शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने ५ दिवस जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 11:59 AM

नेर : सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला निर्णय, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार राहणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : धुळे तालुक्यातील नेर येथे ५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकीत १२ ते १६ आॅगस्टपर्यंत जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहे.मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या पाच रुग्णांच्या संपर्कातील ३६ जणांचे स्वॅब घेतल्यानंतर त्यांना नेर येथे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयात २० तर खाजगी लॅबला १६ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. सकाळी ग्रामपंचायत आवारात सर्वपक्षीय बैठकीत वाढत्या रुग्ण्संख्येवर चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच पाच दिवस सर्व व्यवहार बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात नेर गावातील ५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने गावात पाच दिवासांसाठी जनता कर्फ्यू लागू केला आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, अस्थापना बंद राहणार असून नियमांचा भंग करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरपंच शंकर खलाणे यांनी दिला आहे.नेर गाव हे धुळे-सुरत महामार्गावरील बाजारपेठेचे गाव आहे. यामुळे गावाची लोकसंख्याही अधिक आहे. सुरुवातीपासून कोरोनाबाबत खबरदारी घेण्यात येत असतानाच कोरोनाने गावात शिरकाव केला आहे. एका हॉटेल व्यवसायिकाच्या आईला कोरोना झाल्यानंतर गावात एक ते दोन कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर गावाने कोरोनावर मात केली होती. त्यानंतर पुन्हा दोन ते तीन रुग्ण आढळून आले होते. तसेच एका खासगी डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली होती. तरीही अनेक नागरिक हे मास्क न लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, बाहेरगावी अनावश्यक प्रवास करीत आहेत. त्यामुळेच पुन्हा गावात कोरोनाने जोरदार शिरकाव केला आहे. आता पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे गावात खळबळ उडाली असून नागरिकांनी घाबरून न जाता स्वत: सह कुटुंबाची काळजी घेऊन घरातच सुरक्षित रहावे. तसेच कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.नेर गावात पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने ग्रामपंचायतीने अधिकच खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. गावाची लोकसंख्या अधिक असल्याने कोरोनाचा संसर्ग अधिक फैलू नये म्हणून ग्रामपंचायतीने गाव पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १२ ते १६ आॅगस्टपर्यंत गाव बंद ठेवण्यात येणार आहे.यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत किराणा दुकान सुरू राहतील. ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पोलिस पाटील, पोलिस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग आणि सामाजिक कार्यकर्ते हे गावात लक्ष ठेवून राहणार असून कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आला आहे.