शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध- पालकमंत्री अब्दुल सत्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:35 IST

धुळे : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा वार्षिक योजनेचा २१० कोटी रुपये ...

धुळे : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा वार्षिक योजनेचा २१० कोटी रुपये खर्चाचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

पालकमंत्री सत्तार आज जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते आज सकाळी शिंदखेडा तालुक्यातील माळीच येथे तापी नदीवरील पाणीपुरवठा योजनेचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच कुसुमबाई भिल, उपसरपंच विलास पाटील, लघुसिंचन विभागाचे अभियंता ए.बी. पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी मोहिते, ग्रामसेवक शरद ठाकरे, माजी सरपंच गणेश करनकाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री सत्तार म्हणाले की, जिल्ह्यातील पायाभूत सोयीसुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत यासंदर्भातील निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. जिल्ह्यातील दळण-वळण, आरोग्य, शैक्षणिक पायाभूत सोयी-सुविधांचे बळकटीकरण करण्यात येईल. धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय व सर्वोपचार रुग्णालयात एमआरआय मशीन कार्यान्वित करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कमी खर्चात उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला. असे असले, तरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपुष्टात आलेला नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राज्य शासनाच्या नियमांचे पालन करावे, असेही आवाहन पालकमंत्री सत्तार यांनी केले. माजी सरपंच करनकाळ यांनी मनोगत व्यक्त केले.