शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पिक कर्जाच्या विवंचनेत अंचाळेतांडा येथे शेतकºयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 21:23 IST

गावात व्यक्त झाली हळहळ, परिवाराची वाताहत

धुळे : परतीच्या पावसात अतिवृष्टी झाल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले़ त्यात बँकेच्या कर्जामुळे हवालदिल झालेल्या शेतकºयाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली़ ही घटना धुळे तालुक्यातील अंचाळेतांडा गावात घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे़ धुळे तालुक्यातील अंचाळेतांडा येथील नाना बाळू जाधव (४५) या शेतकºयाचे गावशिवारात शेत आहे़ या जमिनीवरच तो पत्नीसह चार मुलांचे पालनपोषण करतो़ त्याने त्याच्या शेतात यंदा कपाशी आणि बाजरीचे पीक घेतले आहे़ परतीच्या पावसात अतिवृष्टी झाल्याने शेतात पाणी साचले आहे़ परिणामी कपाशी आणि बाजरीचे नुकसान झाले आहे़ आताच्या परिस्थितीत पावसाने उघडीप दिली असलीतरी शेतात पाणी साचलेले असल्याने पीक काळे पडून कपाशीच्या बोंडाला कीड लागली आहे़ बाजरीच्या कणसांनाही कोंब फुटले असल्याने हे पीक हातचे गेलेले आहे़ नाना जाधव यांनी सेंट्रल बँकेचे पीक कर्ज आणि फायनान्स    कंपनीकडूनही कर्ज घेतलेले आहे़ हजारो रुपयांचे कर्ज डोक्यावर असताना आता हाती येणारे पीकही गेल्याने गेल्या चार दिवसांपासून नाना जाधव अस्वस्थ होते़ त्यांनी घरात जणूकाही अबोला धरला होता़ दररोज सकाळी शेतात जावून दिवसभर   पिकांकडे पाहत बसणे आणि रात्री घरी येऊन मुकाट्याने झोपणे असा त्यांचा दिनक्रम सुरु झाला होता़ काल सुध्दा ते याच पध्दतीने वागले असल्याचे सांगण्यात येत आहे़ पिकच हाती येणार नसल्याने कर्ज कसे फेडणार? आपले घर कसे धकवणार? असे काहीसे बडबड करीत ते झोपी गेले़ सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी जागी झाली असता पहिल्या रुममध्ये सºयाला दोर बांधून त्याचा गळफास लावून घेत लटकलेल्या स्थितीत नाना जाधव आढळून आले़ त्यांना पाहून त्यांच्या पत्नीने हंबरडा फोडला़ आवाज ऐकून आजुबाजुचे परिसरातील नागरिक धावून आले़ नाना यांना फासावरुन खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले़ डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषीत केले़ मयत नाना जाधव यांचा पुतण्या नरेंद्र अशोक जाधव यांनी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ सहायक पोलीस उपनिरीक्षक वाघ घटनेचा तपास करीत आहेत़ संपुर्ण परिवार आला उघड्यावरनाना जाधव यांच्या पश्चात पत्नी, पदवीचे शिक्षण घेत असलेली एक मुलगी, एफवायला असलेला एक मुलगा, बारावीचे शिक्षण घेत असलेली मुलगी आणि नववीत शिक्षण घेत असलेला मुलगा असे पाच जणांचे कुटूंब आहे़ घरातील कर्ता पुरुष गेल्याने जाधव कुटुंबिय उघड्यावर आले आहे़ या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी