शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

कांद्यावर बुरशी लागण्याचे प्रमाण वाढले असेल तरी यावर उपाय शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST

मालपूरसह संपूर्ण परिसरात सध्या शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजला जाणारा कापूस लाल, तर नगदी कांदा पिकाची पात पिरगळून वाफे बसण्याचा ...

मालपूरसह संपूर्ण परिसरात सध्या शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजला जाणारा कापूस लाल, तर नगदी कांदा पिकाची पात पिरगळून वाफे बसण्याचा प्रमाणात या आठवड्यात मोठी वाढ झाली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे यांनी मालपूर, कलवाडे, चुडाणे रोड आदी शेतशिवारात शेत बांधावर जाऊन कापूस व कांदा पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत दोंडाईचा मंडळ कृषी अधिकारी नवनाथ सांबळे. कृषी पर्यवेक्षक एच. पी. बाविस्कर आदी उपस्थित होते.

अतिवृष्टी व गेल्या महिनाभरापासून आभाळ झाकलेले आहे. पुरेशा प्रमाणात पिकांना सूर्यप्रकाश मिळत नाही. जमिनीत ओलावा कायम असल्याने जमिनीतील बुरशीचे प्रमाण वाढल्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कांदा पिकावर काय उपाययोजना कराव्यात याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी शास्त्रज्ञांशी प्रत्यक्ष मोबाइलवरून शेतकऱ्यांचे बोलणेदेखील करून दिले. हवामानातील बदलामुळे पिकांची अशी परिस्थिती झालेली दिसून येत आहे. यावेळी शेतकरी किसन खलाणे, नंदलाल पाकळे, काशीनाथ अहिरे, विक्रेते प्रशांत आडगाळे पत्रकार रवींद्र राजपूत आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

180921\20210915_171607.jpg

मालपूर येथे पीक पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे नवनाथ साबळे