शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

नेर परिसरातून सहा महिन्यांमध्ये २०० वर जलपरी चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:39 IST

नेर येथील शेतकरी भाजीपालासह कापूस, कांदे, मका, बाजरी, भुईमूग ही नगदी पिके घेतात. दोन वर्षांपासून कोरोनाने सर्वांचीच आर्थिक ...

नेर येथील शेतकरी भाजीपालासह कापूस, कांदे, मका, बाजरी, भुईमूग ही नगदी पिके घेतात. दोन वर्षांपासून कोरोनाने सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली असली तरी त्यात शेतकऱ्यांचे अधिक नुकसान झाले आहे. यंदा सुरुवातीपासूनच पाऊस कमी होता. त्यानंतर अधिक पाऊस झाला. यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात आता नेर परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटार पंप जलपरी चोरण्याचे सत्र सुरू आहे. कानडामाना शिवारातून जी. एन. पाटील यांची तसेच दिनकर सोनवणे यांची महाल काळी शिवारातून, शिवाजी चौधरी यांची नूरनगर शिवारातून, सुरेश रामदास अहिरे यांची तर, सलग दोन ते तीन वर्षांपासून सहा वीजपंप, राकेश जयस्वाल यांच्यासह एका शेतकऱ्याची जलपरी मोटार लोणखेडी शिवारातून चोरीस गेली आहे. गेल्या सहा महिन्यांत २०० वर जलपरी व कृषीपंप चोरीस गेले आहेत.

मोटारचोरीची टोळीची शक्यता

खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. त्यातल्या त्यात वीज मोटारी चोरांच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे नेर सुरत, नागपुर महामार्गालगच्या वर्दळीच्या शेतातूनही वीज मोटारी चोरी होत असल्याने चोरट्यांना कोणाचाच धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांकडून फिर्याद घेण्यास टाळाटाळ

ज्या शेतकऱ्यांची मोटार चोरी जात आहे, त्यांच्याकडे त्या मोटारीचे बिल सापडत नाही. म्हणून पोलिसांकडे फिर्याद देण्यासाठी गेल्यास त्या शेतकऱ्यांकडे आधी बिलाची मागणी केली जाते. कायद्यानुसार हे योग्य असले तरी दोन ते चार वर्षांपूर्वी घेतलेल्या मोटारीचे बिल शेतकरी सांभाळू शकत नाही. त्यामुळे ते फिर्याद देताना बिल देऊ शकत नाही. या तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी पोलिसांपर्यंत जात नाही.

शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून मोटार चोरीचा गुन्हा दाखल केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास केल्यास इलेक्ट्रिक मोटार चोरीला निश्चितच आळा बसेल, असा विश्वास आनंद पाटील, योगेश गवळे, डाॅ. सतीश बोढरे यांनी व्यक्त केला आहे.