शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

‘शिरपूर पॅटर्न’चे २०० बंधारे ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 19:20 IST

जलक्रांतीचे दुसरे पर्व : बारमाही शेतीबरोबर आता मत्स रोजगाराकडे लक्ष

सुनील साळुंखे ।लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : या तालुक्यात सरासरीच्या १२१ टक्के पाऊस होवूनही अद्यापही बहुतांशी बंधारे पाण्याने भरलेली नाहीत़ मात्र ‘शिरपूर पॅटर्न’ अंतर्गत बांधण्यात आलेले २४० पैकी २०० बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत़ माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या दुरदृष्टीतून हा तालुका सुजलाम-सुफलाम होत असतांना त्यासोबत शेतकऱ्यांना बारमाही पिके घेता येत आहेत़ तसेच आदिवासींना देखील रोजगार मिळावा म्हणून त्या बंधाºयात मत्स बीज टाकून रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे़माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी १७ वर्षापूर्वीच जलक्रांतीचा ‘शिरपूर पॅटर्न’ राबविला़ तालुका आज त्याची फळे चाखत आहे़ संपूर्ण देशात या पॅटर्नची चर्चा आहे़पारंपरिक जलस्त्रोतांचा विचार करता नाले, विहिरी यांच्याकडे लक्ष केंद्रीत होते़ विहिर पुनर्भरण अथवा विहिरींची पाणी पातळी वाढवणे हे उपाय पाणी टंचाईवर करणे अपेक्षित आहे़ ‘शिरपूर पॅटर्न’चे हेच ध्येयसूत्र आहे़ विहिरींची जलपातळी वाढवणे, जमिनीखालील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे अथवा वाढवणे यासाठी बारमाही नाले वाहते ठेवणे आवश्यक आहे़हा मूलभूत सिध्दांत भूजल वैज्ञानिक दिनेश जोशी यांनी शिरपूर परिसरात प्रात्यक्षिकरूपात सिद्ध करून दाखवला, यालाच आधुनिक जलक्रांती अर्थात शिरपूर ‘जलसंधारण पॅटर्न’ म्हणतात़या पॅटर्न अंतर्गत पारंपरिक नाले अधिक खोल करणे, अधिक रूंद करणे, नाल्यांची साखळी तयार करणे, वरच्या नाल्याचे अतिरिक्त पाणी खालच्या नाल्यात पोहोचवणे, पाणी अडवण्यासाठी या नाल्यांवर सिमेंटचे बंधारे बांधणे, नाल्यात साठलेल्या पाण्यात मत्स्यबीज सोडून मासेमारी व्यवसायाला चालना देणे, नाल्यात साठवलेले पाणी पंपाद्वारे स्थानिक शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात पोहोचवणे, बारमाही वाहत्या साखळी नाल्यांमुळे परिसरातील भूजल पातळी वाढणे आदी या सर्वांचा दृश्य व एकत्रित परिणाम म्हणून पिकवृध्दी, उत्पादन वाढ होणे तसेच बळीराजाच्या उत्पन्नात वाढ होवून त्याचा जीवनस्तर उंचावणे हे या ‘शिरपूर पॅटर्न’चे फलित आहे़ शिरपूर जलसंधारण पॅटर्नची तांत्रिक बाजू तितकीच महत्त्वाची आहे़ यात भूजल विज्ञानातले तंत्र वापरण्यात आले आहे़प्राथमिक स्तरावर परिसरातला पर्जन्यकाळ, पावसाचे प्रमाण, मृदेचा दर्जा, शेतकºयांची मानसिकता यांचा अभ्यास सुरेश खानापूरकरांनी केला़ दुष्काळावर मात करण्याच्या दृष्टीने तीन वर्षाचे पाणी साठविण्याचे उद्दिष्ठ ठेवले़ त्यानुसार लहान नाल्यांवर छोटे परंतु साठवण क्षमता अधिक असलेले बंधारे बांधले़ त्यात तीन वर्षाचे पाणी साठविले़आपल्याकडच्या जमिनीत डेक्कन बेसॉल्टचे फॉर्मेशन आहे़ त्यात मुरूम व नंतर दगड असे ३५ पेक्षा जास्त थर आहेत़ मुरूमाच्या स्तरांची जाडी व घनता कमी आहे़ त्यांची साठवण क्षमता २५ टक्के आहे़ म्हणजेच हे थर केवळ १०० घनफूट पाणी धरून ठेवू शकतात़ यापेक्षा जास्त पाणी ते धरून ठेऊ शकत नसल्यामुळे, शिवाय दगडांचे खाली वर थर असल्यानेही जास्त पाणी हे मुरूमांचे स्तर धरून ठेऊ शकत नाही़ त्यामुळे पाण्याचा मुबलक साठा होत नाही़ ही जमिनीखालील प्रतिकूलता असली तरी याच प्रतिकूलतेचा अनुकूल वापरही करता येऊ शकेल ही अभिनव कल्पना ज्या दिवशी सूचली त्याच दिवशी खरे तर ‘शिरपूर पॅटर्न’चा जन्म झाला़परिसरातील उथळ व कडक नाले आधी खोल केले़ त्यातून निघालेले काळ्या व पिवळ्या मातीचे थर बाजूला टाकले, वाळू काढली़ दगड फोडून काढले़मुरूमाच्या थरावर ३० ते ३५ फूट पाण्याचा साठा बंधारे बांधून केला़ हायड्रोस्टॅटिक प्रेशर दगडातला पाणी वाहण्याचा वेग वाढवितो म्हणून हा प्रेशर तयार होण्यासाठी नाले खोल केले़आतापर्यंत तालुक्यात या पॅटर्न पध्दतीनुसार २४० बंधारे बांधले गेले आहेत़ तालुक्याच्या पलिकडे शिंदखेडा परिसरातही शिरपूर जलसंधारणाचा धरतीवरील अनेक बंधारे बांधले गेले आहेत़ शेकडो एकर जमीन या पॅटर्ननुसार जलसिंचनाच्या क्षेत्रात आली आहे़एक बंधारा कोट्यवधी लिटर पाणी साठवतो़ या पाणी साठ्यामुळे बंधाºयाच्या परिसरातील अर्ध्या किमी पर्यंत पाणी मुरत जाते़ परिणाम स्वरूप विहिरींची जलपातळी वाढली़या पॅटर्नची वैशिष्टये अशी आहेत की, या पॅटर्नमुळे विस्थापन होत नाही, कुणाचे पुनर्वसन करावे लागत नाही़ भू-संपादन करावे लागत नाही़ पर्यावरणाची हानी न होता जलसंधारणाचे कार्य घडते़ बळीराजाच्या उत्पन्नात कुठलाही अतिरिक्त खर्च न करता वाढ होवून त्यांचे जीवनमान उंचावते म्हणूनच ज्या-ज्या विभागांनी शिरपूर जलक्रांतीला दीपस्तंभ मानून या पॅटर्नचा अवलंब केला त्या भागात शेतकरी आत्महत्येची चर्चा ऐकवयास येत नाही़