शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
4
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
5
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
7
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
8
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
9
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
10
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
11
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
12
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
13
भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराला दिलासा; छाननीत बाद झालेले १२ अर्ज कोर्टात वैध
14
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
15
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
16
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
17
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
18
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
19
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
20
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्याच्या पाणी टंचाई कृती आराखड्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 18:55 IST

शेवटच्या टप्प्यात मोजक्या गावांना टंचाईची झळ बसू शकते

आॅनलाइन लोकमतधुळे : यावर्षी प्रचंड पाऊस झालेला आहे. त्यामुळे दरवर्षाप्रमाणे पाणी टंचाई भासण्याची शक्यता कमीच आहे. मात्र असले असले तरी जिल्हा परिषदेला पाणी टंचाई आराखडा तयार करावा लागत असतो. मात्र पाणी टंचाईचा पहिला टप्पा सुरू झाला तरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अद्याप टंचाई कृती आराखडा तयार केला नाही.धुळे जिल्ह्यातील काही भाग अवर्षणप्रवण क्षेत्रात असल्याने, या जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई भासत असते. टंचाई निवारणार्थ दरवर्षी टंचाईच्या काळात जनतेची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी टॅँकरसह विविध उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्याचा एकत्रित टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. तहानलेल्या गावांची संख्या, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना आदींबाबत तालुकास्तरावरून माहिती संकलित केली जाते. त्याआधारावरच एकत्रितत आराखडा तयार होत असतो.विशेष म्हणजे या आराखड्यातील उपाययोजना तीन टप्यात राबविल्या जातात. टंचाईचा पहिला टप्पा आॅक्टोबर ते डिसेंबर दरम्यान राबविला जातो. दुसरा टप्पा जानेवारी ते मार्च व तिसरा टप्पा एप्रिल ते जून या कालावधीत राबविला जात असतो. यावर्षी टंचाईचा पहिला टप्पा संपून जवळपास दोन महिने संपत आले तरी अद्याप एकत्रित टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आली नसल्याची माहिती समोर आलेली आहे. अधिकाऱ्यांनी टंचाईची बाब फारशी गंभीरपणे घेतलेली नसल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग पाणी टंचाईचा संभाव्य कृती आराखड्यात महूर्त स्वरूप केव्हा देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.दरम्यान जिल्ह्यात मुबलक पाणी असले तरी अगदी शेवटच्या टप्यात पाच-सहा गावांना पाणी टंचाईची झळ बसू शकते असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे