शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईल; निर्मला सीतारामन यांचे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
3
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
4
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
5
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
6
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
7
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
8
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
9
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
10
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
11
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
12
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
13
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
14
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
15
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
16
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
17
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
18
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
19
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
20
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!

हिंदू धर्माच्या प्रसारासाठी परदेशात भागवत कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:27 IST

भागवताचार्य राजीवकृष्णजी महाराज

ठळक मुद्देसावरकरांच्या मायभूमीत शिकलोदेशसेवा करण्याची इच्छा होतीहिंदू धर्मिय नागरिकांना समाज प्रबोधनाच्या उद्देशाने ६ जिल्ह्यांत १२ दिवसीय कथेचे आयोजन

चंद्रकांत सोनार ।धुळे : अखंड भारतातील मुळ हिंदू समाज पाकिस्तान येथील सिंध क्षेत्रात वास्तव्याला आहे़ त्यांची संख्या दोन टक्यापेक्षा अधिक आहे़ तेथील सनातन हिंदू धर्मांचे ३१० वर्षापुर्वीचे जुन्या धर्मपीठाचे ९ वे विराजमान संत यूधिष्ठिरलालजी यांच्या मार्गदर्शनाने सिंध क्षेत्रातील हिंदू धर्मिय नागरिकांना समाज प्रबोधनाच्या उद्देशाने ६ जिल्ह्यांत १२ दिवसीय कथेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भागवताचार्य राजीवकृष्णजी झा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़प्रश्न : धर्म कार्यासोबतच सामाजिक कार्यात आपण कसे योगदान देतात?उत्तर: दिव्यांग व्यक्तींना सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे स्व:ताच्या पायावर उभे राहता यावे, या उद्देश्याने उदयपुर येथील नारायण सेवा संस्थेतर्फे सात लाख व श्रीरामजानकी सेवा समितीच्या माध्यमाने पाच लाखांची मदत संस्थेला देण्यात आली आहे़ या मदतीच्या माध्यमातुन गरीब-गरजु तसेच दिव्यांग १०१ व्यक्तीव शस्त्रक्रिया करण्यात आली आहे़ तसेच स्वयंरोजगारासाठी उदयपुर येथे मोबाइल रिपेरिंग, शिवण काम शिकविण्यात येत आहे़प्रश्न : धर्मावरून समाजात होणारा तेढ दूर करण्यासाठी काय संदेश द्याल ?उत्तर: तरूण सोशल मिडीयाच्या आहारी गेला आहे़ आपली एक पोस्ट दुसऱ्यात भांडण लावू शकते़ याची तरूणांनी भान ठेवावी़ आधुनिकतेकडे वाटचाल नक्की करा, मात्र आपला धर्म, संस्कृती व दुसºया धर्माविषयी आदर नक्की वाळगा, देश व समाज हित साध्य करुण भ्रष्टाचार विरहित भारत निर्माण करण्यात योगदान द्यावा़प्रश्न : आपण किती भाषांमध्ये प्रवचनातून समाजप्रबोधन केले आहे ?उत्तर: वृंदावन, काशी, नैमिषारण्य, बद्रीनाथ, मिथिलाधाम, चित्रकूट सारखे देशातील महत्वपूर्ण तीर्थक्षेत्रामध्ये वृद्ध, गोरगरीबांमध्ये कथा श्रवनाचे कार्य केले आहे़ मराठी, आहीराणी, हिंदी, मारवाड़ी, गुजराती, भोजपुरी, मैथिली अशा १२ बोली भाषेत सातशे पेक्षाअधिक ठिकाणी देश-विदेशात भागवत, शिवकथा, रामकथा घेतल्या आहेत़ कथेच्या माध्यमातुन दिव्यांग, गोरगरीबांची रूग्णसेवा केली जाते़सावरकरांच्या मायभूमीत शिकलोनाशिक जिल्ह्यातील भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मगावी बालाजी मंदिरात १३ वर्षाचा असतांना पहिल्यांदा रामकथा केली होती़ त्यावेळी संत मोरारीबापू, गोविंददेव गिरीजी यांचे मार्गदर्शन लाभले़ तर संस्कृत पठण अवधूत जोशी गुरूजीच्या याच्याकडे पूर्ण केले़देशसेवा करण्याची इच्छा होतीबालवयापासुन स्वातंत्र्यवीर सावरकरांची पे्ररणा लाभल्याने सैन्यात भरर्ती होऊन राष्ट्रसेवेची इच्छा होती़ मात्र संधी न मिळाल्याने धर्मकार्यातुन समाज घडविण्याचे कार्य करीत आहे़ वनस्पतिशास्त्र विषयात बीएससी झाल्यानंतर जगदगुरू पद्मश्री नारायणदेवचार्यजी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली़ महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड छत्तीसगढ़, कर्नाटक अशा राज्यात रामकथा, भागवतकथा, देवी भागवत, शिवकथा भजनसंध्या प्रवचन केले़