शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

मुलचेरा शिवसेना तालुका शाखेच्या वतीने सोमवारी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागत आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : शिवसेनेतर्फे मुलचेरा तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे हाती आलेले पीक नष्ट झाले. वादळी पावसामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकºयांना त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.मुलचेरा शिवसेना तालुका शाखेच्या वतीने सोमवारी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागत आहे. अनेक शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना न्याय देणे आवश्यक आहे. प्रशासनाने सदर लाभार्थ्यांची नावे यादीत टाकून सन्मान योजनेचा लाभ द्यावा, केंद्र शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत निम्मी खर्च झाली नाही. त्यामुळे शिल्लक असलेला निधी शेतकऱ्यांना द्यावा. तसेच रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू करून त्वरित शेतकऱ्यांच्या हाताला काम द्यावे, कामे सुरू केल्यास रोजगारासाठी बाहेर स्थलांतर होणार नाही. अतिवृष्टीमुळे तसेच विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे बराचसा पैसा उपाययोजना करण्यात गेला. त्यामुळे सध्या रबी हंगामासाठी बी-बियाणे व खते खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांकडे पैसे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला काम द्यावे तसेच योग्य उपाययोजना कराव्या, पीक विम्याचे पैसे सरसकट शेतकऱ्यांना द्यावे, संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा, तसेच हेक्टरी मदत न देता प्रति एकरी मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांच्या स्थितीचा विचार करून त्वरित उपाययोजना प्रशासनस्तरावरून कराव्या, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता.निवेदन देताना तालुका प्रमुख नीलकमल मंडल, शहर प्रमुख दिगंबर गावडे व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.धानोरा तहसील कार्यालयावर शिवसैनिकांची धडकशिवसेना तालुका शाखा धानोराच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकाºयांच्या नावे २५ आॅक्टोबर रोजी सोमवारला निवेदन देण्यात आले. संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा, विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम शेतकºयांना त्वरित द्यावी, व्यापारी, सावकारी कर्ज माफ करावे, कृषिपंपाचे वीज बिल माफ करावे, शेतकऱ्यांच्या मुलाची फी माफ करावी, बँकांनी कर्जमाफी होईपर्यंत कर्ज वसुली थांबविण्यात यावी, विद्यार्थी व विद्यार्थिनींना त्यांच्या शाळेपर्यंतच्या प्रवासाची सुविधा मोफत करण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. सदर निवेदन तहसीलदार के.वाय.कुनारपवार यांनी स्वीकारले. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोद्दार, सुनील पोरेड्डीवार, शिवसेना तालुका प्रमुख चंद्रशेखर उईके, नंदू कुमरे, वासुदेव शेडमाके, मुकेश बोडगेवार, नकूल बोरीकर, उमेश वड्डे, अनिकेत फलके, पुरूषोत्तम चिंचोलकर, प्रेम उंदीरवाडे, माहिन शेख, शोहेब शेख, प्रवीण बोडगेवार, देवराव मोगरकर, तुळशिदास कुकुडकर, प्रशांत धुडसे, विनोेद मेश्राम हजर होते.

टॅग्स :Socialसामाजिक