शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

धुळे जिल्ह्यात  २६ पासून स्वच्छतेचा जागर अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:39 AM

स्वच्छ भारत मिशन  : प्रवचनकार जिल्ह्यातील  ६७२ महसुली गावांमध्ये जनजागृती करणार

ठळक मुद्देजिल्ह्यातील महसूल गावांमध्ये प्रवचन करणारप्रवचनातून स्वच्छतेची माहिती देणार१० फेब्रुवारीपर्यंत अभियान सुरू राहणार

आॅनलाइन लोकमतधुळे : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आणि महाराष्टÑ राज्य वारकरी परिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेच्या जाणिव जागृतीसाठी जिल्ह्यात २६ जानेवारीपासून स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे. १० फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाºया या जागरात जिल्ह्यातील प्रवचनकार ६७२ महसुली गावांमध्ये प्रवचन करणार आहेत. संपूर्ण राज्यात स्वच्छतेचा जागर हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी वारकरी साहित्य परिषदेचे प्रमुख पदाधिकारी जिल्ह्याचा दौरा करीत आहे. त्याअंतर्गत मंगळवारी जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात पूर्वतयारीची बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. होते. व्यासपीठावर ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल होते. बैठकीत प्रवचनकार महाराजांच्या प्रबोधनासाठी शाश्वत स्वच्छता, वैय्यक्तिक स्वच्छता, स्वच्छता सुविधांची देखभाल, दुरूस्ती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचरा वर्गीकरण, ग्रामीण कुटुंबाना शौचालय नियमित वापरण्याची सवय, प्लॅस्टिक बंदी आणि प्लॅस्टिकचे धोके, परिसर स्वच्छतेचे महत्व या विषयावर प्रबोधन होण्यासाठी संबंधित विषयाचे टिपण उपलब्ध करून देण्यात आले आहे. या विषयाचा समावेश प्रवचनकार आपल्या प्रवचनात करणार आहे.या बैठकीला जिल्ह्ययातील ४० प्रवचनकार उपस्थित होते. मधुकर वाघ यांनी प्रास्ताविकेतून अभियानाची माहिती दिली. सूत्रसंचालन विजय हेलिंगराव यांनी केले. पसायदानाने बैठकीची सांगता झाली. 

टॅग्स :Dhuleधुळे