शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

लुबाडणूक टाळण्यासाठी ग्राहकांनो सजग रहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 10:04 PM

अरुण देशपांडे यांची पत्रपरिषदेत माहिती : कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याचे विक्रेत्यांना निर्देश

ठळक मुद्दे२४ तास तक्रारी करण्यासाठी टोल फ्री क्रमांक अनेकदा चित्रपटगृहांमध्ये बाहेरून पाण्याची बाटली किंवा इतर खाण्याचे पदार्थ घेऊन दिले जात नाही. काही शाळांमध्येही मुलांच्या पालकांना वह्या, गणवेश हे शाळेतूनच घ्यावे, अशी सक्ती केली जाते. तसेच शासनाने ठरवून दिलेल्यप्लॅस्टीकचे तांदूळ सापडल्या प्रकरणी चौकशी सुरू... गेल्या काही दिवसात प्लॅस्टीकचे तांदूळ सापडल्याच्या घटना मुंबईमध्ये घडल्या आहेत. धुळ्यातही काही दिवसांपूर्वीच अशी घटना घडली होती. यासंदर्भात अरुण देशपांडे यांना विचारणा केली असता, त्यांनी यासंदर्भात चौकशी वैद्यकीय क्षेत्रातील लूट थांबविण्यासाठी लवकरच येणार कायदा... सद्य:स्थितीत वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांची लूट केल्याचे प्रकार घडत आहेत. ती थांबविण्यासाठी लवकरच ‘क्लिनीकल एस्टॅबिलीशमेंट अ‍ॅक्ट’ येणार आहे. हा कायदा आल्यानंतर रुग्णांची फसवणूक होण्याचे प्रकार था

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : ग्राहकांची अडवणूक करून त्यांची लूटमार करण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी सरकारचे पारदर्शक धोरण आहे. मात्र, तरीही आभाळ इतके फाटले आहे की त्याला ठिगळ लावणार तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित होतो. तरीही ग्राहकांनी सजग राहून लुबाडणूक करणाºयांच्या विरोधात तक्रार द्यावी, असे आवाहन राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती व राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष  अरुण वसंतराव देशपांडे (मंत्रीस्तरीय) यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात शुक्रवारी दुपारी ही पत्रपरिषद झाली. देशपांडे पुढे म्हणाले, की पूर्वीच्या सरकारच्या काळात ग्राहकांच्या अनेक अडचणींकडे उदासिनतेने पाहिले जात होते. परंतु मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्वात प्रथम ग्राहक हित डोळ्यासमोर ठेवून ‘राईट टू सर्व्हिस’ अ‍ॅक्ट लागू केला. याअंतर्गत अन्नधान्यांमध्ये होणारी भेसळ, मॉल, दुकानांमध्ये ग्राहकांची होणारी लूटमार व इतर ठिकाणी ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई झाली का नाही? याबाबत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीतर्फे पाठपुरावा केला जातो. तसेच ग्राहक हिताच्या दृष्टीनेही समितीतर्फे शासनाने नेमके काय धोरण ठरविले पाहिजे, याविषयी सूचित केले जाते.  यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय बोरूडे, साहाय्यक पुरवठा अधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार अमोल मोरे, अपर तहसीलदार ज्योती देवरे आदी उपस्थित होते. प्रशासनाची भूमिका महत्त्वाची!ग्राहक हिताच्या दृष्टीने शासनातर्फे जे काही निर्णय होतात, त्याविषयी माहिती प्रशासनातर्फे सर्वसामान्य नागरिकांना देणे गरजेचे आहे. शासन व ग्राहक यांच्यातील मधला दुवा म्हणजे प्रशासन होय. ग्राहकांना जागरूक करण्यासाठी प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही देशपांडे म्हणाले. ग्राहक जागृती कार्यक्रम राबविणार!ग्राहक हिताच्या दृष्टीने राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीतर्फे ग्राहक जागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या तरतुदींनुसार ग्राहकांना अपेक्षित असलेली सेवा देणे विक्रेत्यांचे कर्तव्य आहे. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.