शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

धुळे विभागात गेल्या वर्षाच्या तुलनेत एस.टी.अपघातांच्या प्रमाणात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 12:03 IST

मयतांची संख्या झाली कमी मात्र जखमींचे प्रमाण वाढले, महामंडळातर्फे अर्थसहाय्य

ठळक मुद्देधुळे विभागात २०१६ मध्ये १३९ अपघातात ३५ जण मयत२०१७ मध्ये १३५ अपघातात २५ जण झाले मयतसहा प्रवाशांना प्रत्येकी १० लाखांप्रमाणे ६० लाखांची मदत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  :  चालकांसाठी प्रशिक्षण, गाड्यांची वेळोवेळी करण्यात येणारी दुरूस्ती, आगारांमध्ये नवीन गाड्यांचा समावेश यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागात अपघातामध्ये घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहेत. २०१६ मध्ये १३९ अपघात झाले होते. त्यात ३५ जण मयत झाले होते. तर २०१७ मध्ये १३५ अपघात झाले होते. त्यात २५ जण मयत झाले होते. अपघातांची संख्या चारने  तर मयतांच्या संख्या १०ने कमी झालेली आहे. मात्र  २०१६च्या तुलनेत २०१७ मध्ये जखमींची संख्या वाढलेली आहे.  दुचाकी, चारचाकी,खाजगी प्रवाशी गाड्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. असे असले तरी अनेकजण एस.टी.महामंडळाच्या बसनेच प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात.  वाहनांच्या गर्दीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, त्याला एस. टी.ही अपवाद राहिलेली नाही. मात्र इतर खाजगी प्रवाशी वाहनांच्या तुलनेत एस.टी.च्या अपघातांची संख्या कमी आहे. धुळे विभागात धुळ्यासह साक्री, नंदुरबार, शहादा, शिरपूर, अक्कलकुवा, शिंदखेडा, नवापूर, दोडाईचा असे एकूण नऊ आगार असून, या नऊ आगारात बसेसची एकूण संख्या ८४४ एवढी आहे.जानेवारी ते डिसेंबर २०१६ मध्ये   धुळे विभागातील बसचे एकूण १३९  अपघात झाले होते. यात  २२ प्राणांतिक अपघात असून १०३ अपघात गंभीर आहेत.  तर १४ किरकोळ अपघात होते. या अपघातांमध्ये ३५ जण मयत झाले होते. त्यात   राज्य परिवहन बसमधील १३ प्रवाशी व  अन्य २२ जणांचा समावेश होता. तसेच एकूण २५७ प्रवाशी जखमी झाले होते. त्यात २२२ राज्य परिवहन बसमधील प्रवाशी व  ३५ पादचारी व अन्य जणांचा समावेश होता. जानेवारी ते डिसेंबर २०१७ मध्ये अपघातांच्या संख्येत घट झालेली आहे. या वर्षात एकूण १३५ अपघात झाले. त्यात प्राणांतिक  १५, गंभीर १०४, व किरकोळ १६ अपघातांचा समावेश होता.या अपघातांमध्ये २५ जण मयत झाले होते. त्यात १ राज्य परिवहन प्रवाशी व २४ अन्यांचा समावेश होता. तर ३८० प्रवाशी जखमी झाले होते. त्यात ३०६ राज्यपरिवहन प्रवाशांचा तर ७४ जखमींमध्ये पादचारी व अन्यांचा समावेश होता.अपघात सहायता निधी योजनामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसमधून प्रवास करताना अपघात झाल्यास मृत प्रवाशांना विम्याची रक्कम म्हणून दहा लाख रुपये देणारी ‘अपघात सहायता योजना’ १ एप्रिल २०१६ पासून  सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक प्रवासी तिकीटावर एक रुपया अधिभार लावण्यात येतो.या अधिभारातून २०१६ मध्ये ४ कोटी २५ लाख ९१ हजार २१९ रूपये जमा झाले होते. त्यापैकी  २ कोटी ६ लाख, ५७ हजार, ४३० रूपयांची अपघातग्रस्तांना मदत करण्यात आली. याच योजनेंतर्गत २०१७ मध्ये ५ कोटी ७९ लाख ३० हजार ३७२ रूपये जमा झाले होते. त्यापैकी २ कोटी, ७२ लाख ३८ हजार ४६४ रूपयांची मदत देण्यात आल्याचे सांगण्यात आले.६० लाखांची मदतपरिवहन मंत्र्यांनी अपघात सहायता योजना सुरू केली आहे. एक रूपयात १० लाखाचा विमा असेही वर्णन या योजनेचे करण्यात येते. धुळे विभागातर्फे सहा प्रवाशांच्या मयतांच्या वारसांना प्रत्येकी १०-१० लाख याप्रमाणे ६० लाखांची मदत करण्यात आली. महाराष्टÑात फक्त धुळे विभागातर्फेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मदत देण्यात आल्याचे सांगण्यात आले.