शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

धुळे जिल्ह्याच्या पाणी टंचाई कृती आराखड्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 18:55 IST

शेवटच्या टप्प्यात मोजक्या गावांना टंचाईची झळ बसू शकते

आॅनलाइन लोकमतधुळे : यावर्षी प्रचंड पाऊस झालेला आहे. त्यामुळे दरवर्षाप्रमाणे पाणी टंचाई भासण्याची शक्यता कमीच आहे. मात्र असले असले तरी जिल्हा परिषदेला पाणी टंचाई आराखडा तयार करावा लागत असतो. मात्र पाणी टंचाईचा पहिला टप्पा सुरू झाला तरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अद्याप टंचाई कृती आराखडा तयार केला नाही.धुळे जिल्ह्यातील काही भाग अवर्षणप्रवण क्षेत्रात असल्याने, या जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई भासत असते. टंचाई निवारणार्थ दरवर्षी टंचाईच्या काळात जनतेची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी टॅँकरसह विविध उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्याचा एकत्रित टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. तहानलेल्या गावांची संख्या, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना आदींबाबत तालुकास्तरावरून माहिती संकलित केली जाते. त्याआधारावरच एकत्रितत आराखडा तयार होत असतो.विशेष म्हणजे या आराखड्यातील उपाययोजना तीन टप्यात राबविल्या जातात. टंचाईचा पहिला टप्पा आॅक्टोबर ते डिसेंबर दरम्यान राबविला जातो. दुसरा टप्पा जानेवारी ते मार्च व तिसरा टप्पा एप्रिल ते जून या कालावधीत राबविला जात असतो. यावर्षी टंचाईचा पहिला टप्पा संपून जवळपास दोन महिने संपत आले तरी अद्याप एकत्रित टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आली नसल्याची माहिती समोर आलेली आहे. अधिकाऱ्यांनी टंचाईची बाब फारशी गंभीरपणे घेतलेली नसल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग पाणी टंचाईचा संभाव्य कृती आराखड्यात महूर्त स्वरूप केव्हा देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.दरम्यान जिल्ह्यात मुबलक पाणी असले तरी अगदी शेवटच्या टप्यात पाच-सहा गावांना पाणी टंचाईची झळ बसू शकते असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे