शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

जिल्ह्यातील ९३ शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:24 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळांचाच आधार आहे. या शाळांमध्येही चांगल्यापैकी शिक्षण मिळत असते. मात्र अनेक पालकांचा ओढा हा ...

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळांचाच आधार आहे. या शाळांमध्येही चांगल्यापैकी शिक्षण मिळत असते. मात्र अनेक पालकांचा ओढा हा पाल्याला इंग्रजी, अथवा सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न असल्याने, गेल्या काही वर्षांमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. पूर्वी एकेका वर्गात ३०-३५ विद्यार्थी असायचे, ती संख्या आता कमी होऊ लागली आहे. जिल्ह्यात १०६ शाळा अशा आहेत की त्यांची संख्या २० पर्यंतच मर्यादित आहे. त्यातही यातील ९३ शाळांमध्ये २० पेक्षाही कमी पटसंख्या आहे.

पहिली ते चौथीपर्यंतचे शैक्षणिक वर्ष नेमके केव्हापासून सुरू होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे शासनाचे विचाराधीन आहे. विद्यार्थी अथवा शिक्षकांचेही समायोजन झाल्यास, त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर अथवा शिकविणाऱ्यावरही कुठलाच परिणाम होणार नाही. दरम्यान जूनपासून शाळा सुरू झाल्या, आणि तत्पूर्वी विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले अन‌् शाळांची संख्या २० पेक्षा जास्त झाली तर या शाळांवरील संकटही टळू शकते. यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढविण्याची शाळांच्या शिक्षकांवर जबाबदारी येऊन ठेपली आहे.

या शाळांचे होणार समायोजन

२०१८ मध्येही राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने १० पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यानुसार जिल्ह्यातील १० शाळांचे लगतच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले होते. आता ज्या शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या आहे, अशा शाळांचेही लगतच्या शाळांमध्ये समायोजन होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

साक्री तालुक्यातील शाळांची संख्या जास्त

२० पेक्षा कमी पटसंख्या असेलेल्या शाळांमध्ये साक्री तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची संख्या सर्वाधिक आहे. या तालुक्यात तब्बल ५८ शाळांमध्ये २० पेक्षाही कमी पटसंख्या असल्याचे शिक्षण विभागाची आकडेवारी आहे. त्याखालोखाल शिरपूर तालुक्यातील १५, धुळे तालुक्यातील १३ शाळांमध्येही कमी पटसंख्या आहे. तर शिंदखेडा तालुक्यात फक्त सहा शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या आहे.

ज्या शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या आहे, अशा शाळा शासनाने बंद केल्यास, त्या ठिकाणी शिकविणाऱ्या शिक्षकांचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षकांचेही जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये समायोजन करावे लागेल.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच त्यांना शाळेत येण्या-जाण्यासही त्रास होऊ नये हा सारासार विचार करून त्यांनाही गावापासून अगदी जवळ असलेल्या शाळांमध्ये दाखल करून घेतले जाण्याची शक्यता आहे.