शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

‘शिरपूर पॅटर्न’चे २०० बंधारे ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 7:20 PM

जलक्रांतीचे दुसरे पर्व : बारमाही शेतीबरोबर आता मत्स रोजगाराकडे लक्ष

सुनील साळुंखे ।लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : या तालुक्यात सरासरीच्या १२१ टक्के पाऊस होवूनही अद्यापही बहुतांशी बंधारे पाण्याने भरलेली नाहीत़ मात्र ‘शिरपूर पॅटर्न’ अंतर्गत बांधण्यात आलेले २४० पैकी २०० बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत़ माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या दुरदृष्टीतून हा तालुका सुजलाम-सुफलाम होत असतांना त्यासोबत शेतकऱ्यांना बारमाही पिके घेता येत आहेत़ तसेच आदिवासींना देखील रोजगार मिळावा म्हणून त्या बंधाºयात मत्स बीज टाकून रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे़माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी १७ वर्षापूर्वीच जलक्रांतीचा ‘शिरपूर पॅटर्न’ राबविला़ तालुका आज त्याची फळे चाखत आहे़ संपूर्ण देशात या पॅटर्नची चर्चा आहे़पारंपरिक जलस्त्रोतांचा विचार करता नाले, विहिरी यांच्याकडे लक्ष केंद्रीत होते़ विहिर पुनर्भरण अथवा विहिरींची पाणी पातळी वाढवणे हे उपाय पाणी टंचाईवर करणे अपेक्षित आहे़ ‘शिरपूर पॅटर्न’चे हेच ध्येयसूत्र आहे़ विहिरींची जलपातळी वाढवणे, जमिनीखालील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे अथवा वाढवणे यासाठी बारमाही नाले वाहते ठेवणे आवश्यक आहे़हा मूलभूत सिध्दांत भूजल वैज्ञानिक दिनेश जोशी यांनी शिरपूर परिसरात प्रात्यक्षिकरूपात सिद्ध करून दाखवला, यालाच आधुनिक जलक्रांती अर्थात शिरपूर ‘जलसंधारण पॅटर्न’ म्हणतात़या पॅटर्न अंतर्गत पारंपरिक नाले अधिक खोल करणे, अधिक रूंद करणे, नाल्यांची साखळी तयार करणे, वरच्या नाल्याचे अतिरिक्त पाणी खालच्या नाल्यात पोहोचवणे, पाणी अडवण्यासाठी या नाल्यांवर सिमेंटचे बंधारे बांधणे, नाल्यात साठलेल्या पाण्यात मत्स्यबीज सोडून मासेमारी व्यवसायाला चालना देणे, नाल्यात साठवलेले पाणी पंपाद्वारे स्थानिक शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात पोहोचवणे, बारमाही वाहत्या साखळी नाल्यांमुळे परिसरातील भूजल पातळी वाढणे आदी या सर्वांचा दृश्य व एकत्रित परिणाम म्हणून पिकवृध्दी, उत्पादन वाढ होणे तसेच बळीराजाच्या उत्पन्नात वाढ होवून त्याचा जीवनस्तर उंचावणे हे या ‘शिरपूर पॅटर्न’चे फलित आहे़ शिरपूर जलसंधारण पॅटर्नची तांत्रिक बाजू तितकीच महत्त्वाची आहे़ यात भूजल विज्ञानातले तंत्र वापरण्यात आले आहे़प्राथमिक स्तरावर परिसरातला पर्जन्यकाळ, पावसाचे प्रमाण, मृदेचा दर्जा, शेतकºयांची मानसिकता यांचा अभ्यास सुरेश खानापूरकरांनी केला़ दुष्काळावर मात करण्याच्या दृष्टीने तीन वर्षाचे पाणी साठविण्याचे उद्दिष्ठ ठेवले़ त्यानुसार लहान नाल्यांवर छोटे परंतु साठवण क्षमता अधिक असलेले बंधारे बांधले़ त्यात तीन वर्षाचे पाणी साठविले़आपल्याकडच्या जमिनीत डेक्कन बेसॉल्टचे फॉर्मेशन आहे़ त्यात मुरूम व नंतर दगड असे ३५ पेक्षा जास्त थर आहेत़ मुरूमाच्या स्तरांची जाडी व घनता कमी आहे़ त्यांची साठवण क्षमता २५ टक्के आहे़ म्हणजेच हे थर केवळ १०० घनफूट पाणी धरून ठेवू शकतात़ यापेक्षा जास्त पाणी ते धरून ठेऊ शकत नसल्यामुळे, शिवाय दगडांचे खाली वर थर असल्यानेही जास्त पाणी हे मुरूमांचे स्तर धरून ठेऊ शकत नाही़ त्यामुळे पाण्याचा मुबलक साठा होत नाही़ ही जमिनीखालील प्रतिकूलता असली तरी याच प्रतिकूलतेचा अनुकूल वापरही करता येऊ शकेल ही अभिनव कल्पना ज्या दिवशी सूचली त्याच दिवशी खरे तर ‘शिरपूर पॅटर्न’चा जन्म झाला़परिसरातील उथळ व कडक नाले आधी खोल केले़ त्यातून निघालेले काळ्या व पिवळ्या मातीचे थर बाजूला टाकले, वाळू काढली़ दगड फोडून काढले़मुरूमाच्या थरावर ३० ते ३५ फूट पाण्याचा साठा बंधारे बांधून केला़ हायड्रोस्टॅटिक प्रेशर दगडातला पाणी वाहण्याचा वेग वाढवितो म्हणून हा प्रेशर तयार होण्यासाठी नाले खोल केले़आतापर्यंत तालुक्यात या पॅटर्न पध्दतीनुसार २४० बंधारे बांधले गेले आहेत़ तालुक्याच्या पलिकडे शिंदखेडा परिसरातही शिरपूर जलसंधारणाचा धरतीवरील अनेक बंधारे बांधले गेले आहेत़ शेकडो एकर जमीन या पॅटर्ननुसार जलसिंचनाच्या क्षेत्रात आली आहे़एक बंधारा कोट्यवधी लिटर पाणी साठवतो़ या पाणी साठ्यामुळे बंधाºयाच्या परिसरातील अर्ध्या किमी पर्यंत पाणी मुरत जाते़ परिणाम स्वरूप विहिरींची जलपातळी वाढली़या पॅटर्नची वैशिष्टये अशी आहेत की, या पॅटर्नमुळे विस्थापन होत नाही, कुणाचे पुनर्वसन करावे लागत नाही़ भू-संपादन करावे लागत नाही़ पर्यावरणाची हानी न होता जलसंधारणाचे कार्य घडते़ बळीराजाच्या उत्पन्नात कुठलाही अतिरिक्त खर्च न करता वाढ होवून त्यांचे जीवनमान उंचावते म्हणूनच ज्या-ज्या विभागांनी शिरपूर जलक्रांतीला दीपस्तंभ मानून या पॅटर्नचा अवलंब केला त्या भागात शेतकरी आत्महत्येची चर्चा ऐकवयास येत नाही़