शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

पोषण आहारांतर्गत ग्रामीण भागात कडधान्य तर शहरात फक्त मिळतो तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करणे, शाळेतील उपस्थितीचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे शालेय पोषण ...

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करणे, शाळेतील उपस्थितीचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. दरम्यान मार्च २०२०पासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने, सर्वच शाळा बंद होत्या. या काळात विद्यार्थ्यांना घरपोच शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कडधान्य,डाळ व तांदळाचे वाटप करण्यात आले.

दरम्यान ग्रामीण भागात कडधान्य व डाळ तर शहरी भागात फक्त तांदळाचे वाटप करण्यात येत आहे. धुळे तालुक्यात पहिली ते आठवीपर्यंत पोषण आहाराचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ९७ हजार ८०० एवढी आहे.

घरपोच आहार

शाळेतील विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी शालेय पोषण आहार योजेनेंतर्गत शाळेतच आहार शिजवून विद्यार्थ्यांना दिला जात होता. मात्र मार्च २०२०पासून देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने, राज्य शासनाने सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान कोरोनाबाबत नियमांचे पालन करून गेल्यावर्षी एप्रिल-मे पासूनच विद्यार्थ्यांना घरपोच पोषण आहाराचे वितरण करण्यात येऊ लागले. आता शाळा जरी सुरू झालेल्या असल्या तरी अद्याप शाळांमध्ये आहार देण्याऐवजी विद्यार्थ्यांना घरीच पोषण आहाराचे साहित्य देण्यात येत असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.