शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

पुन्हा एकदा काँग्रेस-भाजपमध्ये लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 13:09 IST

धुळे लोकसभा मतदारसंघ

ठळक मुद्दे  डॉ.भामरे यांच्यासमोर रोहिदास पाटील यांचे आव्हान

राजेंद्र शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : धुळे लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्टÑाचे लक्ष लागून आहे. कारण या मतदारसंघातूनच भाजपतर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आणि काँग्रेसतर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी महाराष्टÑात लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मतदारसंघातून भाजपतर्फे विद्यमान खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे तर काँग्रेसतर्फे ज्येष्ट नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे नाव जवळपास निश्चित असून दोघांनी आधीच आपला प्रचार सुद्धा सुरु केला आहे. दोघी पाटीलद्वयी मधील ही लढत रंगतदार आणि चुरशीची ठरणार आहे.भाजपचे खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे हे केंद्रात धुळ्याचे प्रतिनिधीत्व करतात. जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथील आतंकी हल्याच्या घटनेनंतर लगेच दोन दिवसातच सभा घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धुळ्यातूनच राज्यात लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. त्यांनी यावेळी मनमाड - धुळे - इंदूर रेल्वेमार्गाच्या कामात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या धुळे - नरडाणा रेल्वेमार्गाच्या कामाचा शुभारंभ केला. तसेच सुलवाडे - जामफळ - कनोली या सिंचन योजनेसहीत विविध विकास कामांचे उद्घाटन केले. शिवसेना - भाजप युती झाल्याने निवडणुकीत मत विभागणीचा प्रश्नही सुटला आहे.मात्र दुसरीकडे भाजपचे धुळे शहर आमदार अनिल गोटे यांनी मात्र डॉ.भामरे यांच्याविरोधात प्रचार करणार असल्याचे जाहीर करुन पक्षासमोर अडचण निर्माण केली आहे. तसेच मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून गेल्यावेळेस डॉ.भामरे यांना मतदान कमी मिळाले होते. यंदा त्याठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे.दुसरीकडे काँग्रेसतर्फे गेल्या दोन लोकसभा निवडणुकीपासून येथून उमेदवारीसाठी इच्छूक माजी मंत्री व ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले असून त्यावर पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी धुळ्यातून राज्यात पक्षाच्या प्रचाराला सुरुवात करुन एकप्रकारे शिक्कामोर्तब केला आहे.यंदा पक्षाचे अँकर गटाचे आमदार अमरिशभाई पटेल यांनी स्वत: रोहिदास पाटील यांना पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी आग्रही भूमिकेत आहेत. त्यामुळे अँकर व जवाहर गट एकत्र आल्याचे चित्र आहे. याशिवाय राष्टÑवादीसुद्धा यंदा एकदिलाने काम करीत असल्याचे चित्र धुळे महापालिका निवडणुकीतही दिसून आले. महापालिकेत त्यांना यश मिळाले नाही, ही गोष्ट दुसरी पण ते एकत्र दिसले. याशिवाय भाजपचे आमदार अनिल गोटे यांचा डॉ. भामरे यांना विरोध या काँग्रेसच्या पथ्थ्यावरच पडणाऱ्या जमेच्या बाजू आहे.मात्र बागलाण परिसरात वर्चस्व असलेले पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे हे सुद्धा गेल्या दोन पंचवार्षिकपासून पक्षातर्फे उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. यंदाही त्यांनी उमेदवारीसाठी इच्छा जाहीर केली होती. परंतु पक्षाने परत एकदा त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे बागलाण परिसरातील नाराज पक्ष कार्यकर्ते व नेतेमंडळींची मने वळवून त्यांना सोबत घेण्याचे काम पक्षाला आणि रोहिदास पाटील यांना करावे लागणार आहे.

टॅग्स :Politicsराजकारण