शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

विमा कंपन्या फोडणारे आता गप्प का? सेनेचा नामोल्लेख टाळत देवेंद्र फडणवीसांचा निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 16:49 IST

विरोधी पक्षनेते फडणवीस, प्रवीण दरेकर हे सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते.

ठळक मुद्देअंग झटकू नका, केंद्राने ११ हजार कोटी दिले...

तेर (जि.उस्मानाबाद) : राज्य सरकारचे मराठवाड्याकडे साफ दुर्लक्ष आहे. आमच्या काळात एकेका जिल्ह्याला ८०० कोटींपर्यंत पीकविमा मिळाला होता. आता सबंध महाराष्ट्रात ८०० कोटी मिळत नाहीयेत. नुकसानीमुळे शेतकरी आक्रोश करीत आहेत. तेव्हा विमा कंपन्यांची कार्यालये फोडणारे आता सत्तेत असतानाही गप्प का आहेत, असा निशाणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सेनेचा नामोल्लेख टाळून साधला.

विरोधी पक्षनेते फडणवीस, प्रवीण दरेकर हे सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. सायंकाळी त्यांनी तेर येथे माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पाहणीदरम्यान खूप भीषण स्थिती दिसून आली. मराठवाड्यातील सुमारे २५ लाख हेक्टर्सहून अधिक शेतीचे नुकसान झाले आहे. नजर आणेवारीत ८० ते १०० टक्के नुकसान दिसून येत आहे. अशावेळी विमा कंपन्यांचे दहावी नापास प्रतिनिधी शेतकऱ्यांकडे नुकसान दाखविण्यासाठी ५०० रुपये मागत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी आपल्याकडे केल्या. शेतकऱ्यांचे पैसे न देण्यासाठी कंपन्या सरसकट पंचनाम्याचा आग्रह धरीत आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने विमा कंपन्यांशी बोलून तातडीने विमा मिळवून देणे गरजेचे आहे. मात्र, हे सरकार केवळ जबाबादारी ढकलण्याचे काम करीत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. यावेळी आमदार सुजितसिंह ठाकूर, आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ताभाऊ कुलकर्णी व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रत्यक्षात घेता येणार तुळजाभवानी मातेचे दर्शन; दररोज १५ हजार भाविकांना मिळणार मंदिरात प्रवेश

अंग झटकू नका, केंद्राने ११ हजार कोटी दिले...प्रत्येकवेळी राज्य सरकार केंद्रावर ढकलून अंग झटकून मोकळे होण्याचा प्रयत्न करीत आहे. २००४ ते २०१४ या काळात राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीत मदत देण्यासाठी २० हजार कोटी मागितले होते. त्याबदल्यात दहा वर्षांत ३ हजार ६०० कोटी राज्याला मिळाले. यानंतर ७ वर्षांच्याच काळात राज्याने अशा परिस्थितीत २५ हजार कोटी केंद्राकडे मागितले. केंद्राने ११ हजार कोटी रुपये दिलेत. त्यामुळे कारण सांगणे, राजकारण करणे बंद करा व तातडीने मदत द्यावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेRainपाऊस