शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
3
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
4
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
5
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
6
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
7
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
8
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
9
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
10
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
11
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
12
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
13
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
14
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
15
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
16
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
17
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
18
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
19
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
20
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

रब्बीचे क्षेत्र वाढूनही जिल्ह्याचा खतांचा साठा घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 3:28 PM

गेल्यावर्षाच्या तुलनेत  ५ हजार मेट्रीक टन साठा कमी मिळाला

ठळक मुद्देकृषी आयुक्तालयाकडे १ लाख २२ हजार ९८० मे.टन खतांची मागणीत्यापैकी ६८ हजार ७०० मे.टन खत मंजूरबियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध

आॅनलाईन लोकमत धुळे : यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. रब्बीसाठी कृषी विभागाकडून खतांचे नियोजन करण्यात आले असून, मागणी पैकी ६८ हजार ७०० मेट्रीक टन खते मंजूर झाली आहेत. गेल्यावर्षी ७३ हजार ७६० मेट्रीक टन खतांचा पुरवठा झाला होता. त्यातुलनेत यावर्षी ५ हजार ६० मेट्रीक टन खतांचा साठा कमी झाला आहे. दरम्यान शेतकºयांना खतांची कमी पडू दिली जाणार नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.यावर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला समाधानकारक पाऊस झाला नाही. मात्र आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबरच्या सुरवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने, शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. समाधानकारक पावसामुळे यावर्षी जिल्हयात  १ लाख २३ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी प्रस्तावित आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी रब्बीच्या पेरणीत १० ते १५ टक्यांनी वाढ झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.रब्बीसाठी कृषी विभागाने खतांचे नियोजन केले आहे. त्यानुसार  कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडे १ लाख २२ हजार ९८० मेट्रीक टन खतांची मागणी केली होती. त्यापैकी  जिल्ह्यासाठी ६८ हजार ७०० मेट्रीक टन खते मंजूर झालेली आहेत.  यात युरिया २९ हजार ७०० मे.टन, डीएपी-४९००, पोटॅश-४ हजार, सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी)- १३ हजार २००, तर एनपीके १६ हजार ९०० मेट्रीक टनाचा समावेश आहे.पाच हजार टन साठा घटला गेल्यावर्षी रब्बीचे क्षेत्र कमी होते.असे असतांनाही ७३ हजार ७६० मेट्रीक टन खताचा साठा उपलब्ध झालेला होता. यावेळी रब्बीचे क्षेत्र वाढूनही, गेल्यावर्षापेक्षा पाच हजार ६० मेट्रीक टन साठा घटल्याचे कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे.६८ हजार ६२२ क्विंटल बियाण्यांची मागणीरब्बीसाठी ६८ हजार ६२२ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आलेली आहे. यात महाबीजकडून ४७ हजार ९३७ क्विंटल, तर खाजगी कंपन्यांकडून २० हजार ६८५ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आलेली आहे.बियाणे उपलब्धमहाबीजकडून  बियाणे उपलब्ध झालेली आहेत. यात गहू- १३हजार १४० क्विंटल, हरभरा- २७७० क्विंटल, भूईमुग-२२५० क्विंटल, सुधारित रब्बी ज्वारी-७३५ तर सूर्यफुलाचे -१० क्विंटल बियाणे उबलब्ध आहे.खते कमी पडू देणार नाही : बैसाणेरब्बीसाठी खतांचे नियोजन करण्यात आलेले आहे. शेतकºयांना खतांची अडचण भासू देणार नाही. मागणीनुसार पुरवठा होत असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भालचंद्र बैसाणे यांनी सांगितले.