शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

भाेई समाजाची बैठक उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:36 IST

धुळे : महाराष्ट्र प्रदेश भोईसमाज हितरक्षक दल संघटनेची बैठक झाली. संस्थापक अध्यक्ष नंदकुमार मोरे (अमरावती) यांनी मार्गदर्शन केले. ...

धुळे : महाराष्ट्र प्रदेश भोईसमाज हितरक्षक दल संघटनेची बैठक झाली. संस्थापक अध्यक्ष नंदकुमार मोरे (अमरावती) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेश अध्यक्ष रमेश मोरे, स्वप्नराज खेडकर उपस्थित होते. सूत्रसंचालन कृष्णा फुलपगारे यांनी केले.

पलाश नहार सीए परीक्षेत उत्तीर्ण

धुळे : नोव्हेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या सीए परीक्षेत पलाश आनंद नहार हा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेला आहे. तो आग्रारोडवरील नहार फर्निचरचे मालक आनंद अशोक नहार यांचा मुलगा आहे. त्याला के. यू. नाबरिया व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कटारिया यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फरशी पुलावर पथदिवे लावावेत

धुळे : शहरातील कालिकामाता मंदिरापासून देवपूर भागाकडे जाण्यासाठी नागरिकांना फरशी पुलावरूनच जावे लागते. मात्र या पुलावर पथदिवे नसल्याने, रात्रीच्या वेळी अंधार असतो. पुलावर खड्डे पडलेले असल्याने, रात्रीच्या वेळी नदीपात्रात पडण्याची भीती असते. त्यामुळे या पुलावर पथदिवे बसवावेत, अशी मागणी आहे.

ग्रामीण भागात गुटखाविक्री सुरू

शिरपूर : गुटखाविक्रीला बंदी असतांनाही तालु्क्यातील ग्रामीण भाग तसेच पाड्यांवर गुटखा विक्री जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या पाड्यांवर याची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असून, यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

पेट्रोलचे दर कमी करण्याची मागणी

शिंदखेडा : गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोलच्या दरात सारखी वाढ होत असल्याने, सर्वसामान्य नागरिकांना वाहने चालविणे कठीण झालेले आहे. केंद्र शासनाने पेट्रोलचे दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणी वाहनधारकांनी केले आहे.

विनापरवाना लावलेले फलक काढण्यात यावेत

धुळे : शहरात विनापरवाना फलक लावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. वर्दळीच्या चौकात काहीजण वाढदिवस, होणारे कार्यक्रम यांचे मोठ-मोठे फलक लावत असतात. यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत असून, या फलकांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनापरवाना फलक लावणाऱ्यांवर कारवाई करावी.

वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी

धुळे : शहरातील पारोळा चौफुलीवर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यातच खासगी वाहनेही याच रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी.

वरिष्ठ महाविद्यालये लवकर सुरू करा

साक्री : शासनाने पाचवी ते १२वीपर्यंतचे शाळा, महाविद्यालये सुरू केेलेली आहेत. मात्र अद्याप वरिष्ठ महाविद्यालये सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शासनाने वरिष्ठ महाविद्यालये सुरू करावीत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे.

आधार अपडेट केंद्र सुरू करावीत

धुळे : कोरोनापूर्वी जिल्ह्यात आधारकार्ड अपडेट केंद्र अनेक ठिकाणी होती. मात्र आता त्याची संख्या कमी करण्यात आलेली आहे. आता प्रत्येक योजनेसाठी आधारची गरज असल्याने, ते अपडेट असणे गरजेचे आहेत. त्यामुळे अपडेट केंद्राची संख्या वाढविण्याची गरज आहे

नवीन वसाहतींमध्ये सुविधांचा अभाव

पिंपळनेर : शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. चौहुदिशांनी नवीन वसाहती निर्माण झालेल्या आहेत. मात्र नवीन वसाहतींमध्ये अजुनही सुविधांचा अभाव आहे. गटारी नसल्याने पाणी रस्त्यावरच सोडावे लागत असून, येथेही सुविधा देण्याची गरज आहे.