शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांनो काळजी घ्या; धबधब्यासोबत सेल्फीचा मोह बेतू शकतो जिवावर !लळिंग धबधब्यावर अनेकांनी गमावला जीव; इतरही धबधब्यांवर सुरक्षांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:41 IST

जिल्ह्यात धुळे शहरालगत लळिंग कुरणात लांडोर बंगल्याशेजारी धबधबा अतिशय प्रसिद्ध आहे. त्या पाठोपाठ शिरपूर तालुक्यातील नवादेवी, धाबादेवी येथे पर्यटकांची ...

जिल्ह्यात धुळे शहरालगत लळिंग कुरणात लांडोर बंगल्याशेजारी धबधबा अतिशय प्रसिद्ध आहे. त्या पाठोपाठ शिरपूर तालुक्यातील नवादेवी, धाबादेवी येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. साक्री तालुक्यात अलालदरी आणि काकाकाकी धबधब्यावर मात्र फारसी गर्दी होत नाही.

लळिंग धबधब्यावर गेल्या काही वर्षांत ५०पेक्षा अधिक तरुणांचा बळी गेला आहे. त्यामुळे याठिकाणी तार कम्पाउंड करून धबधब्याकडे जाण्याचा मार्ग बंद केला आहे. शिवाय याठिकाणी सेल्फी काढण्यास आणि पोहोण्यास बंदी आहे. वन कर्मचाऱ्यांचाही बंदोबस्त असतो. इतर धबधब्यांवर मात्र सुरक्षा नाही.

लळिंग किल्ल्यावरदेखील सध्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गेल्या वर्षी सेल्फी काढण्याच्या नादात एका विवाहितेचा जीव गेला होता. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी.

अलालदरी धबधबा

साक्री तालुक्यात वनविभागाने अलालदरी धबधबा क्षेत्रात पर्यटनस्थळ विकसित केले आहे. याठिकाणी संरक्षक कम्पाउंड आणि शेड उभारले आहेत. जिल्ह्यातील सर्वांत उंच धबधबा असल्याने सेल्फीसाठी धोकेदायक आहे. धबधब्याच्या उमापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. परंतु पर्यटनस्थळी जाण्यासाठी रस्ता आहे. तेथून धबधब्याचे निसर्गसाैंदर्य पाहता येते. काळजी घेणे आवश्यक आहे.

नवादेवी धबधबा

शिरपूर तालुक्यात नवादेवी आणि धाबादेवी हे दोन धबधबेदेखील आता सर्वदूर प्रसिद्ध झाले असून, दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटनस्थळ विकसित केले नसल्याने सुरक्षेच्या कोणत्याही उपायोजना नाहीत. पर्यटकांमध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याने पोहोणाऱ्यांचे आणि सेल्फी काढणाऱ्यांचे प्रमाणदेखील जास्त आहे. त्यामुळे दुर्दैवी घटना घडू शकते. पर्यटकांनी काळजी घ्यावी.

धोक्याची सूचना देणारे कोणीही नाही

लळिंग धबधब्याचा अपवाद वगळता लळिंग किल्ला आणि जिल्ह्यातील इतर धबधब्यांवर सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत किंवा सूचना देणारेदेखील कोणी नाही. त्यामुळे पर्यटकांनी स्वत:च काळजी घेणे आवश्यक आहे.

जबाबदार कोण?

लळिंग धबधब्यावर आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. त्यात कुणालाही जबाबदार धरले नाही. पर्यटक स्वत:च जबादार आहेत. किल्ल्यावरील दुर्दैवी घटनेलाही पर्यटकच जबाबदार होते. परंतु इतर धबधब्यांवर सुरक्षा उपाययोजना नसल्याने जबाबदार कोणाला धरणार? असा प्रश्न आहे.