शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

धुळे विभागात गेल्या वर्षाच्या तुलनेत एस.टी.अपघातांच्या प्रमाणात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 12:03 IST

मयतांची संख्या झाली कमी मात्र जखमींचे प्रमाण वाढले, महामंडळातर्फे अर्थसहाय्य

ठळक मुद्देधुळे विभागात २०१६ मध्ये १३९ अपघातात ३५ जण मयत२०१७ मध्ये १३५ अपघातात २५ जण झाले मयतसहा प्रवाशांना प्रत्येकी १० लाखांप्रमाणे ६० लाखांची मदत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  :  चालकांसाठी प्रशिक्षण, गाड्यांची वेळोवेळी करण्यात येणारी दुरूस्ती, आगारांमध्ये नवीन गाड्यांचा समावेश यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागात अपघातामध्ये घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहेत. २०१६ मध्ये १३९ अपघात झाले होते. त्यात ३५ जण मयत झाले होते. तर २०१७ मध्ये १३५ अपघात झाले होते. त्यात २५ जण मयत झाले होते. अपघातांची संख्या चारने  तर मयतांच्या संख्या १०ने कमी झालेली आहे. मात्र  २०१६च्या तुलनेत २०१७ मध्ये जखमींची संख्या वाढलेली आहे.  दुचाकी, चारचाकी,खाजगी प्रवाशी गाड्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. असे असले तरी अनेकजण एस.टी.महामंडळाच्या बसनेच प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात.  वाहनांच्या गर्दीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, त्याला एस. टी.ही अपवाद राहिलेली नाही. मात्र इतर खाजगी प्रवाशी वाहनांच्या तुलनेत एस.टी.च्या अपघातांची संख्या कमी आहे. धुळे विभागात धुळ्यासह साक्री, नंदुरबार, शहादा, शिरपूर, अक्कलकुवा, शिंदखेडा, नवापूर, दोडाईचा असे एकूण नऊ आगार असून, या नऊ आगारात बसेसची एकूण संख्या ८४४ एवढी आहे.जानेवारी ते डिसेंबर २०१६ मध्ये   धुळे विभागातील बसचे एकूण १३९  अपघात झाले होते. यात  २२ प्राणांतिक अपघात असून १०३ अपघात गंभीर आहेत.  तर १४ किरकोळ अपघात होते. या अपघातांमध्ये ३५ जण मयत झाले होते. त्यात   राज्य परिवहन बसमधील १३ प्रवाशी व  अन्य २२ जणांचा समावेश होता. तसेच एकूण २५७ प्रवाशी जखमी झाले होते. त्यात २२२ राज्य परिवहन बसमधील प्रवाशी व  ३५ पादचारी व अन्य जणांचा समावेश होता. जानेवारी ते डिसेंबर २०१७ मध्ये अपघातांच्या संख्येत घट झालेली आहे. या वर्षात एकूण १३५ अपघात झाले. त्यात प्राणांतिक  १५, गंभीर १०४, व किरकोळ १६ अपघातांचा समावेश होता.या अपघातांमध्ये २५ जण मयत झाले होते. त्यात १ राज्य परिवहन प्रवाशी व २४ अन्यांचा समावेश होता. तर ३८० प्रवाशी जखमी झाले होते. त्यात ३०६ राज्यपरिवहन प्रवाशांचा तर ७४ जखमींमध्ये पादचारी व अन्यांचा समावेश होता.अपघात सहायता निधी योजनामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसमधून प्रवास करताना अपघात झाल्यास मृत प्रवाशांना विम्याची रक्कम म्हणून दहा लाख रुपये देणारी ‘अपघात सहायता योजना’ १ एप्रिल २०१६ पासून  सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक प्रवासी तिकीटावर एक रुपया अधिभार लावण्यात येतो.या अधिभारातून २०१६ मध्ये ४ कोटी २५ लाख ९१ हजार २१९ रूपये जमा झाले होते. त्यापैकी  २ कोटी ६ लाख, ५७ हजार, ४३० रूपयांची अपघातग्रस्तांना मदत करण्यात आली. याच योजनेंतर्गत २०१७ मध्ये ५ कोटी ७९ लाख ३० हजार ३७२ रूपये जमा झाले होते. त्यापैकी २ कोटी, ७२ लाख ३८ हजार ४६४ रूपयांची मदत देण्यात आल्याचे सांगण्यात आले.६० लाखांची मदतपरिवहन मंत्र्यांनी अपघात सहायता योजना सुरू केली आहे. एक रूपयात १० लाखाचा विमा असेही वर्णन या योजनेचे करण्यात येते. धुळे विभागातर्फे सहा प्रवाशांच्या मयतांच्या वारसांना प्रत्येकी १०-१० लाख याप्रमाणे ६० लाखांची मदत करण्यात आली. महाराष्टÑात फक्त धुळे विभागातर्फेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मदत देण्यात आल्याचे सांगण्यात आले.