शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

हृदय हेलावणारी घटना! निष्ठुर बापाने चिमुकल्यांना तापी नदीत फेकले, घरी परतला पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:57 IST

Crime News: दिनांक ४  रोजी सुनील हा दोन्ही मुलांना आजीकडे घेऊन जातो, असे सांगून घेऊन गेला. मात्र संध्याकाळी एकटाच परत आला.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये हृदय हेलावून टाकेल अशी घटना घडली आहे. थाळनेर येथील एका दारुड्या बापाने आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांना तापी नदीच्या पाण्यात फेकले आहे. पाण्यात पडल्याने या मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे धुळे जिल्हा हादरला आहे.  याप्रकरणी मुलांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुलांच्या वडिलाविरोधात खुनाचा गुन्हा थाळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. थाळनेर येथील सुनील नारायण कोळी याला दारुचे व्यसन होते. पत्नी छायाबाई आणि सुनील यांच्यात नेहमी वाद होत होता. छायाबाई या बऱ्याच दिवसापासून माहेरी होत्या. पंधरा दिवसांपूर्वी त्या माहेरून थाळनेर येथे आल्या होत्या. सुनील व छायाबाई यांना कार्तिक सुनील कोळी (वय ६)  व चेतना सुनील कोळी (वय ३)  अशी दोन मुले होती. 

दिनांक ४  रोजी सुनील हा दोन्ही मुलांना आजीकडे घेऊन जातो, असे सांगून घेऊन गेला. मात्र संध्याकाळी एकटाच परत आला. यावेळी छायाबाई यांनी विचारले असता त्यांना आजीकडे सोडून आल्याचे सांगितले. मात्र त्याने दोन्ही मुलांना तापी नदी पात्रात फेकून दिलेले होते. संध्याकाळी कार्तिक व चेतना यांना तापी नदी पात्रातील काठावर असलेल्या झाडीतून बाहेर काढण्यात आले. थाळनेर येथे रुग्णालयात दाखल केले असता दोन्ही बालकांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी छायाबाई सुनील कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचे पती सुनील नारायण कोळी यांच्या विरोधात मुलांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

टॅग्स :Tapi riverतापी नदीCrime Newsगुन्हेगारी