शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेत पुन्हा उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 23:06 IST

संचारबंदीची पूर्वसंध्या, जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी

धुळे : कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून पुढील १५ दिवस संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ गजबजली होती. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याने एका दिवसात हजारोंची उलाढाल झाली. बाजारपेठेसह आग्रा रोडवर पुन्हा गर्दी उसळली होती. बसस्थानकात देखील परतीच्या प्रवास करणाऱ्यांनी गर्दी केली होती.

कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळेही चिंताजनक बाब आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून विविध प्रकारचे निर्बंध लावले जात आहेत. त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवरून करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यात ५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. त्यात वीकेंड लॉकडाऊन सुरू करण्यात आल्याने शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू वगळता संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले होते. आता त्यात बदल करण्यात आला आहे. त्यात आता बुधवारी रात्री ८ वाजेपासून पुढील १५ दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात वस्तू घेण्यासाठी गर्दी उसळली होती.

आग्रा रोड गजबजला

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वीकेंड लॉकडाऊन प्रशासनाने घोषित केल्यामुळे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शहरात पूर्णपणे लॉकडाऊन होता. सर्वच प्रकारची व्यापारी प्रतिष्ठाने बंदच होती. परिणामी रस्ते निर्मनुष्य दिसून आले. त्यानंतर आग्रा रोडवर दोन दिवस गर्दी कमी-अधिक असल्याचे दिसून आले होते. बुधवारी मात्र या गर्दीत प्रचंड वाढ झाली होती. १५ दिवस संचारबंदी असल्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळतील का नाही अशी शंका मनात घेऊन अनेकांनी बाजारपेठ गाठली होती.

किराणा दुकानांमध्ये रेलचेल

संचारबंदी लागल्यानंतर आपले हाल होऊ नये म्हणून शहरातील लहान-मोठ्या किराणा दुकानांमध्ये नेहमीपेक्षा जास्तच गर्दी दिसून आली. यात दैनंदिन गरजेच्या किराणाच्या वस्तूंची खरेदी झाली. त्यात हजारो रुपयांचा किराणा मालाची विक्री झाली.

लाखोंची उलाढाल

कोरोना असला तरी त्याचे कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक न मानता बिनधास्तपणे नागरिकांनी गावात गर्दी केली होती. दैनंदिन गरजेच्या वस्तूंसह चैनीच्या वस्तूंची खरेदी नागरिकांनी केल्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल बाजारपेठेत झाली. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत रस्त्यांवर आणि दुकानांवर गर्दी कायम होती. दोन दिवस शांत असलेला आग्रा रोड बुधवारी सकाळपासून पूर्ण क्षमतेने गजबजलेला दिसून आला. त्यात पायी जाणाऱ्या नागरिकांसह दुचाकी व रिक्षांनी देखील आपली एंट्री घेतल्याने वाहतुकीच्या कोंडीत अधिकच भर पडलेली दिसून आली. परिणामी पायी चालणेही मुश्कील झाले होते.

परतीच्या प्रवाशांचीही गर्दी

लॉकडाऊन आणि त्यात पुन्हा १५ दिवसांची संचारबंदी शासनाने लागू केलेली आहे. यात वाहतूक व्यवस्था सुरळीत असली तरी ती बंद झाली तर आपण आपल्या गावी जाणार कसे? असा प्रश्न मनात घेऊन धुळ्यातील बसस्थानकात गर्दी झाली होती. बसमध्ये जाण्यासाठी अक्षरश: रांगाच लागल्या होत्या. काही मार्गावर जादा बसेस सोडण्याची वेळ स्थानिक प्रशासनावर आली होती, तर नेहमीच्या मार्गावर जाणाऱ्या बसेससुद्धा प्रवाशांनी भरलेल्या असल्याचे दिसून आले.