शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

अवकाळीच्या शक्यतेने शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:42 IST

गेल्यावर्षी झालेला दमदार पाऊस, गारपीट, आदीमुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्याच्या हाती फारसे उत्पन्न आले नाही. ...

गेल्यावर्षी झालेला दमदार पाऊस, गारपीट, आदीमुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्याच्या हाती फारसे उत्पन्न आले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघू शकला नाही. त्यातच लॅाकडाऊनचाही शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला होता. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड केली. मुबलक पाऊस झाल्यामुळे यावर्षी रब्बीच्या गहू, हरभऱ्याची लागवड वाढली होती. पिके चांगलीच बहरली असून, अशीच स्थिती राहिली तर खरीप हंगामात झालेले नुकसान भरून निघेल, अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा आहे.

असे असतानाच हवामान खात्याने १६ ते १८ फेब्रुवारीच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडेल अशी शक्यता गृहीत धरण्यात येत आहे.

गहू काढणीवर भर

परिसरातील नगाव, तिसगाव ढंडाने, वडेल, देवभाने, सायणे, धमाणे परिसरात हजारो एकरवर गहू पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. काढणीसाठी आलेला गहू हा ९० ते १०० दिवसांनंतर उपयुक्त असतो, तो मात्र ८० ते ८५ दिवसांतच काढण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर काही शेतकरी येईल त्या संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहेत. बऱ्याच क्षेत्रावर गहू, बाजरी, कांदा, ज्वारी, हरभरा, मिरची, टरबूज, पपई अशी खर्चिक पिके आहेत, त्यापैकी कच्चा, पक्का झालेला गहू मात्र काढून घेण्यास पसंती देत आहेत. एकरी १० ते १४ पोते येणारे पीक मात्र सध्या ७ ते ८ पोत्यांवर समाधान मानावे लागत आहे. दरम्यान, अशीच स्थिती राहिली तर शेतकऱ्यांना खरिपाप्रमाणे रब्बीतही नुकसान साेसावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अवकाळी पावसाचे संकट टळावे, अशी प्रार्थना शेतकरी करीत आहेत.