शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

कचरा डेपोला लागली पुन्हा आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 10:38 PM

महापालिका : वरखेडी रोडवर गंभीर स्थिती, धुरामुळे जाणवतोय सर्वांना त्रास

धुळे : शहरातील वरखेडी रोडवर असलेल्या कचरा डेपोला गुरुवारी सायंकाळी अचानक आग लागली़ शुक्रवारी दुपारपर्यंत आगीच्या ज्वाला आणि धूर निघत असल्यामुळे या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला़  कचरा डेपोला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे़ हा विरोध वेळोवेळी नागरिकांनी महापालिकेकडे व्यक्त केला आहे़ आगीच्या धुरामुळे समोरुन येणारे वाहन दिसत नाही़ त्यामुळे  अनेक अपघात झाले आहे़  तर काहींना जीवदेखील गमवावा लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मनपास कचरा टाकण्यासाठी दुसरा पर्याय नाही़ त्यामुळे संपूर्ण शहराचा कचरा येथे टाकला जातो़ कचरा जास्त व जागेचा अभाव यातून मार्ग निघावा यासाठी आग लावली जात असावी, अशी शक्यता आहे़ त्यामुळे कचरा जळून कमी झाल्यावर जागेची अडचण दूर होते़ त्यामुळे बाराही महिने धगधगणाºया कचरा डेपोचे आगीचे कारण गुलदस्त्यात असल्याचे समोर येत आहे़ वरखेडी गावापासून दोन-तीन किमी अंतरावरील डेपोला नागरिकांचा विरोध असतानाही मनपाने नागरिकांचे प्रश्न न सोडविता दुर्लक्ष केले आहे़ परिसरात कचरा डेपोमुळे सतत जाणवणारी तीव्र दुर्गंधी, दूषित झालेले पाणी व डेपोवर कायम वावरणाºया मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागते़ डेपोजवळ दिव्यांची व्यवस्था नाही. शहर परिसरातील मृत जनावरेही येथे आणून टाकली जातात. कचरा डेपोला बाराही महिने आग लागतेच कशी? हे समजू शकलेले नाही़ आतापर्यंत किती वेळा आग लागली असावी, याबाबत कुठलीही नोंद नाही़समस्या कधी सुटणाऱ़़पूर्वीच्या काळी कचरा डेपोमध्ये इतक्या प्रमाणावर कचरा संकलन होत नव्हता़ पण, सध्याच्या काळात शहराचा वाढणार विस्तार लक्षात घेता याच कचºयाच्या डेपोमध्ये त्याचे प्रमाण कितीतरी पटीने वाढलेले दिसते़ याचा सर्वाधिक त्रास या रस्त्यावरून वावरणाºया नागरिकांना आणि याच परिसरात राहणाºया नागरिकांना भोगावा लागत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे