शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
4
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
5
दहशतवाद्यांसाठी काळ बनून आले 'हे' IPS अधिकारी; एका पोस्टरवरुन केला मोठ्या कटाचा खुलासा
6
दिल्ली स्फोटाची भीषणता! लाल किल्ल्यापासून ३०० मीटर दूर दुकानाच्या छतावर सापडला मानवी हात; मृतांचा आकडा १३ वर
7
पाकिस्तानची अफगाणिस्तान अन् भारताला पोकळ धमकी; एकाचवेळी युद्ध करण्याची क्षमता आहे किती?
8
SIP द्वारे कोट्यधीश व्हायचंय? '१०-७-१०' हा फॉर्म्युला येईल कामी; श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही
9
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
10
खळबळजनक! लेकाला PUBG चं व्यसन, कंटाळलेल्या आईने अखेर संपवलं जीवन, वडील म्हणतात...
11
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
12
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
13
सोशल मीडियावर रातोरात व्हायरल झाली गिरीजा ओक, पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाली...
14
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
15
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
16
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
17
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
18
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
19
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
20
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?

अवकाळीच्या शक्यतेने शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:42 IST

गेल्यावर्षी झालेला दमदार पाऊस, गारपीट, आदीमुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्याच्या हाती फारसे उत्पन्न आले नाही. ...

गेल्यावर्षी झालेला दमदार पाऊस, गारपीट, आदीमुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्याच्या हाती फारसे उत्पन्न आले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघू शकला नाही. त्यातच लॅाकडाऊनचाही शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला होता. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड केली. मुबलक पाऊस झाल्यामुळे यावर्षी रब्बीच्या गहू, हरभऱ्याची लागवड वाढली होती. पिके चांगलीच बहरली असून, अशीच स्थिती राहिली तर खरीप हंगामात झालेले नुकसान भरून निघेल, अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा आहे.

असे असतानाच हवामान खात्याने १६ ते १८ फेब्रुवारीच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडेल अशी शक्यता गृहीत धरण्यात येत आहे.

गहू काढणीवर भर

परिसरातील नगाव, तिसगाव ढंडाने, वडेल, देवभाने, सायणे, धमाणे परिसरात हजारो एकरवर गहू पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. काढणीसाठी आलेला गहू हा ९० ते १०० दिवसांनंतर उपयुक्त असतो, तो मात्र ८० ते ८५ दिवसांतच काढण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर काही शेतकरी येईल त्या संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहेत. बऱ्याच क्षेत्रावर गहू, बाजरी, कांदा, ज्वारी, हरभरा, मिरची, टरबूज, पपई अशी खर्चिक पिके आहेत, त्यापैकी कच्चा, पक्का झालेला गहू मात्र काढून घेण्यास पसंती देत आहेत. एकरी १० ते १४ पोते येणारे पीक मात्र सध्या ७ ते ८ पोत्यांवर समाधान मानावे लागत आहे. दरम्यान, अशीच स्थिती राहिली तर शेतकऱ्यांना खरिपाप्रमाणे रब्बीतही नुकसान साेसावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अवकाळी पावसाचे संकट टळावे, अशी प्रार्थना शेतकरी करीत आहेत.