शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

"मुख्यमंत्री पदावर महिला बसली तर आनंदच, पण...", चित्रा वाघ यांनी घेतला उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 18:25 IST

Chitra Wagh : स्त्री आणि पुरुष म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून आम्ही आहोत, त्यामुळे जी व्यक्ती ज्या मुख्यमंत्रीपदावरती बसेल, मंत्रीपद सांभाळल्यानंतर त्यांनी सगळ्या जबाबदारीने काम केलं पाहिजे, सगळ्या घटकांना न्याय दिला पाहिजे, आमचं हेच मत आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या. 

धुळे : भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ रविवारी धुळे दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. महिला मुख्यमंत्री होण्यावर चित्रा वाघ यांनी आपले मत व्यक्त करताना मुख्यमंत्री पदावर महिला बसली तर आम्हाला आनंदच आहे, पण महिला मुख्यमंत्री झाल्यानंतर आमचे सगळे प्रश्न सुटतील, या मताशी मी सहमत नाही. स्त्री आणि पुरुष म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून आम्ही आहोत, त्यामुळे जी व्यक्ती ज्या मुख्यमंत्रीपदावरती बसेल, मंत्रीपद सांभाळल्यानंतर त्यांनी सगळ्या जबाबदारीने काम केलं पाहिजे, सगळ्या घटकांना न्याय दिला पाहिजे, आमचं हेच मत आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या. 

कर्नाटकची महाराष्ट्रात देखील घुसखोरी होत असून नागपूर येथील विमानतळावर लागलेल्या बॅनर वरून संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील चित्रा वाघ यांनी समाचार घेतला आहे. संजय राऊत हे अंतर्यामी आहेत ते काहीही बोलू शकतात, आमच्यासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचे स्टेटमेंट महत्त्वाचे असून टाचणी भर देखील जागा कुणालाही देणार नाही, यासाठी शिंदे व फडणवीसांचे सक्षम सरकार आहे, ज्यांना जे बोलायचं आहे ते त्यांना बोलू द्या, महाराष्ट्राची काळजी करण्यासाठी महाराष्ट्राच सरकार खंबीर आहे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले. 

प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मावरून केलेल्या विधानावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चित्रा वाघ यांनी मी प्रवासात असल्यामुळे कोण काय बोलले आहे, याची मला माहिती नाही आणि त्यामुळे ज्या गोष्टीची माहिती नाही. त्यावर बोलणं उचित नसल्याचे म्हणत या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच, मी हे पूर्ण ऐकले नसून परंतु प्रसाद लाड यांनी त्यामागची भूमिका देखील स्पष्टपणे बोलून दाखविले असल्याचे मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केले आहे. बराच वेळा केलेल्या विधानाचा विपर्यास केला जातो असे देखील चित्रा वाघ यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.  

आगामी मंत्रिमंडळ विस्तारत महिलांना स्थान मिळेल का? यावर बोलतांना चित्रा वाघ यांनी आपले मत व्यक्त केले आहे. एक नको तर मी तर म्हणते दोन तीन महिला ह्या मंत्री मंडळात मंत्री व्हायला पाहिजेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितपणे तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये चांगल्या सक्षम अशा आमच्या आमदार आहेत. त्या मंत्री म्हणून काम करताना दिसतील, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी मुख्यमंत्री महिला असेल, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा देखील चित्रा वाघ यांनी धुळ्यात समाचार घेतला. 

महिला मुख्यमंत्री करण्याचा मुद्दा ज्यांनी उपस्थित केला. त्यांनी मुख्यमंत्री पदाची आपली हाऊस फिटली. त्यानंतर त्यांना आता महिला मुख्यमंत्री करण्याची आठवण आली आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. तसेच, सरकार पडणार व मध्यवर्ती निवडणुका लागणार हे वारंवार भविष्य वर्तवणाऱ्या विरोधकांवर टीका करताना अजित पवार यांनी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांची ट्युशन घ्यावी असे चित्रा वाघ म्हणाल्या. अजित पवार यांनी यापूर्वीच कुठल्याही मध्यवर्ती निवडणुका लागणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर देखील, अशा प्रकारचे वक्तव्य केले जात असल्यामुळे विरोधकांची अजित पवार यांनी असे वक्तव्य करणाऱ्यांची ट्युशन घ्यावी असे म्हणत, सरकार पडणार व मध्यवर्ती निवडणुका लागणार असे म्हणणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघDhuleधुळेBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे