शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सक्तीच्या रजेचा कर्मचाऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 21:19 IST

दोंडाईचा: एस.टी.महामंडळाच्या निर्णयामुळे आगारातील चालक-वाहकांसह ३०६ कर्मचाऱ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने प्रवाशी बस वाहतूक बंद केली तर चालक- वाहक यांची हजेरी लावायचा नियम आहे. परंतु कोरोना महासंकटात महामंडळ प्रशासन हे सोयिस्करपणे विसरल्याचे दिसत आहे. कोरोना ही नैसर्गिक आपत्ती असून या आपत्तीत महामंडळाने चालक-वाहकांना सक्तीच्या २० दिवस रजेवर जाण्याचा फतवा जारी केला आहे. दोंडाईचा आगारातील ३०६ कर्मचाºयांना याचा फटका बसणार असणार असल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे. हा फतवा मागे घेण्याची मागणी कर्मचाºयांनी केली आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, एस.टी. महामंडळाने मार्च महिन्यापासून प्रवाशी वाहतूक बंद केली आहे. मध्यंतरी वाहतूक पुन्हा सुरू केली. परंतु त्यास अल्पसा प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा प्रवाशी वाहतूक बंद झाली. महामंडळाचे वाढते नुकसान बघता दोंडाईचा आगाराने माल वाहतूक सुरू केलीआहे. दोंडाईचा आगारात ५९ बसेस असून चालक-वाहक २२९ आहेत.चालक-वाहक यांना वषार्तून ४० दिवस रजा घेता येतात. त्यात २० दिवस मंदिच्या दिवसात तर उरलेल्या २० सुट्या गरजेनुसार घेता येतात. नैसर्गिकआपत्ती, संचारबंदी, सार्वजनीक आंदोलन काळात प्रशासनाने वाहतूक बंद केली तर चालक-वाहक यांचा पगार कापू नये,असे प्रशासनाने यापूर्वी जाहीर केले होते.कोरोना ही नैसर्गिक आपत्ती असून यात चालक-वाहक यांना मंदिच्या नावाखाली २० दिवस सक्तीच्या रजेवर पाठविणे, अन्यायकारक असल्याचे चालक-वाहकांसह कर्मचारी यांचे मत आहे. आगारात अगोदरच चालक-वाहक यांची संख्या कमी असून गर्दीच्या काळात गरज असतानाही सुटी मिळत नसल्याची तक्रार आहे. आता गरज नसताना नाहक सक्तीचा रजेवर पाठविले जात असल्याने दोडाईचा सह जिल्यातील चालक-वाहक यांचात असंतोष निर्माण झाला आहे. दोंडाईचा आगारातील ३०६ कर्मचाºयांना याचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. या अगोदरच महामंडळाने जून महिन्याच्या ५० टक्के पगार कापला आहे.सक्तीचा रजेचा फतवा रद्द करावा,अशी मागणी सर्वच कर्मचाºयांनी महामंडळाकडे केली आहे.अन्यायकारण निर्णय : चत्रेकोरोनामुळे बसेस बंद असल्याने मंडळाने अगोदरच जून महिन्याचा ५० टक्के पगार कापला आहे. कर्मचाºयांनी २० दिवस सक्तीचा रजेवर जाण्याचा मंडळाचा निर्णय अन्यायकारक आहे.कर्मचारी कामानिमित्त रजा घेता. २० दिवस सक्तीची रजा घेतली, तर आगामी काळात रजा मिळणार नाही. रजा शिल्लक नसल्याने बिनपगारी रजा गणली जाईल.पगार मिळणार नाही ,मग उदरनिर्वाह कसा करावयाचा हा प्रश्न आहे.महामंडळाने सक्तीचा रजेचा निर्णय रद्द करावा अशी मागणी इंटक युनियनचे विभागीय अध्यक्ष रामेश्वर चत्रे यांनी व्यक्त केली आहे.