शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

धुळे जिल्ह्याच्या पाणी टंचाई कृती आराखड्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 18:55 IST

शेवटच्या टप्प्यात मोजक्या गावांना टंचाईची झळ बसू शकते

आॅनलाइन लोकमतधुळे : यावर्षी प्रचंड पाऊस झालेला आहे. त्यामुळे दरवर्षाप्रमाणे पाणी टंचाई भासण्याची शक्यता कमीच आहे. मात्र असले असले तरी जिल्हा परिषदेला पाणी टंचाई आराखडा तयार करावा लागत असतो. मात्र पाणी टंचाईचा पहिला टप्पा सुरू झाला तरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अद्याप टंचाई कृती आराखडा तयार केला नाही.धुळे जिल्ह्यातील काही भाग अवर्षणप्रवण क्षेत्रात असल्याने, या जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई भासत असते. टंचाई निवारणार्थ दरवर्षी टंचाईच्या काळात जनतेची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी टॅँकरसह विविध उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्याचा एकत्रित टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. तहानलेल्या गावांची संख्या, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना आदींबाबत तालुकास्तरावरून माहिती संकलित केली जाते. त्याआधारावरच एकत्रितत आराखडा तयार होत असतो.विशेष म्हणजे या आराखड्यातील उपाययोजना तीन टप्यात राबविल्या जातात. टंचाईचा पहिला टप्पा आॅक्टोबर ते डिसेंबर दरम्यान राबविला जातो. दुसरा टप्पा जानेवारी ते मार्च व तिसरा टप्पा एप्रिल ते जून या कालावधीत राबविला जात असतो. यावर्षी टंचाईचा पहिला टप्पा संपून जवळपास दोन महिने संपत आले तरी अद्याप एकत्रित टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आली नसल्याची माहिती समोर आलेली आहे. अधिकाऱ्यांनी टंचाईची बाब फारशी गंभीरपणे घेतलेली नसल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग पाणी टंचाईचा संभाव्य कृती आराखड्यात महूर्त स्वरूप केव्हा देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.दरम्यान जिल्ह्यात मुबलक पाणी असले तरी अगदी शेवटच्या टप्यात पाच-सहा गावांना पाणी टंचाईची झळ बसू शकते असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे