शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

विमा कंपन्या फोडणारे आता गप्प का? सेनेचा नामोल्लेख टाळत देवेंद्र फडणवीसांचा निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 16:49 IST

विरोधी पक्षनेते फडणवीस, प्रवीण दरेकर हे सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते.

ठळक मुद्देअंग झटकू नका, केंद्राने ११ हजार कोटी दिले...

तेर (जि.उस्मानाबाद) : राज्य सरकारचे मराठवाड्याकडे साफ दुर्लक्ष आहे. आमच्या काळात एकेका जिल्ह्याला ८०० कोटींपर्यंत पीकविमा मिळाला होता. आता सबंध महाराष्ट्रात ८०० कोटी मिळत नाहीयेत. नुकसानीमुळे शेतकरी आक्रोश करीत आहेत. तेव्हा विमा कंपन्यांची कार्यालये फोडणारे आता सत्तेत असतानाही गप्प का आहेत, असा निशाणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सेनेचा नामोल्लेख टाळून साधला.

विरोधी पक्षनेते फडणवीस, प्रवीण दरेकर हे सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. सायंकाळी त्यांनी तेर येथे माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पाहणीदरम्यान खूप भीषण स्थिती दिसून आली. मराठवाड्यातील सुमारे २५ लाख हेक्टर्सहून अधिक शेतीचे नुकसान झाले आहे. नजर आणेवारीत ८० ते १०० टक्के नुकसान दिसून येत आहे. अशावेळी विमा कंपन्यांचे दहावी नापास प्रतिनिधी शेतकऱ्यांकडे नुकसान दाखविण्यासाठी ५०० रुपये मागत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी आपल्याकडे केल्या. शेतकऱ्यांचे पैसे न देण्यासाठी कंपन्या सरसकट पंचनाम्याचा आग्रह धरीत आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने विमा कंपन्यांशी बोलून तातडीने विमा मिळवून देणे गरजेचे आहे. मात्र, हे सरकार केवळ जबाबादारी ढकलण्याचे काम करीत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. यावेळी आमदार सुजितसिंह ठाकूर, आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ताभाऊ कुलकर्णी व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रत्यक्षात घेता येणार तुळजाभवानी मातेचे दर्शन; दररोज १५ हजार भाविकांना मिळणार मंदिरात प्रवेश

अंग झटकू नका, केंद्राने ११ हजार कोटी दिले...प्रत्येकवेळी राज्य सरकार केंद्रावर ढकलून अंग झटकून मोकळे होण्याचा प्रयत्न करीत आहे. २००४ ते २०१४ या काळात राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीत मदत देण्यासाठी २० हजार कोटी मागितले होते. त्याबदल्यात दहा वर्षांत ३ हजार ६०० कोटी राज्याला मिळाले. यानंतर ७ वर्षांच्याच काळात राज्याने अशा परिस्थितीत २५ हजार कोटी केंद्राकडे मागितले. केंद्राने ११ हजार कोटी रुपये दिलेत. त्यामुळे कारण सांगणे, राजकारण करणे बंद करा व तातडीने मदत द्यावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेRainपाऊस