शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

आठ दिवसात समस्या निकाली काढली नाही, तर वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST

या निवेदनात म्हटले आहे की, गावातील नूतन कॉलनी व महादेववाडीत वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. रात्री वारंवार वीज ...

या निवेदनात म्हटले आहे की, गावातील नूतन कॉलनी व महादेववाडीत वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. रात्री वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. ज्येष्ठ नागरिक अंधारात पडण्याचे प्रसंग घडतात. वारंवार होत असलेल्या विजेच्या लपंडावामुळे विद्युत उपकरणांचे नुकसान होत आहे. नियमितपणे बिल वेळेवर भरून देखील हा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली ही समस्या वीज वितरण कंपनीने आठ दिवसात निकाली काढली नाही, तर कापडणे येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्या वैशाली माळी, महेश बडगुजर, संदीप माळी, मनोज शिंपी, श्याम बडगुजर, पूनम माळी, संजय माळी, राजेंद्र माळी, सहादू माळी, बापू उत्तम माळी, सुरेश माळी, धर्मा माळी, प्रकाश पंडित माळी, शिवराम चौधरी, नानाभाऊ माळी, रमेश माळी, कलाबाई चौधरी, प्रतिभा माळी, शिवाजी माळी, भूषण माळी, भागवत माळी, चुडामन माळी, शरद माळी, सरलाबाई माळी, हिराबाई माळी, जिजाबाई माळी, आशाबाई माळी, प्रफुल्ल माळी आदींच्या सह्या आहेत.

(चौकट)

गेल्या अनेक दिवसांपासून गावात काही भागामध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. याबाबत स्थानिक सहायक अभियंता यांना निवेदने देण्यात आली. मात्र या समस्या अजूनही निकाली निघत नाहीत. ग्रामस्थांनी निवेदन दिले तेव्हा महिलांनी अंजली हिंगमिरे यांच्याकडे संताप व्यक्त केला. अधिकारी ग्रामस्थांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.