शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

चौगावला वीज कोसळल्याने कांदा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 12:19 IST

अवकाळी फटका : वादळी वायासह पाऊस, वसमार येथे शाळेवरील पत्रे उडून विजेच्या पोलवर धडकले

धुळे :  जिल्ह्यात रविवारी रात्री ठिकठिकाणी वादळी वाºयासह अवकाळी पाऊस झाला. यात चौगाव येथे विज कोसळल्याने ५०० क्विंटल कांदा जळून खाक झाला. तर वसमार येथील शाळेवरील पत्रे उडून विजेच्या पोलवर जाऊन आदळले. सुदैवाने येथे रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला. शहरात रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. तर शिरपूर शहरासह तालुक्यातील सांगवी, पळासनेर भागात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. ५०० क्विंटल कांदा जळून खाक धुळे तालुक्यातील चौगाव येथे रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. यावेळी शेतकरी ओंकार उदेलाल महाले यांच्या शेतातील कांदा चाळीवर वीज कोसळली. या कांदा चाळीत सुमारे ५०० क्विंटल कांदा भरलेला होता. वीज कोसळल्याने कांदा चाळीसह कांदा जळून खाक झाला असून शेतकºयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. यावेळी सोमनाथ पाटील, माजी सरपंच सिताराम बागले, सरपंच रामकृष्ण पाटील, माजी उपसरपंच कृष्णा माळी, कमलाकर गर्दे, रघुनाथ महाले, मंडळ अधिकारी किरण कांबळे, तलाठी कविता हाके व शेतकरी उपस्थित होते. वसमार येथे अनर्थ टळला म्हसदी- साक्री तालुक्यातील वसमार पुनर्वसन गावाला लागून पश्चिमेस शिवाजी माध्यमिक विद्यालय आहे. येथे रविवारी रात्री वादळी वाºयासह अवकाळी पाऊस झाला. वादळामुळे शाळेच्या चार वर्गखोल्यांवरील पत्रे शंभर फूट अंतरावर उडून इलेक्ट्रिक पोलवर जाऊन आदळले. इलेक्ट्रीक पोलवर पत्रे आदळल्यामुळे येथे मोठा अनर्थ ओढवला असता. परंतू सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला. याबाबत विद्यालयाच्या शिक्षकांनी महसूल विभागास माहिती दिली. तलाठी विजय बावा यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेमुळे विद्यालयाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. निजामपूरला रात्रभर वीज गायब निजामपूर- वादळी वाºयासह विजेच्या कडकडाटात रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास परिसरात अवकाळी पाऊस झाला. यामुळे विज गेल्याने नागरिक उकाड्याने अक्षरश: हैराण झाले. पूर्वी साक्री येथून मुख्य वीज वाहिनीवरुन जैताणे उपकेंद्र जोडलेले होते. आता केवळ ४ कि.मी. अंतरावरील शिवाजीनगरच्या सोलर प्रकल्पावरून जैताणे उपकेंद्र जोडलेले असतांना सुद्धा रात्रभर उपकेंद्राचा वीज पुरवठा बंद असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत होते. जैताणे वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता रोहित पाटील व त्यांच्या सहकाºयांनी सोलरकडून येणाºया मुख्य वीज वाहिनीचा ‘फॉल्ट’ शोधण्यासाठी रात्रभर प्रयत्न केले. अखेर शिवाजीनगरजवळ ‘फॉल्ट’ सापडला व सकाळी वीज पुरवठा

टॅग्स :Dhuleधुळे