शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

धुळे जिल्ह्यातील १० हजार दुधाळ जनावरांना मिळाले ‘आधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:03 PM

पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम, पहिल्या टप्यात ३७ हजार जनावरांना बिल्ला देणार

ठळक मुद्देजिल्ह्यात दुधाळ गायी-म्हशींची संख्या ८९ हजार ४४पहिल्या टप्यात ३७ हजार जनावरांना टॅगिंग केले जाणारपशुसंवर्धन विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जनावरांची ओळख होण्यासाठी केंद्र शासनाने पशुसंजीवनी योजना सुरू केलेली आहे. आधारप्रमाणेच जनावरांनाही बारा अंकी युनिक कोड देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार ११४ दूधाळ गायी-म्हशींना टॅग (बिल्ला) लावण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात आली. देशभरातील जनावरांना स्वत:ची ओळख मिळवून देण्याचे काम केंद्र सरकारच्या ‘नॅशनल मिशन आॅफ बोव्हाईन प्रॉडक्टीव्हिटी’ या योजनेंतर्गत करण्यात येत आहे. यानुसार जनावरांना युनिक आयडेंटीफिकेशन कोड असलेला फायबरचा टॅग लावण्यात येत आहे. यामाध्यमातून जनावरांची सर्व माहिती शासनाला एक क्लिकवर उपलब्ध होऊ शकणार आहे.२०१२च्या १९ व्या पशुगणणेनुसार जिल्ह्यात दुधाळ गायी-म्हशींची एकूण  संख्या ८९ हजार ०४४ आहे. यात दूधाळ गायींची संख्या ५४ हजार ९१५ तर  म्हशींची संख्या ३४ हजार १२९ एवढी आहे.  पहिल्या टप्यात ३७ हजार गायी-म्हशींना टॅगिंग केले जाणार आहे.  त्यापैकी आतापर्यंत १० हजार ११४ जनावरांना बिल्ला लावण्यात आलेला आहे. यात ६ हजार ४८४ गायी तर ३ हजार ६३० म्हशींचा समावेश आहे. उर्वरित जनावरांना बिल्ला लावण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.इत्यंभूत माहिती मिळणारया नवीन योजनेनुसार जनावरांनाही आधारकार्डाप्रमाणेच १२ अंकी युनिक आयडी कोड मिळणार आहे. संगणकावर हा आकडा टाकल्यास, जनावराच्या मालकाचे नाव, गाव, ते जनावर कुठल्या जातीचे आहे, दूध किती देते, लसीकरण कधी झाले आदींची इत्यंभूत माहिती मिळण्यास मदत होणार आहे. जनावरांची खरेदी-विक्री करतांना, शासकीय योजना देतांनाही याचा लाभ होणार आहे.