शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांनो काळजी घ्या; धबधब्यासोबत सेल्फीचा मोह बेतू शकतो जिवावर !लळिंग धबधब्यावर अनेकांनी गमावला जीव; इतरही धबधब्यांवर सुरक्षांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:41 IST

जिल्ह्यात धुळे शहरालगत लळिंग कुरणात लांडोर बंगल्याशेजारी धबधबा अतिशय प्रसिद्ध आहे. त्या पाठोपाठ शिरपूर तालुक्यातील नवादेवी, धाबादेवी येथे पर्यटकांची ...

जिल्ह्यात धुळे शहरालगत लळिंग कुरणात लांडोर बंगल्याशेजारी धबधबा अतिशय प्रसिद्ध आहे. त्या पाठोपाठ शिरपूर तालुक्यातील नवादेवी, धाबादेवी येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. साक्री तालुक्यात अलालदरी आणि काकाकाकी धबधब्यावर मात्र फारसी गर्दी होत नाही.

लळिंग धबधब्यावर गेल्या काही वर्षांत ५०पेक्षा अधिक तरुणांचा बळी गेला आहे. त्यामुळे याठिकाणी तार कम्पाउंड करून धबधब्याकडे जाण्याचा मार्ग बंद केला आहे. शिवाय याठिकाणी सेल्फी काढण्यास आणि पोहोण्यास बंदी आहे. वन कर्मचाऱ्यांचाही बंदोबस्त असतो. इतर धबधब्यांवर मात्र सुरक्षा नाही.

लळिंग किल्ल्यावरदेखील सध्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गेल्या वर्षी सेल्फी काढण्याच्या नादात एका विवाहितेचा जीव गेला होता. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी.

अलालदरी धबधबा

साक्री तालुक्यात वनविभागाने अलालदरी धबधबा क्षेत्रात पर्यटनस्थळ विकसित केले आहे. याठिकाणी संरक्षक कम्पाउंड आणि शेड उभारले आहेत. जिल्ह्यातील सर्वांत उंच धबधबा असल्याने सेल्फीसाठी धोकेदायक आहे. धबधब्याच्या उमापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. परंतु पर्यटनस्थळी जाण्यासाठी रस्ता आहे. तेथून धबधब्याचे निसर्गसाैंदर्य पाहता येते. काळजी घेणे आवश्यक आहे.

नवादेवी धबधबा

शिरपूर तालुक्यात नवादेवी आणि धाबादेवी हे दोन धबधबेदेखील आता सर्वदूर प्रसिद्ध झाले असून, दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटनस्थळ विकसित केले नसल्याने सुरक्षेच्या कोणत्याही उपायोजना नाहीत. पर्यटकांमध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याने पोहोणाऱ्यांचे आणि सेल्फी काढणाऱ्यांचे प्रमाणदेखील जास्त आहे. त्यामुळे दुर्दैवी घटना घडू शकते. पर्यटकांनी काळजी घ्यावी.

धोक्याची सूचना देणारे कोणीही नाही

लळिंग धबधब्याचा अपवाद वगळता लळिंग किल्ला आणि जिल्ह्यातील इतर धबधब्यांवर सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत किंवा सूचना देणारेदेखील कोणी नाही. त्यामुळे पर्यटकांनी स्वत:च काळजी घेणे आवश्यक आहे.

जबाबदार कोण?

लळिंग धबधब्यावर आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. त्यात कुणालाही जबाबदार धरले नाही. पर्यटक स्वत:च जबादार आहेत. किल्ल्यावरील दुर्दैवी घटनेलाही पर्यटकच जबाबदार होते. परंतु इतर धबधब्यांवर सुरक्षा उपाययोजना नसल्याने जबाबदार कोणाला धरणार? असा प्रश्न आहे.