शिवभोजन केंद्रातून भागतेय गरीबांची भूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:33 IST2021-04-12T04:33:58+5:302021-04-12T04:33:58+5:30
शिवभोजनाची थाळी पूर्वी १० रुपयाला मिळत होती़ ती थाळी आता राज्य सरकारने १० रुपयांऐवजी ५ रुपयांत जाहीर केल्यानंतर ...

शिवभोजन केंद्रातून भागतेय गरीबांची भूक
शिवभोजनाची थाळी पूर्वी १० रुपयाला मिळत होती़ ती थाळी आता राज्य सरकारने १० रुपयांऐवजी ५ रुपयांत जाहीर केल्यानंतर धुळ्यात काही शिवभोजन केंद्र चालक गोरगरीब, गरजू नागरिकांना मोफत जेवण देत आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
लॉकडाऊनमुळे हातावर काम करणाऱ्यांची उपासमार होत आहे. त्यांनी उपाशी राहू नये यासाठी राज्य सरकारनं शिवभोजन थाळीचा दर १० रुपयांवरून ५ रुपये केला. एरवी दुपारी १२ ते २ यावेळेत सुरू राहणारं शिवभोजन केंद्र सध्या सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत सुरू राहत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच पालन, तसेच शासनाच्या सूचनांप्रमाणे योग्य ती दक्षता देखील याठिकाणी घेण्यात येतेय.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी थाळीत जेवण न देता पॅकिंग स्वरूपात जेवण देण्यात येतंय. यात भाजी, पोळी, दाळ, भात यांचा समावेश आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता हा प्रतिसाद चांगला असल्याचं शिवभोजन केंद्र चालक सांगतात. ठरवून दिलेल्या वेळेच्या अगोदरच शिवभोजन थाळी संपूण जात असल्याचे चित्र बसस्थानकानजीक असलेल्या शिवभोजन केंद्रात दिसून आले.