शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
4
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
5
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
6
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
7
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
8
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
9
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
10
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
11
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
12
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
13
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
14
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
15
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
16
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
17
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
18
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
19
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
20
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

अवघ्या दहा दिवसांत सारे संपले; उरला पुन्हा एक नवा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 14:40 IST

सोयाबीन पाण्यात कुजले अन् हुंडी बुरशीयुक्त बनली 

ठळक मुद्देपूर्वार्धात कोरड्या व उत्तरार्धात ओल्या दुष्काळाचा माराकिमान उत्पादन खर्च तरी पदरात पडेल, अशी आशा होती

- बालाजी आडसूळ

कळंब (जि. उस्मानाबाद) : मागच्या दुष्काळाने गळी आलेला हुंदका आवरला होता. नंतर यंदा नव्या स्वप्नांची पेरणी केली होती; परंतु यावरही बा वरुणराजा कोपला... पूर्वार्धात कोरड्या तर उत्तरार्धात ओल्या दुष्काळाच्या रूपाने. अवघ्या दहा दिवसांत सारे संपले. उरला पुन्हा एक नवा संघर्ष. अवेळी पावसाने ही नौबत आणली आहे, आढळा येथील शेतकरी रवींद्र वायसे यांच्यावर.

मांजरा काठावरील आढळा या गावाने यंदा तर एकाच हंगामात ‘कोरडा अन् ओला दुष्काळ’ अनुभवला. येथील रवींद्र रखमाजी वायसे या शेतकऱ्याने मागचा वेदनादायी भूतकाळ विस्मृतीत टाकत मोठ्या हुंबाडीने यंदा काळ्या आईची ओटी भरली होती. आपल्या सात एकरावर व बटईने कसत असलेल्या काही शेतजमिनीत पूर्व मशागत करून मोठ्या अपेक्षेने चाढ्यावर मूठ धरली. पहिल्या टप्प्यात पावसाचा सुखद शिडकावा झाल्याने उगवण व वाढही समाधानकारक झाली. परंतु, पुढील वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने ओढ दिली. तब्बल अडीच महिने वरूणराजा गायब होता. याचा त्यांच्या नऊ एकर सोयाबीनच्या वाढीवर अन् उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम झाला. सोयाबीनच्या मोडाला दोन-चार शेंगा अन् शेंगामध्ये चार-दोन दाणे भरले होते. ही स्थिती अर्थकारणाला अन् संसाराला पुन्हा हादरा देणारी अशीच होती. परंतु असू द्या, किमान उत्पादन खर्च तरी पदरात पडेल, अशी धारणा झोप उडालेल्या वायसे यांच्या खंबीर मनाने केली होती. परंतु, नियतीला हे सुद्धा मान्य नव्हते.  दुष्काळाच्या तडाख्यातून हाती येत असलेल्या उरल्या-सुरल्या पिकाला आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाची नजर लागली. अवघ्या आठ-दहा दिवसांत कोरड्यातून ओल्यात रूपांतरित झालेल्या या निसर्गाच्या अनाकलनीय रूपाने वायसे यांच्या सोयाबीनचा फड पाण्याचा निचरा होत नसल्याने अक्षरश: वाया गेला. कुजलेले हे पीक मोठी धडपड करून  पाण्याच्या बाहेर काढले. त्याची हुंडी लावली. मात्र, पावसाच्या तडाख्यातून हुंडीही वाचली नाही. हे सर्वच सोयाबीन बुरशीयुक्त बनले आहे. एवढेच नाही तर बियाही काळ्या पडल्या आहेत. त्यामुळे अशा सोयाबीनला बाजारात आता हजार रूपये प्रति क्विंटल एवढाही दर द्यायला व्यापारी तयार नसल्याचे शेतकरी वायसे सांगतात.

काय विकावे अन् घेणार कोण? सोयाबीनचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. उत्पादन खर्च दीड ते दोन लाखांवर झाला आहे. या स्थितीत एक तर उत्पादनात कमालीची घट तर आहेच; शिवाय मालाचा दर्जा सुमार आहे. पांढरे सोने काळा रंग घेऊन हाती आले आहे. यामुळे काय विकावे अन् कोणाला विकावे, असा अनुत्तरित प्रश्न पडला असल्याचे वायसे यांचा मुलगा राहुल वायसे यांनी सांगितले.

बहिणीच्या लग्नाचे देणे फेडायचे कसे?मागच्या मे महिन्यात बहिणीचे लग्नकार्य पार पाडले होते. यासाठी उसनवारी करून पै-पै जमवून लग्नकार्य केले. यंदा सोयाबीन विकल्यानंतर मिळणाऱ्या पैशातून ही सर्व देणी फेडायचे नियोजन होते; परंतु परतीच्या पावसाने हे नियोजन पूर्णपणे धुळीस मिळाले, असे राहुल वायसे म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसOsmanabadउस्मानाबाद