शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

‘लढू अन् पुन्हा जिंकू’; उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 6:56 PM

कार्यकर्त्यांनामध्ये बळ भरण्यासाठी लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा

ठळक मुद्देविकास करण्यास ‘त्यांना’ कोणी आडविले?काही मंडळी सत्तेविना राहू शकत नाही 

उस्मानाबाद : शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. राष्ट्रवादीचे निष्ठावंत शिलेदार तथा पवारप्रेमी आता सक्रीय झाले आहेत. शनिवारी परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी संयुक्त पत्रकार परिषद घेवून ‘‘लढू अन् पुन्हा जिंकू’’ असा निर्धार व्यक्त केला. नेत्यांनी पक्ष सोडला असला तरी कार्यकर्त्यांची भक्कम फळी राष्ट्रवादीत कायम असल्याचा दावाही त्यांनी केला. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनामध्ये बळ भरण्यासाठी लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे डॉ़पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भाजपाचा भगवा झेंडा हाती घेतला आहे. दरम्यान, पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे निष्ठावंत शिलेदार सोमवारी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. यामध्ये जीवनराव गोरे यांच्यासह आमदार सतीश चव्हाण, आमदार राहुल मोटे, आमदार विक्रम काळे, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, संपत डोके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण यादव यांचा समावेश होता. सुरूवातीला गोरे यांनी भूमिका मांडली. काही नेते भाजपात गेल्यामुळे राष्ट्रवादी पूर्णपणे संपली अशी, सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. परंतु, हे सत्य नाही. उस्मानाबादची जनता शरद पवार यांचे योगदान कधीच विसरणार नाही. जिल्ह्यात रेल्वे आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. एवढेच नाही तर १९९३ भूकंपानंतरचे त्यांचे कार्य अतुलनिय आहे. त्यामुळे यापूर्वी, सध्या आणि पुढेही शरद पवार हेच आमचे दैवत असतील. उस्मानाबाद, कळंब वगळता पक्षात फारशी पडझड झालेली नाही. नेत्यांनी पक्षांतर केले असले तरी कार्यकर्ते जागेवर असल्याचे ते म्हणाले. लवकरच पक्षाची नवीन कर्यकारिणी जाहीर करण्यात येईल. यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत उस्मानाबादेत मोठा मेळावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  विकास करण्यास ‘त्यांना’ कोणी आडविले?‘‘जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपात जात आहे’’, असे आमदार पाटील यांनी सांगितले होते. मात्र त्यांच्या म्हणण्यात तथ्य नाही. केंद्र तसेच राज्यात राष्ट्रवादीची सत्ता असताना आ. पाटील यांना शरद पवार यांनी काय कमी केले? मंत्रीमंडळातील महत्वाची खाती, पदे त्यांच्याकडेच तर होती. तेव्हा त्यांना जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यास कोणी आडविले होते? असा सवाल आमदार विक्रम काळे यांनी केला. आजवर तरूणांना संधी मिळाली नाही. एकतर्फी सत्ता होती. त्यामुळे असंख्य तरूण वर्तुळाबाहेर होते. हे सर्वजण आता पक्षात सक्रीय होत असल्याचा दावा त्यांनी केला.

काही मंडळी सत्तेविना राहू शकत नाही शरद पवार आपल्या हृदयात असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले होते. असे जर असले तर त्यांचे हृदय नेमके किती मोठे आहे? हे तपासावे लागेल. अशी वाक्य केवळ बोलण्यापुरती असतात. हे खरे असते तर त्यांनी अडचणीच्या काळात शरद पवार यांची साथ सोडली, असा अरोप आमदार चव्हाण यांनी केला. नेत्यांनी पक्षांतर केले असले तरी तळागळातील कार्यकर्ते, पदाधिकारी पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत, असेही ते म्हणाले. जिल्हा परिषदेत सत्तांतर होणार का? असा सवाल केला असता, काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसOsmanabadउस्मानाबादSharad Pawarशरद पवार