शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

चौगावला वीज कोसळल्याने कांदा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 12:19 IST

अवकाळी फटका : वादळी वायासह पाऊस, वसमार येथे शाळेवरील पत्रे उडून विजेच्या पोलवर धडकले

धुळे :  जिल्ह्यात रविवारी रात्री ठिकठिकाणी वादळी वाºयासह अवकाळी पाऊस झाला. यात चौगाव येथे विज कोसळल्याने ५०० क्विंटल कांदा जळून खाक झाला. तर वसमार येथील शाळेवरील पत्रे उडून विजेच्या पोलवर जाऊन आदळले. सुदैवाने येथे रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला. शहरात रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. तर शिरपूर शहरासह तालुक्यातील सांगवी, पळासनेर भागात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. ५०० क्विंटल कांदा जळून खाक धुळे तालुक्यातील चौगाव येथे रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. यावेळी शेतकरी ओंकार उदेलाल महाले यांच्या शेतातील कांदा चाळीवर वीज कोसळली. या कांदा चाळीत सुमारे ५०० क्विंटल कांदा भरलेला होता. वीज कोसळल्याने कांदा चाळीसह कांदा जळून खाक झाला असून शेतकºयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. यावेळी सोमनाथ पाटील, माजी सरपंच सिताराम बागले, सरपंच रामकृष्ण पाटील, माजी उपसरपंच कृष्णा माळी, कमलाकर गर्दे, रघुनाथ महाले, मंडळ अधिकारी किरण कांबळे, तलाठी कविता हाके व शेतकरी उपस्थित होते. वसमार येथे अनर्थ टळला म्हसदी- साक्री तालुक्यातील वसमार पुनर्वसन गावाला लागून पश्चिमेस शिवाजी माध्यमिक विद्यालय आहे. येथे रविवारी रात्री वादळी वाºयासह अवकाळी पाऊस झाला. वादळामुळे शाळेच्या चार वर्गखोल्यांवरील पत्रे शंभर फूट अंतरावर उडून इलेक्ट्रिक पोलवर जाऊन आदळले. इलेक्ट्रीक पोलवर पत्रे आदळल्यामुळे येथे मोठा अनर्थ ओढवला असता. परंतू सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला. याबाबत विद्यालयाच्या शिक्षकांनी महसूल विभागास माहिती दिली. तलाठी विजय बावा यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेमुळे विद्यालयाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. निजामपूरला रात्रभर वीज गायब निजामपूर- वादळी वाºयासह विजेच्या कडकडाटात रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास परिसरात अवकाळी पाऊस झाला. यामुळे विज गेल्याने नागरिक उकाड्याने अक्षरश: हैराण झाले. पूर्वी साक्री येथून मुख्य वीज वाहिनीवरुन जैताणे उपकेंद्र जोडलेले होते. आता केवळ ४ कि.मी. अंतरावरील शिवाजीनगरच्या सोलर प्रकल्पावरून जैताणे उपकेंद्र जोडलेले असतांना सुद्धा रात्रभर उपकेंद्राचा वीज पुरवठा बंद असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत होते. जैताणे वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता रोहित पाटील व त्यांच्या सहकाºयांनी सोलरकडून येणाºया मुख्य वीज वाहिनीचा ‘फॉल्ट’ शोधण्यासाठी रात्रभर प्रयत्न केले. अखेर शिवाजीनगरजवळ ‘फॉल्ट’ सापडला व सकाळी वीज पुरवठा

टॅग्स :Dhuleधुळे