शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

अपयशातून घातली यशाला गवसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:45 PM

आयपीएस अधिकारी होण्याचे ध्येय

चर्चेतील व्यक्तिशी थेट संवादअतुल जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कविद्यार्थी दशेपासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न होत. शिक्षण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली. भरपूर अभ्यास केला. मात्र दोनवेळा परीक्षा देवूनही पदरी अपयश आले. अपयशामुळे काहींच्या अपमानालाही सामोरे जावे लागले. मात्र प्रयत्न सोडले नाही. तिसºया प्रयत्नात यश मिळाले. कठोर परिश्रम, भरपूर अभ्यास केला तर हमखास यश मिळते असे महाराष्टÑ राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत राज्यात महिला वर्गात प्रथम आलेल्या अश्विनी सुभाष हिरे (पिंपळनेर) यांनी  सांगितले. या यशाबद्दल ‘त्यांचा लोकमत’शी झालेला संवाद असा-प्रश्न : स्पर्धा परीक्षांकडे कसे वळलात? उत्तर : इयत्ता नववी-दहावीत असतांनाच आपणही पोलीस अधिकारी व्हावे असे मनोमन ठरविले होते.  पिंपळनेर येथे घरी जाण्याचा रस्ता हा पोलीस स्टेशनवरूनच जायाचे. तेथील पोलीस स्टेशनला अधिकारी बघितले की त्यांच्या सारखे बनण्याची इच्छा व्हायची. त्यामुळे अभियांत्रिकीचे शिक्षण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.  प्रश्न : यासाठी कोणाकडून प्रेरणा मिळाली? उत्तर : आमचा परिवार सुशिक्षित आहे. वडील सुभाष हिरे  पांटबंधारे विभागात अभियंता आहेत. मामा प्रा. जी.एम. सूर्यवंशी यांनीही यापूर्वी स्पर्धा परीक्षा दिली आहे. त्यामुळे परीक्षेचा अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन मामा, वडीलांकडून मिळाले. भाऊ महिंद्र हिरे हा देखील पुण्यात असतो. त्यानेही खूप मार्गदर्शन केले. या सर्वांच्या प्रेरणेतून हे यश मिळाले. प्रश्न : आगामी ध्येय कोणत? उत्तर : केवळ यावरच न थांबता, मला आयपीएस अधिकारी व्हायचे आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड कम्युनिकेशनची अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. याचा उपयोग सायबर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी करेल.खचले नाही..पहिल्या प्रयत्नापासून स्पर्धा परीक्षेसाठी भरपूर तयारी केली. रोज ९-१० तास अभ्यास केला. मात्र दोन प्रयत्नात अपयश आले. अपयशामुळे काहीच्या अपमानालाही सामोरे जावे लागले.मात्र मी खचले नाही. अपयशातूनच उर्जा मिळाली. जोमाने अभ्यास केला. अखेर तिसºया प्रयत्नात यश मिळाले. पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार झाले. केवळ यश मिळाले नाही तर महिला वर्गात राज्यात प्रथम येण्याचा  बहुमान मिळाला. यशात आई-वडील, नातेवाईक, शिक्षक, त्याचबरोबर पुण्यातील क्लासच्या शिक्षकांचे योगदान आहे.मराठीतूनच शिक्षण अश्विनी हिरे यांचे बारावी सायन्सपर्यंत शिक्षक पिंपळनेर येथेच झाले. त्यानंतर त्यांनी  पुणे येथून इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड कम्युनिकेशन अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.घरात आई-वडिल भाऊ-बहिण एवढाच परिवार. मात्र पालकांनी मुलगा-मुलगी असा भेद केला नाही.स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम, भरपूर अभ्यासाची गरज आहे. नियोजनबद्ध तयारी केल्यास यश मिळते - अश्विनी  हिरे

टॅग्स :Dhuleधुळे