शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

पांझरा व जामखेडी प्रकल्पांच्या मुख्य कालवा व वितरिकांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:38 IST

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील पांझरा व जामखेडी प्रकल्पांच्या मुख्य कालवा व वितरिकांच्या देखभाल दुरुस्तीसाठी तसेच विविध विकासकामांसाठी निधी मिळावा, ...

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील पांझरा व जामखेडी प्रकल्पांच्या मुख्य कालवा व वितरिकांच्या देखभाल दुरुस्तीसाठी तसेच विविध विकासकामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन दहिते यांनी केली. बारीपाडा येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नुकतेच दाैऱ्यावर आले असताना त्यांना निवेदन देण्यात आले.

तालुक्यातील विकासकामांसाठी बजेटमध्ये आर्थिक तरतूद करून निधी मिळावा. निजामपूर, ता.साक्री बाह्यवळण रस्त्याचे भूसंपादन व रस्ता बांधकाम कामासाठी निधीची २०२१-२२च्या अर्थसंकल्पात तरतूद व्हावी तसेच पांझरा व जामखेडी प्रकल्पांच्या मुख्य कालवा व वितरिका यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध व्हावा.

सरवड फाटा, लामकानी, निजामपूर, ब्राह्मणवेल असा ६४ किमी लांबीचा रस्ता मंजूर झाला असून, त्याचे काम प्रगतिपथावर आहे. हा रस्ता निजामपूर गावातून जात आहे. पंचक्रोशीतील गावांची बाजारपेठ असलेल्या निजामपूर गावातून अवजड वाहनांची वाहतूक सुरक्षित नाही. याकरिता बाह्यवळण रस्ता आवश्यक आहे. मात्र, सदर निविदेत भूसंपादन करणे समाविष्ट नसल्याने बाह्यवळण रस्त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. फेब्रुवारी २०२१-२२च्या अर्थसंकल्पात भूसंपादन करण्यासाठी अल्पस्वरूपात एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. परंतु भूसंपादनास सुमारे १० कोटी आवश्यक आहे. त्याचबरोबर बाह्यवळण रस्त्याच्या बांधकामासाठी रुपये आठ कोटी खर्च अपेक्षित आहे. येत्या अर्थसंकल्पात एकूण १८ कोटी रुपये निधीची तरतूद होणे आवश्यक आहे.

तसेच साक्री तालुक्यातील पांझरा मध्यम प्रकल्प हा सन १९७२ साली पूर्ण झाला असून, या प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता ३५ दशलक्ष घनमीटर एवढी आहे व सिंचन क्षेत्र ६८६८ हेक्टर आहे. सदर प्रकल्पाचे दगडी बांधकाम करण्यात आले आहे. जास्त कालावधी झाल्याने सर्व बांधकाम जीर्ण झालेले आहे. सदर प्रकल्पाचे मुख्य कालवा व वितरिकांचे नूतनीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची उपलब्धता होऊ शकेल. सदर उजवा कालव्याची वितरिका एक व डाव्या कालव्याची वितरिका १० या पिंपळनेरच्या शहरी भागातून जात असल्याने त्यांची देखभाल होत नाही म्हणून त्या चाऱ्या बंदिस्त पाइपद्वारे करण्यात याव्यात. त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा तसेच जामखेड मध्यम प्रकल्प सन १९९८ साली पूर्ण झाला असून, पाणीसाठा १२.५० दशलक्ष घनमीटर एवढी क्षमता आहे. सदर प्रकल्पाचे मुख्य कालवा एक ते १४ किमीमध्ये मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे. त्यामुळे आदिवासी बागायतदार शेतकरी शेतीपासून वंचित राहत आहेत. सदर कालव्याचे अस्तारीकरण करणे आवश्यक आहे. त्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधिताना आदेश देण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.