शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

पावसाळ्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापन समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 21:55 IST

पालकमंत्री : आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज, प्रत्येक कार्यालयात नियंत्रण कक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय विभागांनी दक्षता बाळगत सतर्क राहावे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पावसाळ्यासाठी तयार केलेल्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. पावसाळ्यातील आपत्तींचा सामना करण्यासाठी जिल्हा स्तरावर व्यवस्थापन समिती स्थापन केल्याची माहितीही त्यांनी दिली़जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सोमवारी दुपारी मान्सूनपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी आमदार फारुक शाह, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय यादव, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री सत्तार म्हणाले, कोणतीही नैसर्गिक आपत्ती सांगून येत नाही. त्यामुळे प्रत्येक विभागाने दक्षता बाळगत सतर्क राहिले पाहिजे. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीच थांबावे. पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून घ्यावा. शुध्द पाण्याचा पुरवठा होईल, असे नियोजन करावे. पावसाळ्यात शेतकऱ्यांना बि- बियाणे, रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा. तसेच महानगरपालिकेने फोम टेंडर खरेदीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून आपला अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करावा.यावेळी जिल्हाधिकाºयांनी सांगितले, धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विविध विभागांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करून तेथे कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. आजपासून पावसाची आकडेवारी संकलित करण्यास सुरवात होईल. धुळे जिल्ह्यातील ९२ गावे पूररेषेत येत असल्याचे त्यांनी सांगत सर्व शासकीय विभाग सज्ज असल्याचे सांगितले.निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी सांगितले, धुळे येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे मुख्यालय आहे. या विभागाने गेल्या वर्षी कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या पुराच्या वेळी प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे. या दलाचे जिल्हा प्रशासनास नेहमीच सहकार्य असते.पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त शेख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. एम. मोहन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता भदाणे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वास दराडे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ, सहकार निबंधक मनोज चौधरी आदींनी आपापल्या विभागांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पावसाळ्यातील आपत्ती निवारणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच प्रास्ताविक, सूत्रसंचालन करून आभार मानले.गेल्या वर्षी पावसाळ्यात अतीवृष्टीमुळे अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडल्याने पांझरा नदीला पूर आला होता़ त्यात दोन पुलांचे मोठे नुकसान झाले होते़ त्यामुळे यंदा प्रशासन अधिक सतर्क आहे़वादळाचा सामना करण्यासाठी दक्ष रहाअरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाले आहे. ते गुजरातच्या दिशेने जात आहे. या वादळामुळे धुळे जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवेगाने वारे वाहतील, असा इशारा वेधशाळेने दिला आहे. पावसाचीही शक्यता आहे़ अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनीसह अन्य संबंधित सर्व विभागाच्या प्रमुखांनी दक्ष राहावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले़

टॅग्स :Dhuleधुळे