शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

नेर परिसरातून सहा महिन्यांमध्ये २०० वर जलपरी चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:39 IST

नेर येथील शेतकरी भाजीपालासह कापूस, कांदे, मका, बाजरी, भुईमूग ही नगदी पिके घेतात. दोन वर्षांपासून कोरोनाने सर्वांचीच आर्थिक ...

नेर येथील शेतकरी भाजीपालासह कापूस, कांदे, मका, बाजरी, भुईमूग ही नगदी पिके घेतात. दोन वर्षांपासून कोरोनाने सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली असली तरी त्यात शेतकऱ्यांचे अधिक नुकसान झाले आहे. यंदा सुरुवातीपासूनच पाऊस कमी होता. त्यानंतर अधिक पाऊस झाला. यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात आता नेर परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटार पंप जलपरी चोरण्याचे सत्र सुरू आहे. कानडामाना शिवारातून जी. एन. पाटील यांची तसेच दिनकर सोनवणे यांची महाल काळी शिवारातून, शिवाजी चौधरी यांची नूरनगर शिवारातून, सुरेश रामदास अहिरे यांची तर, सलग दोन ते तीन वर्षांपासून सहा वीजपंप, राकेश जयस्वाल यांच्यासह एका शेतकऱ्याची जलपरी मोटार लोणखेडी शिवारातून चोरीस गेली आहे. गेल्या सहा महिन्यांत २०० वर जलपरी व कृषीपंप चोरीस गेले आहेत.

मोटारचोरीची टोळीची शक्यता

खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. त्यातल्या त्यात वीज मोटारी चोरांच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे नेर सुरत, नागपुर महामार्गालगच्या वर्दळीच्या शेतातूनही वीज मोटारी चोरी होत असल्याने चोरट्यांना कोणाचाच धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांकडून फिर्याद घेण्यास टाळाटाळ

ज्या शेतकऱ्यांची मोटार चोरी जात आहे, त्यांच्याकडे त्या मोटारीचे बिल सापडत नाही. म्हणून पोलिसांकडे फिर्याद देण्यासाठी गेल्यास त्या शेतकऱ्यांकडे आधी बिलाची मागणी केली जाते. कायद्यानुसार हे योग्य असले तरी दोन ते चार वर्षांपूर्वी घेतलेल्या मोटारीचे बिल शेतकरी सांभाळू शकत नाही. त्यामुळे ते फिर्याद देताना बिल देऊ शकत नाही. या तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी पोलिसांपर्यंत जात नाही.

शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून मोटार चोरीचा गुन्हा दाखल केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास केल्यास इलेक्ट्रिक मोटार चोरीला निश्चितच आळा बसेल, असा विश्वास आनंद पाटील, योगेश गवळे, डाॅ. सतीश बोढरे यांनी व्यक्त केला आहे.