शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

पर्यटकांनो काळजी घ्या; धबधब्यासोबत सेल्फीचा मोह बेतू शकतो जिवावर !लळिंग धबधब्यावर अनेकांनी गमावला जीव; इतरही धबधब्यांवर सुरक्षांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:41 IST

जिल्ह्यात धुळे शहरालगत लळिंग कुरणात लांडोर बंगल्याशेजारी धबधबा अतिशय प्रसिद्ध आहे. त्या पाठोपाठ शिरपूर तालुक्यातील नवादेवी, धाबादेवी येथे पर्यटकांची ...

जिल्ह्यात धुळे शहरालगत लळिंग कुरणात लांडोर बंगल्याशेजारी धबधबा अतिशय प्रसिद्ध आहे. त्या पाठोपाठ शिरपूर तालुक्यातील नवादेवी, धाबादेवी येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. साक्री तालुक्यात अलालदरी आणि काकाकाकी धबधब्यावर मात्र फारसी गर्दी होत नाही.

लळिंग धबधब्यावर गेल्या काही वर्षांत ५०पेक्षा अधिक तरुणांचा बळी गेला आहे. त्यामुळे याठिकाणी तार कम्पाउंड करून धबधब्याकडे जाण्याचा मार्ग बंद केला आहे. शिवाय याठिकाणी सेल्फी काढण्यास आणि पोहोण्यास बंदी आहे. वन कर्मचाऱ्यांचाही बंदोबस्त असतो. इतर धबधब्यांवर मात्र सुरक्षा नाही.

लळिंग किल्ल्यावरदेखील सध्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गेल्या वर्षी सेल्फी काढण्याच्या नादात एका विवाहितेचा जीव गेला होता. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी.

अलालदरी धबधबा

साक्री तालुक्यात वनविभागाने अलालदरी धबधबा क्षेत्रात पर्यटनस्थळ विकसित केले आहे. याठिकाणी संरक्षक कम्पाउंड आणि शेड उभारले आहेत. जिल्ह्यातील सर्वांत उंच धबधबा असल्याने सेल्फीसाठी धोकेदायक आहे. धबधब्याच्या उमापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. परंतु पर्यटनस्थळी जाण्यासाठी रस्ता आहे. तेथून धबधब्याचे निसर्गसाैंदर्य पाहता येते. काळजी घेणे आवश्यक आहे.

नवादेवी धबधबा

शिरपूर तालुक्यात नवादेवी आणि धाबादेवी हे दोन धबधबेदेखील आता सर्वदूर प्रसिद्ध झाले असून, दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटनस्थळ विकसित केले नसल्याने सुरक्षेच्या कोणत्याही उपायोजना नाहीत. पर्यटकांमध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याने पोहोणाऱ्यांचे आणि सेल्फी काढणाऱ्यांचे प्रमाणदेखील जास्त आहे. त्यामुळे दुर्दैवी घटना घडू शकते. पर्यटकांनी काळजी घ्यावी.

धोक्याची सूचना देणारे कोणीही नाही

लळिंग धबधब्याचा अपवाद वगळता लळिंग किल्ला आणि जिल्ह्यातील इतर धबधब्यांवर सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत किंवा सूचना देणारेदेखील कोणी नाही. त्यामुळे पर्यटकांनी स्वत:च काळजी घेणे आवश्यक आहे.

जबाबदार कोण?

लळिंग धबधब्यावर आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. त्यात कुणालाही जबाबदार धरले नाही. पर्यटक स्वत:च जबादार आहेत. किल्ल्यावरील दुर्दैवी घटनेलाही पर्यटकच जबाबदार होते. परंतु इतर धबधब्यांवर सुरक्षा उपाययोजना नसल्याने जबाबदार कोणाला धरणार? असा प्रश्न आहे.