दणकेबाज लग्नाला आता ५० हजारांचा दंड जिल्हाधिकारी : फक्त २५ वऱ्हाडींसह दोन तासांत लग्न लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:38 IST2021-04-23T04:38:10+5:302021-04-23T04:38:10+5:30

नवीन आदेशानुसार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर सरकारी कार्यालयांमध्ये केवळ १५ टक्के किंवा पाच कर्मचारी उपस्थित असतील. जीवनावश्यक सेवांसाठी ...

Collector fines Rs 50,000 for banging marriage Collector: Get married in just two hours with only 25 brides | दणकेबाज लग्नाला आता ५० हजारांचा दंड जिल्हाधिकारी : फक्त २५ वऱ्हाडींसह दोन तासांत लग्न लावा

दणकेबाज लग्नाला आता ५० हजारांचा दंड जिल्हाधिकारी : फक्त २५ वऱ्हाडींसह दोन तासांत लग्न लावा

नवीन आदेशानुसार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर सरकारी कार्यालयांमध्ये केवळ १५ टक्के किंवा पाच कर्मचारी उपस्थित असतील.

जीवनावश्यक सेवांसाठी लागणाऱ्या कामकाजासाठी किमान कर्मचारी संख्येत काम करावे आणि कोणत्याही परिस्थितीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती राहणार याची दक्षता घ्यावी. अत्यावश्यक सेवा प्रत्यक्ष पुरविण्यासाठी नेमण्यात आलेल्या मनुष्यबळासंदर्भात किमान मनुष्यबळ वापरावे; पण हे मनुष्यबळ शंभर टक्क्यांपर्यंतही वाढविण्याची मुभा राहील.

लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांच्या हातावर शिक्का

खाजगी प्रवासी वाहतुकीसाठी जिल्हाबंदी केली आहे. त्यांना केवळ ५० टक्के क्षमतेने वाहतूक करावी लागणार आहे. अन्यथा १० हजारांचा दंड आकारला जाईल.

खाजगी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस गृहविलगीकरणाचा ठळक शिक्का हातावर मारून घ्यावा लागेल आणि हे शिक्के मारायचे काम बस कंपनीने करावयाचे आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतूक ५० टक्के क्षमतेने करण्याचे आदेश आहेत; परंतु उभे राहून प्रवास करण्यास निर्बंध राहील.

लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे.

Web Title: Collector fines Rs 50,000 for banging marriage Collector: Get married in just two hours with only 25 brides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.