शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 13:46 IST

जम्मू काश्मीरमधून भारताचे संविधान हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

PM Narendra Modi : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान गुरुवारी आमदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. सत्ताधारी आणि विरोधी भाजपच्या आमदारांनी एकमेकांची कॉलर पकडून एकमेकांना धक्काबुक्की केली. एका आमदारने कलम ३७० मागे घेण्याचा बॅनर सभागृहात फडकावला. याला भाजप आमदार आणि विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी विरोध केला. त्यावरुन मोठा गोंधळ उडाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात बोलताना काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून जम्मू काश्मीरमधून भारताचे संविधान हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटलं आहे.

कलम ३७० लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यास भाजप आमदारांचा विरोध असल्याने गेल्या दोन दिवसांपासून जम्मू काश्मीरच्या सभागृहात गदारोळ सुरू आहे. उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी मंगळवारी हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ उडाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या प्रकाराबाबत भाष्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि मित्रपक्षांवर निशाणा साधला.

"काँग्रेसने मित्र पक्षांसोबत मिळून सत्ता मिळवताच जम्मू-काश्मीरमध्ये कट रचण्यास सुरुवात केली आहे. जम्मू काश्मीरच्या विधानसभेत जे काही झालं ते तुम्ही पाहिले असेल. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाने कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे विधेयक मंजूर केले आहे. देश हे स्वीकार करेल का. तुम्ही याच्याशी सहमत आहात का. काश्मीरला तोडण्याचा काँग्रेसचा हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का. कलम ३७० च्या समर्थनात विधानसभेमध्ये बॅनर फडकवण्यात आले. जेव्हा भाजपच्या आमदारांनी विरोध केला तेव्हा त्यांना उचलून बाहेर फेकण्यात आले. काँग्रेस आणि त्यांचा मित्र पक्षांचे सत्य सगळ्या देशाला आणि महाराष्ट्राला समजायला हवं. काँग्रेसने जम्मू-काश्मीर मधून भारताचे संविधान हटवण्याचे विधेयक मंजूर केले आहे," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

"स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर जम्मू-काश्मीर मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लागू झाले आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना हे सहन होत नाहीये. मी काँग्रेस आणि इथल्या आघाडीतल्या लोकांना सांगू इच्छितो पाकिस्तानच्या अजेंड्याला देशात प्रोत्साहन देऊ नका. फुटिरतावाद्यांना साथ देऊ नका. जोपर्यंत मोदीवर जनतेचा आशीर्वाद तोवर काश्मीरातून बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हटवू शकत नाही. जगातील कुठलीही शक्ती जम्मू काश्मीरात कलम ३७० पुन्हा लागू करू शकत नाही," असा इशाराही पंतप्रधान मोदींनी दिला. 

देशातील आदिवासी जाती लढत राहण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न - पंतप्रधान मोदी

"काँग्रेस जाती जाती मध्ये भांडणे लावण्यासाठी प्रयत्न करत आहे. यातून काँग्रेस दलीत, आदिवासी, मागास वर्गाला पुढे जावू देत नाही. स्वातंत्र्य लढ्यातील बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, वंचितांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले मात्र नेहरू यांनी ते न होण्यासाठी प्रयत्न केले. मोठ्या अडचणीत डॉ.आंबेडकरांनी आरक्षण दिले. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी देखील एस.सी.,एस.टी., ओबीसी यांचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा प्रयत्न केला. राजीव गांधी यांनी देखील ओबीसी आरक्षणचा विरोध केला होता. हा समाज मजबूत झाला तर त्यांच्या राजकारणाचे दुकान बंद होईल ही त्यांना भीती होती. या परिवाराची चौथी पिढी, त्यांचे युवराज आता तेच काम करत आहे. एस.सी., एस.टी. ओबीसी समाजात फूट पाडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांची एकजूट तोडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ते ओबीसी समाजाला जाती जातीत वाद लावत आहेत. त्यांना लहान लहान जातीत नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. स्थानिक आदिवासी जातींना एकमेकांमध्ये लढवत आहे. आदिवासींची ओळख, एकता तोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न. आदिवासींची एकता काँग्रेसला सहन होत नाही. देशभरातील आदिवासी जाती एकमेकांमध्ये लढत राहावेत यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. भारताच्या विरोधात यापेक्षा दुसरे कारस्थान होवू शकत नाही," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीDhuleधुळेArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर