शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

पीएम स्वनिधीला बॅकांकडून खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST

मनपाकडून पीएम स्वनिधी योजनेचा लाभ फेरीवाल्यांना मिळवून देण्यासाठी मनपाकडून प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी काही महिन्यापूर्वी शहरातील फेरीवाल्याचे सर्वेक्षण ...

मनपाकडून पीएम स्वनिधी योजनेचा लाभ फेरीवाल्यांना मिळवून देण्यासाठी मनपाकडून प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी काही महिन्यापूर्वी शहरातील फेरीवाल्याचे सर्वेक्षण करून नोंदणी करण्यात आली आहे. त्यानुसार टप्याटप्यात या योजनेचा लाभ फेरीवाल्यांना दिला जात आहे. मनपाकडून पीएम स्वनिधी योजनेच्या लाभासाठी बॅकेत प्रस्ताव पाठविण्यात येतात. लाभार्थांची संपूर्ण माहिती घेऊन बॅकेव्दारे अर्थसाहाय्य केले जाते. मात्र काही बॅकांकडून पीएम स्वनिधी योजनेचा लाभ दिला जात नसल्याने तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही योजना यशस्वी करण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे.

कोरोना महामारीच्या काळात तीन महिने व्यवसाय ठप्प हाेते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. व्यवसाय करण्यासाठी फेरीवाल्यांना अर्थसाहाय्य होण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातुन पीएम स्वनिधी योजना राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप या योजनेची माहिती फेरीवाल्यांना मिळालेली नाही. त्यामुळे माहिती घेऊन लवकरच बॅकेकडे प्रस्ताव पाठवणार आहे. बॅकेकडून सहकार्याची अपेक्षा आहे.

-पंकज माळी, भाजीविक्रेता

पीएम स्वनिधी योजनेची माहिती मिळाल्यानंतर ऑनलाईन प्रस्ताव बॅकेकडे पाठविला आहे. यासाठी मात्र चार ते पाच महिन्यानंतरही बॅकेकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. दोन ते तीन वेळा बॅकेत फेऱ्या मारून झाल्या. प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. लाभार्थांची यादी बॅकेत लावली जाईल. त्यानंतर विचारणा करावी, अशी उत्तरे बॅकेकडून दिली जातात.

-उज्वल ठाकूर, व्यावसायिक

बॅकेकडून सहकार्य केले जाते.

पीएम स्वनिधी योजनेची व्यवसायिकांना बॅकेकडून वेळोवेळी माहिती दिली जाते. आतापर्यत प्रस्ताव दाखल केलेल्या लाभार्थांना बॅकेच्या माध्यमातून धनादेश देण्यात आलेला आहे. लाभार्थांना योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणी येत असतील तर त्यांना बॅकेच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधावा

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तीन ते चार महिने उद्योग व्यवसाय बंद असल्याने बेरोजगार व्हावे लागले. त्यामुळे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करावा लागला. केंद्र सरकारकडून दहा हजार रुपयांंपर्यत अर्थसाहाय्य दिले जाणार असल्याने बॅकेकडे प्रस्ताव पाठविला होता. तीन ते चार महिने पाठपुरावा केल्यानंतर योजनेचा लाभ मिळाला. केंद्राच्या योजनेचा लाभार्थांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून दखल घेण्याची गरज आहे.

-श्रीधर महाजन, फेरीवाला