शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

मनोमिलनाच्या घोषणेनंतरही प्रश्न अनुत्तरीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 11:01 PM

डॉ.सुभाष भामरे व अनिल गोटे एका व्यासपीठावर दिसणार का : राष्टÑवादीतून भाजपमध्ये आलेल्यांचे भवितव्य काय?

ठळक मुद्देराष्ट्रवादीतून आलेल्याचे काय ?  जे निवडून येऊ शकतात, अशा राष्टÑवादीतून भाजपमध्ये प्रवेश दिलेल्या उमेदवारांचे भवितव्य काय राहणार. कारण आमदार गोटे त्यांच्यातील अनेकांच्या प्रवेशावर नाराज होते. ते त्यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांचे भाजपमधील भवितव्य काप्रभारी गिरीश महाजनांची भूमिका आमदार अनिल गोटे यांनी स्पष्ट म्हटले आहे की, महापालिका त्यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. मग पक्षाचे प्रभारी गिरीश महाजन यांची भूमिका काय राहणार, हाही एक प्रश्नच आहे.७०-३० चा फॉर्म्युला वापरणार का आमदार अनिल गोटे आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्यात जर दिलजमाई झाली तर मग सुरुवातीला चर्चेत असणाºया ७०-३० या फॉर्म्युल्याप्रमाणे जागा वाटप होणार, की नवीन कोणता फॉर्मुला वापरला जाणार, याबाबत चर्चा सुरु झा

राजेंद्र शर्मा। लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने  केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे यांच्या गटात गेल्या दोन महिन्यांपासून रंगत चाललेला सामना रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेमुळे अर्निणीत राहणार असल्याचे चित्र आहे. आणि सोमवारी रात्री मुंबईत पक्षश्रेष्ठी आणि आमदार गोटे यांच्यातील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे जर सर्वकाही तसेच घडले. तर  एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर टीका करणारे भाजपचे हे नेते पुन्हा एक व्यासपीठावर येणार का, तसेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या लोकांचे भवितव्य आता काय राहणार, त्यांना जर भाजपने तिकिट नाकारले तर ते बंडखोरी करणार का, त्यांचे भवितव्य काय असणार, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. धुळे महानगरपालिका निवडणुकीत  सध्या शहरात भाजपामधील दोन समांतर  गटांचे प्रचार कार्यालय कार्यरत आहेत. एका प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार अनिल गोटे यांनी केले तर दुसºया कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे. दोन्ही प्रचार कार्यालयात १९ प्रभागातील ७४ जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या स्वतंत्र मुलाखतीसुद्धा झाल्या आहेत. महापालिका निवडणुकीसाठी आयोजित प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारसभेतील गोंधळ नंतर दुसºया दिवशी आमदार गोटे यांनी महापौर पदासाठी जाहीर केलेली आपली उमेदवारी अणि आमदार पदाचा राजीनामा देण्याची घोषणा, त्यानंतर  गेल्या आठवडयात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे यांच्यात पत्रकार परिषदेतून रंगलेला कलगीतुरा या घटना ताज्या आहेत. त्यातच रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की, आमदार अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देणार नसून ते महापालिका निवडणुकीत पक्षाचा प्रचार करतील. या घोषणेनंतर महापालिका निवडणुकीचे राजकीय गणितच बदलले आहे. कारण आमदार अनिल गोटे यांच्याकडे जर महापालिका निवडणुकीची धुरा गेली तर मग प्रचारासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, भाजपचे महापालिका निवडणूक प्रभारी गिरीश महाजन, रोहयो मंत्री जयकुमार रावल हे एका व्यासपीठावर येतील का, असा सवाल निर्माण होत आहे. कारण डॉ.भामरे आणि गोटे या दोन्ही गटांकडून एकमेकांवर झालेल्या आरोप- प्रत्यारोपानंतर ते कसे शक्य होणार, हाही एक प्रश्नच आहे. कारण ज्यांच्या सभाच एकमेकांवर आरोप करण्यामुळे गाजत होत्या. त्यांना आता बोलण्यासाठी कोणता विषय राहिल. काय सांगतील एकमेकांबद्दल, ते लोकांना कुठपर्यंत रुचेल. पक्षातील कार्यकर्त्यांनाही ते मान्य होईल का, हे सर्वप्रश्न आजतरी अनुत्तरीत आहे. पण म्हणतात ना की, राजकारणात काहीही अशक्य नसते, त्यामुळे हे सर्व पुन्हा एका व्यासपीठावर येणेही अशक्य नाही. पण याचा परिणाम महापालिका निवडणुकीत पॉझीटीव्ह होतो की निगेटीव्ह ते महापालिका निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. एवढे मात्र, निश्चित आहे की, बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर निश्चितच दिसून येणार आहे.

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस