आमदारांवर टिका

ठळक मुद्देउत्सवाला गालबोट लागणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा डीजे मोठ्या आवाजात वाजवू नये. पोलीस प्रशासन व विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करावे. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी एक खिडकी योजनेत नाव नोंदणी करून घ्यावी. उत्सव काळात मद्य प्राशन करून कुठल्याही चौकात धिंगाणा घालू नये, असे ऐकल्यास कडक शिक्षा केली जाईल. सुरक्षिततेच्या दृष्टीने मंडळांनी स्वत:च सीसीटीव्ही कॅमेरे आणून बसवावे, प्रशासनातर्फे पुरस्कार देताना त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. ४ कुठल्याही अफवा,संशयित व्यक्ती, बेवारस वस्तू आढळून आल्यास तत्काळ पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा. डीजे वाजविण्याबाबत ठरवून दिलेले नियमांची अंमलबजावणी करून प्रशासनाला सहकार्य करावे. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने २०० महिला पोलीस व होमगार्डची गणेशोत्सव काळात नियुक्ती करण्

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  :  शहरात गेल्या पाच वर्षात कर्तव्यदक्ष चार आयुक्त, चार पोलीस अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. हे सर्व प्रकार  शहरातील घाणेरड्या  राजकीय व्यवस्थेमुळे घडले असून आपल्या शहराचे आमदारही बेजाबदार आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्यांना न घाबरता शासनाकडे त्यांच्या विरोधात आपली भूमिका मांडावी, असे आक्रमक प्रतिपादन माजी नगराध्यक्ष महेश मिस्तरी यांनी येथे केले. गणेशोत्सव व बकरी ईदच्या निमित्ताने सोमवारी दुपारी नियोजन सभागृहात आयोजित शांतता कमिटीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, जि.प.चे. मुख्यकार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन,  जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते, महापौर कल्पना महाले, गजानन पाठक, मौलाना शकील, माजी आमदार शरद पाटील, डॉ. संजय पाटील, प्रदीप कर्पे, सत्तार शहा, मीना बैसाणे, वाल्मीक दामोदर, रमेश श्रीखंडे, संजय पगारे आदी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. महेश मिस्तरी म्हणाले, की चांगल्या अधिकाºयांना शहरात टिकू दिले जात नाही. गोर, गरीबांचे ओटे, अतिक्रमण काढण्याचा घाट शहरात घातला जातोय. आता तर शहराच्या आमदारांनी कालिका मंदिर व त्या परिसरात असलेले पंचमुखी हनुमान मंदिर पाडण्यासाठीचे पत्र शासनाला दिले आहे. आमदाराच्या या कृतिमुळे जनता नाराज आहे. त्यांच्या मनात खदखद आहे. आमदारांच्या विरोधात पत्रकारांनी  भूमिका मांडली तर त्यांच्यावरही दडपशाडी केली जात असून काही पत्रकारांवर तर ते मोक्का लावण्याचे पत्र  देतात. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या विरोधात शासनाकडे भूमिका मांडावी, असे त्यांनी आक्रमकपणे सांगितले. 

गणेशोत्सवानंतर उपोषण करणार दलित ज्येष्ठ नेते एम. जी. धिवरे म्हणाले, की महापालिकेच्या बाजूला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र पाडण्यापूर्वी शासनाने चर्चा करून हा विषय मार्गी लावावा, असे मनपा प्रशासनाला सूचित केले होते. परंतु, तसे न करता, कोणालाही विश्वासात न घेता हे अध्ययन केंद्र पाडण्यात आले आहे, याचा पाठीमागे कोण आहे? याची चांगलीच कल्पना असून आता गणेशोत्सव झाल्यानंतर याप्रश्नी उपोषण करणार असल्याचे त्यांनी येथे सांगितले. अध्ययन केंद्र पाडल्यामुळे दलित जनतेमध्ये  खदखद पसरली असून त्याचा स्फोट केव्हाही होऊ शकतो, असेही ते म्हणाले.