शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

मुख्य प्रवेशद्वाराजवळच घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:04 IST

कापडणे : नदी पात्रात घाणीमुळे प्रचंड दुर्गंधी, ८ मे रोजी होणार ग्रामदेवता भवानी माता यात्रोत्सव

कापडणे : गावात ७० लाख रुपये खर्चून ग्रामदेवता भवानी मातेचे मंदिर बांधण्यात आले. त्याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा महिनाभरापूर्वीच करण्यात आला. याच भवानी मातेचा यात्रोत्सव अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी ८ मे रोजी होणार आहे. दरम्यान, येथील भात नदी पात्रात व मुख्य प्रवेशद्वाराजवळच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र, भवानी चौक परिसर व भात नदी पात्र स्वच्छ करण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.गावाच्या प्रवेशद्वाराजवळच नदीपात्रात व परिसरात घाणीचे व दलदलीचे साम्राज्य आहे. त्यामुळे गावात येणाऱ्यांचे स्वागतच या घाण, दुर्गंधीने होते. दलदलयुक्त घाणीच्या साम्राज्याभोवती ग्रामदेवता भवानी मातेचे मंदिर, गावाचे प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गावाची ऐतिहासिक गढी, जैन समाजाची दोन मंदिरे आहेत. ८ मे रोजी होणारा भवानी मातेचा यात्रोत्सव याच परिसरात होणार आहे. स्वच्छतेसंदर्भात ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.प्रवेशालाच घाणीचे स्वागतकापडणे गावाचा मुख्य भाग म्हणून गावातील भात नदीचा चौक समजला जातो. या भागात नदीच्या पात्रातच घाणीचे साम्राज्य आहे. नदीच्या पूर्व दिशेला ५० फूट अंतरावर कापडणे गावाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. गावातील प्रत्येक ग्रामस्थ व बाहेरगावावरून येणारी-जाणारी पाहुणेमंडळी या भात नदीवर बांधलेल्या पुलावरून प्रवेशद्वारातून गावात प्रवेश करतात. मात्र, या प्रवेशद्वाराजवळच भात नदीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य आहे.मांस विक्रेत्यांकडून कळसयाच ठिकाणी मांस विक्रेत्यांची दुकाने आहेत. हे विक्रेते कोंबडीचे पिसे, माशांचे खवले आदी घाण दररोज सकाळ-संध्याकाळ येथेच फेकून देतात. कोंबडीचे पिसे अक्षरश: रस्त्यावर उडत असतात. त्यामुळे येथील घाणीच्या साम्राज्यात भरच पडत आहे. तसेच यामुळे येथे वराह व श्वानांचा अधिक वावर राहत असल्याने मोठा त्रास होत आहे. मांस विक्रेत्यांचे योग्य जागेत पुनर्वसन झाले तर येथील स्वच्छतेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.नदीपात्रात काटेरी झाडे निर्माण झाली आहे. संपूर्ण गावाचे सांडपाणी याच भागातील नदीच्या पात्रातून वाहून जात असते. मात्र, नदीपात्रात मोठया प्रमाणात घाण, केरकचरा साचल्याने हे सांडपाणी येथे नेहमीच साचलेले राहते. सांडपाणी वाहत नसल्यामुळे येथे दलदलीचे स्वरूप तयार झालेले आहे. या घाण व सांडपाण्यामुळे सर्वत्र डास, मच्छरांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होत आहे. याचा दुष्परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होत आहे. मात्र, येथील परिसरात ग्रामपंचायतीने अनेक दिवसांपासून साफसफाई केलेली नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने सदर परिसर कायमस्वरूपी स्वच्छ करावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

टॅग्स :Dhuleधुळे