शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
4
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
5
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
6
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
7
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
8
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
9
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
10
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
11
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
12
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
13
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
14
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
15
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
16
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
17
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
18
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
19
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
20
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर

हिंदू धर्माच्या प्रसारासाठी परदेशात भागवत कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:27 IST

भागवताचार्य राजीवकृष्णजी महाराज

ठळक मुद्देसावरकरांच्या मायभूमीत शिकलोदेशसेवा करण्याची इच्छा होतीहिंदू धर्मिय नागरिकांना समाज प्रबोधनाच्या उद्देशाने ६ जिल्ह्यांत १२ दिवसीय कथेचे आयोजन

चंद्रकांत सोनार ।धुळे : अखंड भारतातील मुळ हिंदू समाज पाकिस्तान येथील सिंध क्षेत्रात वास्तव्याला आहे़ त्यांची संख्या दोन टक्यापेक्षा अधिक आहे़ तेथील सनातन हिंदू धर्मांचे ३१० वर्षापुर्वीचे जुन्या धर्मपीठाचे ९ वे विराजमान संत यूधिष्ठिरलालजी यांच्या मार्गदर्शनाने सिंध क्षेत्रातील हिंदू धर्मिय नागरिकांना समाज प्रबोधनाच्या उद्देशाने ६ जिल्ह्यांत १२ दिवसीय कथेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भागवताचार्य राजीवकृष्णजी झा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़प्रश्न : धर्म कार्यासोबतच सामाजिक कार्यात आपण कसे योगदान देतात?उत्तर: दिव्यांग व्यक्तींना सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे स्व:ताच्या पायावर उभे राहता यावे, या उद्देश्याने उदयपुर येथील नारायण सेवा संस्थेतर्फे सात लाख व श्रीरामजानकी सेवा समितीच्या माध्यमाने पाच लाखांची मदत संस्थेला देण्यात आली आहे़ या मदतीच्या माध्यमातुन गरीब-गरजु तसेच दिव्यांग १०१ व्यक्तीव शस्त्रक्रिया करण्यात आली आहे़ तसेच स्वयंरोजगारासाठी उदयपुर येथे मोबाइल रिपेरिंग, शिवण काम शिकविण्यात येत आहे़प्रश्न : धर्मावरून समाजात होणारा तेढ दूर करण्यासाठी काय संदेश द्याल ?उत्तर: तरूण सोशल मिडीयाच्या आहारी गेला आहे़ आपली एक पोस्ट दुसऱ्यात भांडण लावू शकते़ याची तरूणांनी भान ठेवावी़ आधुनिकतेकडे वाटचाल नक्की करा, मात्र आपला धर्म, संस्कृती व दुसºया धर्माविषयी आदर नक्की वाळगा, देश व समाज हित साध्य करुण भ्रष्टाचार विरहित भारत निर्माण करण्यात योगदान द्यावा़प्रश्न : आपण किती भाषांमध्ये प्रवचनातून समाजप्रबोधन केले आहे ?उत्तर: वृंदावन, काशी, नैमिषारण्य, बद्रीनाथ, मिथिलाधाम, चित्रकूट सारखे देशातील महत्वपूर्ण तीर्थक्षेत्रामध्ये वृद्ध, गोरगरीबांमध्ये कथा श्रवनाचे कार्य केले आहे़ मराठी, आहीराणी, हिंदी, मारवाड़ी, गुजराती, भोजपुरी, मैथिली अशा १२ बोली भाषेत सातशे पेक्षाअधिक ठिकाणी देश-विदेशात भागवत, शिवकथा, रामकथा घेतल्या आहेत़ कथेच्या माध्यमातुन दिव्यांग, गोरगरीबांची रूग्णसेवा केली जाते़सावरकरांच्या मायभूमीत शिकलोनाशिक जिल्ह्यातील भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मगावी बालाजी मंदिरात १३ वर्षाचा असतांना पहिल्यांदा रामकथा केली होती़ त्यावेळी संत मोरारीबापू, गोविंददेव गिरीजी यांचे मार्गदर्शन लाभले़ तर संस्कृत पठण अवधूत जोशी गुरूजीच्या याच्याकडे पूर्ण केले़देशसेवा करण्याची इच्छा होतीबालवयापासुन स्वातंत्र्यवीर सावरकरांची पे्ररणा लाभल्याने सैन्यात भरर्ती होऊन राष्ट्रसेवेची इच्छा होती़ मात्र संधी न मिळाल्याने धर्मकार्यातुन समाज घडविण्याचे कार्य करीत आहे़ वनस्पतिशास्त्र विषयात बीएससी झाल्यानंतर जगदगुरू पद्मश्री नारायणदेवचार्यजी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली़ महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड छत्तीसगढ़, कर्नाटक अशा राज्यात रामकथा, भागवतकथा, देवी भागवत, शिवकथा भजनसंध्या प्रवचन केले़