शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

अवकाळीच्या शक्यतेने शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:42 IST

गेल्यावर्षी झालेला दमदार पाऊस, गारपीट, आदीमुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्याच्या हाती फारसे उत्पन्न आले नाही. ...

गेल्यावर्षी झालेला दमदार पाऊस, गारपीट, आदीमुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्याच्या हाती फारसे उत्पन्न आले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघू शकला नाही. त्यातच लॅाकडाऊनचाही शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला होता. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड केली. मुबलक पाऊस झाल्यामुळे यावर्षी रब्बीच्या गहू, हरभऱ्याची लागवड वाढली होती. पिके चांगलीच बहरली असून, अशीच स्थिती राहिली तर खरीप हंगामात झालेले नुकसान भरून निघेल, अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा आहे.

असे असतानाच हवामान खात्याने १६ ते १८ फेब्रुवारीच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडेल अशी शक्यता गृहीत धरण्यात येत आहे.

गहू काढणीवर भर

परिसरातील नगाव, तिसगाव ढंडाने, वडेल, देवभाने, सायणे, धमाणे परिसरात हजारो एकरवर गहू पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. काढणीसाठी आलेला गहू हा ९० ते १०० दिवसांनंतर उपयुक्त असतो, तो मात्र ८० ते ८५ दिवसांतच काढण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर काही शेतकरी येईल त्या संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहेत. बऱ्याच क्षेत्रावर गहू, बाजरी, कांदा, ज्वारी, हरभरा, मिरची, टरबूज, पपई अशी खर्चिक पिके आहेत, त्यापैकी कच्चा, पक्का झालेला गहू मात्र काढून घेण्यास पसंती देत आहेत. एकरी १० ते १४ पोते येणारे पीक मात्र सध्या ७ ते ८ पोत्यांवर समाधान मानावे लागत आहे. दरम्यान, अशीच स्थिती राहिली तर शेतकऱ्यांना खरिपाप्रमाणे रब्बीतही नुकसान साेसावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अवकाळी पावसाचे संकट टळावे, अशी प्रार्थना शेतकरी करीत आहेत.