शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
3
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
4
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
5
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
6
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
7
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
8
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
9
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
10
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
11
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
12
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
13
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
14
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
15
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
16
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
17
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
18
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
19
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
20
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   

विधानसभा निवडणुकीचे पडसाद उमटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:29 IST

साक्री तालुका : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

आबा सोनवणे ।आॅनलाइन लोकमतसाक्री : भाजपच्या मेगा भरती मध्ये तालुक्यातील काँग्रेसच्या नेत्यांनीही या पक्षात प्रवेश केल्याने, तालुक्यात भाजपचे पारडे जड झाले. असे असले तरी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्याचे पडसाद आता येऊ घातलेला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. विधानसभेत अपयश आल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हे नेते त्याची भरपाई करणार का? याचे मोठे औत्सुक्य तालुक्याला लागलेले आहे.साक्री तालुक्यात जिल्हा परिषदेचे १७ गट आहेत. त्यापैकी कासारे, निजामपूर, व दुसाने हे तीन गट सर्वसाधारण आहेत. गेले तीन टर्म साक्री तालुक्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. आगामी निवडणुकीत साक्री तालुक्याचा वरचष्मा राहणार का? याविषयी आता साशंकता निर्माण झाली आहे. कारण स्वत: शिवाजीराव दहिते हे या वेळेस निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत आहेत. त्यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र हर्षवर्धन दहिते हे निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे. परंतु त्यांचा स्वत:चा सामोडे गट हा राखीव झाला असल्याने, ते कासारे गटातून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. यावेळेस कासारे गटाचीची लढाई तगडी राहणार आहे. कारण याच गटातून शिवसेनेचे तालुकाप्रमुख व प्रथम लोकनियुक्त सरपंच विशाल देसले व त्यांचे बंधू सचिन देसले हे उमेदवारी करण्यास इच्छूक आहेत. माजी पंचायत समिती सदस्य गोकुळ परदेशी हे येथून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश रामराव पाटील हेही कदाचित येथून आपले नशीब आजमावू शकतात. त्यांच्यापुढे कासारे दुसाने व निजामपूर असे तीन गटांचे पर्याय उपलब्ध आहेत.जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व राहिले तर ते अध्यक्षपदाचे दावेदार असू शकतात. हर्षवर्धन दहिते व सुरेश पाटील हे एकाच पक्षात असल्याने त्यांच्या गटांची अदलाबदल होऊ शकते, ही शक्यता आहे. विशाल देसले किंवा सचिन देसले यांच्यापैकी कोण उमेदवारी करतो, यावर बरेच अवलंबून राहणार आहे.राज्यात भाजप-शिवसेनेची युती तुटल्यामुळे समीकरणे बदलली आहेत.प्रमुख राजकीय नेते हे भाजपत गेल्याने, आता बिगर आदिवासी भागात शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होईल. तर आदिवासी भागात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत राहील. आदिवासी भागातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी अपक्ष उमेदवार मंजुळा गावित यांना पाठिंबा देऊन काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करण्यास हातभार लावला होता. परंतु तेच नेते आता काँग्रेसमध्ये असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे पिंपळनेर व दहिवेल पट्ट्यात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.तशीच परिस्थिती पंचायत समितीच्या ३४ गणांमध्ये राहणार आहे. यापैकी १४ गण हे सर्वसाधारण ओबीसी राखीव महिला व पुरुषांसाठी आहेत. येथेही चुरस सर्वसाधारण व ओबीसी गणांमध्ये दिसून येईल. त्यातही महत्त्वाचा असलेला धाडणे, कासारे, म्हसदी, धमणार, निजामपूर येथे मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेचे गट व गणांमध्ये इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच चाचणी सुरू केली आहे. आता कोणाकोणाला संधी मिळते, ते येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे