शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

कोरोनामुळे २२ हजारांपेक्षा अधिक शेतकरी मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : गेल्या वर्षभरामध्ये सततचा पाऊस, अतिवृष्टी, वादळ, गारपिटीमुळे तब्बल ४४ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : गेल्या वर्षभरामध्ये सततचा पाऊस, अतिवृष्टी, वादळ, गारपिटीमुळे तब्बल ४४ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, त्यापैकी २१ हजार ८०० शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे तर २२ हजारांपेक्षा अधिक शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. नुकसानभरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांनादेखील केवळ मदतीचा पहिला हप्ता मिळाला आहे. दुसरा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा आहे. कोरोनामुळे शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचे सांगण्यात आले.

एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत वादळी वारा, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट व सततचा पाऊस यामुळे धुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु, ३३ टक्केवरील समाविष्ट गावांची संख्या केवळ ५०१ आहे.

१४ मे २०२० रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे १५ शेतकरी बाधित झाले होते. विशेष म्हणजे कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ३ जून २०२० रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आकडेवारी निरंक आहे. २४ जुलै २०२० रोजी झालेल्या पावसामुळे ९६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे सर्वाधिक २० हजार २८३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यात धुळे तालुक्यात एकाही शेतकऱ्याचे नुकसान झाले नाही. साक्री तालुक्यात ७ हजार ३२४, शिरपूर तालुक्यात ४ हजार ५०५, शिंदखेडा तालुक्यात ८ हजार ४५४ शेतकरी बाधित झाले आहेत.

तसेच ४ व ५ सप्टेंबर, १३ सप्टेंबर, १९ ते २४ सप्टेंबर या कालावधीत झालेले वादळी वारे, अतिवृष्टी, गारपीट व सततचा पाऊस यामुळे धुळे तालुक्यात ६९०, साक्री तालुक्यात १९ हजार ४६०, शिंदखेडात १ हजार ३५६ आणि शिरपूर तालुक्यातील ७१५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

दिनांक १४ ते २० ऑक्टोबर दरम्यान झालेल्या वादळी पावसामुळे शिरपूर तालुक्यात ४२४ फलोत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दिनांक ११ ते १४ डिसेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे शिंदखेडा तालुक्यात ९११ आणि शिरपूर तालुक्यात २९ अशा एकूण ९४० शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

दरम्यान, सन २०२१मध्येही जिल्ह्यात दोन ते तीनवेळा अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळाचा अनेक गावांना फटका बसला आहे. प्रशासनाने पंचनामा केला आहे. परंतु, शासन, प्रशासन कोरोनाच्या कामात व्यस्त असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा मागे पडला आहे.

दरम्यान, बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.