शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

जिल्ह्यातील ९३ शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:24 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळांचाच आधार आहे. या शाळांमध्येही चांगल्यापैकी शिक्षण मिळत असते. मात्र अनेक पालकांचा ओढा हा ...

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळांचाच आधार आहे. या शाळांमध्येही चांगल्यापैकी शिक्षण मिळत असते. मात्र अनेक पालकांचा ओढा हा पाल्याला इंग्रजी, अथवा सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न असल्याने, गेल्या काही वर्षांमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. पूर्वी एकेका वर्गात ३०-३५ विद्यार्थी असायचे, ती संख्या आता कमी होऊ लागली आहे. जिल्ह्यात १०६ शाळा अशा आहेत की त्यांची संख्या २० पर्यंतच मर्यादित आहे. त्यातही यातील ९३ शाळांमध्ये २० पेक्षाही कमी पटसंख्या आहे.

पहिली ते चौथीपर्यंतचे शैक्षणिक वर्ष नेमके केव्हापासून सुरू होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे शासनाचे विचाराधीन आहे. विद्यार्थी अथवा शिक्षकांचेही समायोजन झाल्यास, त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर अथवा शिकविणाऱ्यावरही कुठलाच परिणाम होणार नाही. दरम्यान जूनपासून शाळा सुरू झाल्या, आणि तत्पूर्वी विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले अन‌् शाळांची संख्या २० पेक्षा जास्त झाली तर या शाळांवरील संकटही टळू शकते. यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढविण्याची शाळांच्या शिक्षकांवर जबाबदारी येऊन ठेपली आहे.

या शाळांचे होणार समायोजन

२०१८ मध्येही राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने १० पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यानुसार जिल्ह्यातील १० शाळांचे लगतच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले होते. आता ज्या शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या आहे, अशा शाळांचेही लगतच्या शाळांमध्ये समायोजन होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

साक्री तालुक्यातील शाळांची संख्या जास्त

२० पेक्षा कमी पटसंख्या असेलेल्या शाळांमध्ये साक्री तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची संख्या सर्वाधिक आहे. या तालुक्यात तब्बल ५८ शाळांमध्ये २० पेक्षाही कमी पटसंख्या असल्याचे शिक्षण विभागाची आकडेवारी आहे. त्याखालोखाल शिरपूर तालुक्यातील १५, धुळे तालुक्यातील १३ शाळांमध्येही कमी पटसंख्या आहे. तर शिंदखेडा तालुक्यात फक्त सहा शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या आहे.

ज्या शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या आहे, अशा शाळा शासनाने बंद केल्यास, त्या ठिकाणी शिकविणाऱ्या शिक्षकांचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षकांचेही जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये समायोजन करावे लागेल.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच त्यांना शाळेत येण्या-जाण्यासही त्रास होऊ नये हा सारासार विचार करून त्यांनाही गावापासून अगदी जवळ असलेल्या शाळांमध्ये दाखल करून घेतले जाण्याची शक्यता आहे.