शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

‘फास्ट टॅग’ची सक्ती, दोन दिवसात २ हजार २८९ वाहनांकडून दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:07 IST

मशीनमधील तांत्रिक अडचणी -टोल नाक्यावर फास्ट टॅगमुळे वाहन लवकर सोडली जातील, असे सांगितले जात असले तरी अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे ...

मशीनमधील तांत्रिक अडचणी -टोल नाक्यावर फास्ट टॅगमुळे वाहन लवकर सोडली जातील, असे सांगितले जात असले तरी अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे जोपर्यंत गाडीची एंट्री होत नाही, तोपर्यंत गाडी सोडली जात नसल्याने मागील गाड्या खोळंबून रहात आहे. त्यामुळे अवघ्या काही मिनिटातच गाड्यांच्या रांगा लागत आहे. त्यामुळे वेटिंगमध्ये असलेल्या वाहनांचे चालक हे यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त करतांना दिसले. आधी यंत्रणा अपडेट करावी त्यानंतरही सक्ती करावी, असे वाहन चालकांचे म्हणणे होते.

वाहन मालकांचे वाद - दरम्यान, दंड वसुली ही डबलची होत असल्याने फास्ट टॅग न लावलेले काही वाहन मालक हे अचानक असे कसे होऊ शकते. यंदा सोडा यापुढे लक्षात ठेऊ, असे सांगत टोलवरील कर्मचाऱ्यांशी वाद घालतांना दिसले. पण शासनाचा आदेश आणि सीसीटीव्हीत रेकाॅर्ड होत असल्याने दंड भरल्याशिवाय गाड्या सोडल्या जात नव्हत्या.

फास्ट टॅग बसविण्याची धावपळ - काही गाडी मालकांनी दंड भरण्याऐवजी फास्ट टॅग बसविण्यासाठी धावपळ करतांना दिसले. टोल नाक्यावर फास्ट टॅग बसविण्याची सोय असल्यामुळे गाड्या साईडला लावल्यानेही टोलवर गाड्यांची गर्दी दिसून आली. दिवसभर ही धावपळ दिसून आली.

फास्ट टॅग रिचार्जसाठी रांग - काही गाड्यांना फास्ट टॅग बसविलेले होते. परंतु त्याचा रिचार्ज संपलेला असल्याने विनाकारण दंड भरण्याऐवजी फास्ट टॅग रिचार्ज करण्यासाठी टोल नाक्यावर उघडण्यात आलेल्या खिडकीवर गाडी मालक व चालकांची रांग लागलेली दिसली.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार आमच्या टोलवर १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर फास्ट टॅग न लावलेल्या गाड्यांकडून कायद्यानुसार रीतसर डबल दंड वसूल केला जात आहे. गाडीला फास्ट टॅग बसविण्याची आणि रिचार्ज करण्याची सोय टोलवर करण्यात आली आहे. नवीन सोय असल्याने सुरुवातीला सर्वांनाच याचा तोडा त्रास होत आहे. परंतु तरीही आमच्या टोलवर अवघ्या काही मिनिटातच फास्ट टॅग लावलेल्या गाड्या लगेच सोडल्या जात आहे.

-कृष्णकांत शर्मा, आयएसपीपीएल टोल कंपनी, धुळे

फास्ट टॅग बसविला आहे. ही पद्धत चांगली आहे. यामुळे अनेक गोष्टींना आळा बसणार आहे. तसेच भ्रष्टाचारही होणार नाही. केंद्र शासनाच्या निर्णयाचे स्वागत करतो.

— राहुल भास्करराव पाटील, (वाहन मालक),

फास्ट टॅग सिस्टिम चांगली आहे. परंतु तिची सक्ती करण्याआधी त्याबाबत जनजागृती तसेच त्यासंदर्भात टोल नाक्यावर येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर केल्या पाहिजे होत्या.

- विनोद रामसिंग सिसोदिया (वाहन मालक)

आधी टोल भरणारे रांगेत तर टोल न भरणारे ऐटीत सरळ निघून जायचे. आता फास्ट टॅग बसविल्याने सर्वांना समान वागणूक मिळेल. तसेच टोल बुडविणाऱ्यावर अंकुश बसेल.

- योगेश छगन माळी (वाहन मालक)