शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

पर्यटकांनो काळजी घ्या; धबधब्यासोबत सेल्फीचा मोह बेतू शकतो जिवावर !लळिंग धबधब्यावर अनेकांनी गमावला जीव; इतरही धबधब्यांवर सुरक्षांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:41 IST

जिल्ह्यात धुळे शहरालगत लळिंग कुरणात लांडोर बंगल्याशेजारी धबधबा अतिशय प्रसिद्ध आहे. त्या पाठोपाठ शिरपूर तालुक्यातील नवादेवी, धाबादेवी येथे पर्यटकांची ...

जिल्ह्यात धुळे शहरालगत लळिंग कुरणात लांडोर बंगल्याशेजारी धबधबा अतिशय प्रसिद्ध आहे. त्या पाठोपाठ शिरपूर तालुक्यातील नवादेवी, धाबादेवी येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. साक्री तालुक्यात अलालदरी आणि काकाकाकी धबधब्यावर मात्र फारसी गर्दी होत नाही.

लळिंग धबधब्यावर गेल्या काही वर्षांत ५०पेक्षा अधिक तरुणांचा बळी गेला आहे. त्यामुळे याठिकाणी तार कम्पाउंड करून धबधब्याकडे जाण्याचा मार्ग बंद केला आहे. शिवाय याठिकाणी सेल्फी काढण्यास आणि पोहोण्यास बंदी आहे. वन कर्मचाऱ्यांचाही बंदोबस्त असतो. इतर धबधब्यांवर मात्र सुरक्षा नाही.

लळिंग किल्ल्यावरदेखील सध्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गेल्या वर्षी सेल्फी काढण्याच्या नादात एका विवाहितेचा जीव गेला होता. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी.

अलालदरी धबधबा

साक्री तालुक्यात वनविभागाने अलालदरी धबधबा क्षेत्रात पर्यटनस्थळ विकसित केले आहे. याठिकाणी संरक्षक कम्पाउंड आणि शेड उभारले आहेत. जिल्ह्यातील सर्वांत उंच धबधबा असल्याने सेल्फीसाठी धोकेदायक आहे. धबधब्याच्या उमापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. परंतु पर्यटनस्थळी जाण्यासाठी रस्ता आहे. तेथून धबधब्याचे निसर्गसाैंदर्य पाहता येते. काळजी घेणे आवश्यक आहे.

नवादेवी धबधबा

शिरपूर तालुक्यात नवादेवी आणि धाबादेवी हे दोन धबधबेदेखील आता सर्वदूर प्रसिद्ध झाले असून, दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटनस्थळ विकसित केले नसल्याने सुरक्षेच्या कोणत्याही उपायोजना नाहीत. पर्यटकांमध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याने पोहोणाऱ्यांचे आणि सेल्फी काढणाऱ्यांचे प्रमाणदेखील जास्त आहे. त्यामुळे दुर्दैवी घटना घडू शकते. पर्यटकांनी काळजी घ्यावी.

धोक्याची सूचना देणारे कोणीही नाही

लळिंग धबधब्याचा अपवाद वगळता लळिंग किल्ला आणि जिल्ह्यातील इतर धबधब्यांवर सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत किंवा सूचना देणारेदेखील कोणी नाही. त्यामुळे पर्यटकांनी स्वत:च काळजी घेणे आवश्यक आहे.

जबाबदार कोण?

लळिंग धबधब्यावर आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. त्यात कुणालाही जबाबदार धरले नाही. पर्यटक स्वत:च जबादार आहेत. किल्ल्यावरील दुर्दैवी घटनेलाही पर्यटकच जबाबदार होते. परंतु इतर धबधब्यांवर सुरक्षा उपाययोजना नसल्याने जबाबदार कोणाला धरणार? असा प्रश्न आहे.